आज आषाढी पौर्णिमा अर्थातच भारतामध्ये गुरु पौर्णिमा
म्हणून साजरी केली जाते. गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस. .....आज
आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा
दिवस. आपल्या भारतीय संस्कृतीत मध्ये देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे.
त्यापेक्षा थोड अधिकच महत्व गुरूंना आहे. गुरूंच्या मानवी जीवनातल्या जडण
घडणी मध्यें गुरूचे स्थान हे खूप महत्वाचे आहे. ज्यांच्यामुळे आपल्या
जीवनाला आकार मिळतो. ज्यांच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व घडतं. जे आपल्याला
अडचणीच्या वेळेस योग्य मार्गदर्शन करतात. लढण्यासाठी ऊर्जा, उमेद देतात,
आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करतात. जर आपल्या आयुष्याचा रस्ता चुकत
असेल तर योग्य दिशा देण्याचं काम करतात ते आपले गुरु होत. प्रथम मी
माझ्या आई वडिलांना गुरु मानतो. ज्यांनी मला हे सुंदर जग दाखविले. ज्यांनी
माझ्यावर चांगले संस्कार केले. ज्यांच्यामुळे माझं या जगात अस्तित्व आहे
त्या माझ्या आई आणि वडिलांना मी माझे प्रथम गुरु समझतो.
आईवडिलांच्यानंतर मी वाचलेल्या पुस्तकांनाच माझा गुरु समजतो. त्यांनीच मला विचार करण्याची दृष्टी दिली. अन्याय अत्याचारा विरुद्ध व्यक्त होण्यासाठी लेखणी म्हणून शस्त्र हाती दिले. पुस्तकांनीच देशाची अनादिकालीन संस्कृती, माती आणि गौरवशाली इतिहास समजावून सांगितला आणि त्यातूनच तो अभिमानास्पद इतिहास सांगण्याचं कौशल्य प्रपात झाले, याचा मला मनोमनी आनंद आहे. अर्थात आयुष्याच्या शेवटपर्यंत खूप समग्र वाचनाची इच्छा आहे. वाचनाची भूक कधीच भागणार नाही हे ही त्रिवार सत्य आहे. या बदलत्या आधुनिक जगात जगायचं कसं हे पुस्तकांनीच सांगितले.यानंतर मला माझ्या शालेय जीवनापासून आजपर्यंत अनेक आदर्श शिक्षक अर्थातच गुरु मला भेटत गेले. त्यांनी दिलेले ज्ञान याचा आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर त्याची राहील. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माच कारण काय, प्राप्त जन्माची खरी सार्थकता कशी सिद्ध कराल ह्याचे मार्गदर्शनही आपले गुरूच करतात. अशा शाळेपासून ते विद्यापीठापर्यंतच्या अनेक व्यक्तीमत्वांमधून ते गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो. जेव्हा कर्तृत्वाने मोठा होऊन शिक्षकांच्या समोर आपण जातो तेव्हा खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी केल्याचे समाधान शिक्षकांनाही आणि आपल्यालाही मिळते . आजही अनेक ध्येयवेडे शिक्षक आहेत. आदर्श कल्पना डोक्यात घेऊन झपाटलेले कृतिशील, उपक्रमाशील शिक्षक समाजात आहेत. शिक्षक अर्थातच गुरु हा खऱ्या अर्थाने समाजाचा शिल्पकार असतो.
✍✍✍✍✍✍✍✍ पोपटराव यमगर
07709935374
आईवडिलांच्यानंतर मी वाचलेल्या पुस्तकांनाच माझा गुरु समजतो. त्यांनीच मला विचार करण्याची दृष्टी दिली. अन्याय अत्याचारा विरुद्ध व्यक्त होण्यासाठी लेखणी म्हणून शस्त्र हाती दिले. पुस्तकांनीच देशाची अनादिकालीन संस्कृती, माती आणि गौरवशाली इतिहास समजावून सांगितला आणि त्यातूनच तो अभिमानास्पद इतिहास सांगण्याचं कौशल्य प्रपात झाले, याचा मला मनोमनी आनंद आहे. अर्थात आयुष्याच्या शेवटपर्यंत खूप समग्र वाचनाची इच्छा आहे. वाचनाची भूक कधीच भागणार नाही हे ही त्रिवार सत्य आहे. या बदलत्या आधुनिक जगात जगायचं कसं हे पुस्तकांनीच सांगितले.यानंतर मला माझ्या शालेय जीवनापासून आजपर्यंत अनेक आदर्श शिक्षक अर्थातच गुरु मला भेटत गेले. त्यांनी दिलेले ज्ञान याचा आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर त्याची राहील. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माच कारण काय, प्राप्त जन्माची खरी सार्थकता कशी सिद्ध कराल ह्याचे मार्गदर्शनही आपले गुरूच करतात. अशा शाळेपासून ते विद्यापीठापर्यंतच्या अनेक व्यक्तीमत्वांमधून ते गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो. जेव्हा कर्तृत्वाने मोठा होऊन शिक्षकांच्या समोर आपण जातो तेव्हा खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी केल्याचे समाधान शिक्षकांनाही आणि आपल्यालाही मिळते . आजही अनेक ध्येयवेडे शिक्षक आहेत. आदर्श कल्पना डोक्यात घेऊन झपाटलेले कृतिशील, उपक्रमाशील शिक्षक समाजात आहेत. शिक्षक अर्थातच गुरु हा खऱ्या अर्थाने समाजाचा शिल्पकार असतो.
✍✍✍✍✍✍✍✍ पोपटराव यमगर
07709935374