आज कर्मवीर भाऊराव पाटील(आण्णा) यांची जयंती।।त्यानिमीत्त प्रथमतः यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन।।
माझं जवळ जवळ अर्ध शिक्षण आण्णांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेत झालं यांचा मला आनंद वाटतो. कारण शिक्षण घेत असताना रयत शिक्षण संस्था कधीच परकीय संस्था वाटली नाही. संस्थेत शिक्षण घेत असताना आपुलकी प्रेमच मिळाले संस्थेत शिक्षण घेत असताना आण्णां सारख्या महापुरुषांच्या आदर्श चारित्र्याचे धडे मिळत गेले आणि त्यातुनच माझं हे व्यक्तीगत चारित्र्य घडत गेले. आजच्या काळात शैक्षणिक क्षेत्राचं अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी बाजारीकरण करुन टाकलं आहे. पैसे घेऊन जशा बाजारात वस्तु मिळतात तशा अनेक खाजगी विद्यापीठ संस्थामधुन पदव्या मिळत आहेत. आज छोट्या मुलांच्या केजी ला प्रवेश घ्यायला 50000 फी मागितली जाते. या आर्थिक कारणासाठी अनेक गोरगरीब पालकांना आपल्या मुलास दर्जेदार शिक्षणापासुन वंचित ठेवावं लागतं ही मनाला बोचणारी खंत आहे. पण मी ठामपणे सांगु शकतो की माझं संस्थेतील शिक्षण हे खुप कमी खर्चात झालं आहे .
आणांनी रयत शिक्षण संस्था चालु करण्यामागचं खरं उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील गोरगरीब बहुजन समाजातील मुला मुलींना शिक्षण घेता यावं हे होतं. स्वतः आण्णा फक्त सहावी शिकले आहेत पण त्यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेतुन लाखो कोट्यावधी मुलांनी पदव्युत्तर पदव्या घेतल्या आहेत.
आण्णानी 4 ऑक्टोंबर 1919 रोजी कार्ले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांनी 1919 ला रयत शिक्षण संस्थेच्या नावाने लावलेला वेल आज गगणाला गवसणी घालताना आपल्याला दिसुन येतोय. संस्थेच्या नावाप्रमाणेच ही रयतेची म्हणजेच गोरगरीब, दलीत, सर्वसामान्य, वंचीत, शेतकरी, कामगार यांची संस्था आहे असं आण्णानी अनेक वेळा बोलुनही दाखवले आहे. अनेक विद्यार्थ्यांना घरच्या आर्थिक परिस्थीतीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा शिकण्याची इच्छा असणारया गरजु विद्यार्थ्यासाठी आण्णानी कमवा आणि शिका ही योजना संस्थेत चालु केली. संस्थेतील अनेक शाखामधे बाहेरगावच्या वंचित विद्यार्थ्यासाठी वसतिगृहे चालु केली. स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीदवाक्य असं सांगतांना आण्णांनी संस्थेचं चिन्हसुद्धा वटवृक्ष ठेवलं आहे याचं कारण म्हणजे वटवृक्षाप्रमाणे संस्थेच्या शाखाचा विस्तार होत जावो हीच त्यांची मनोमनी इच्छा होती.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाणसाहेब यांनी कर्मवीर आण्णांच्या विषयी पुढील गौरवोदगार काढले आहेत, "कर्मवीर ही व्यक्ती नव्हती ती एक संस्था होती, बहुजन समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले व महाराष्ट्रात नवयुग निर्माण केले. त्यांची रयत शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्रात नवजीवन ओतणारी गंगा आहे." सार्वजनिक शिक्षणाबाबत आज सरकारी पातळीवर निर्णय झालेले आहेत. पण एक काळ असा होता की त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अशा काळात मागासवर्गीय बहुजन गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर केले. कष्टकरी विद्यार्थ्यांना रात्रशाळांचा पर्याय उपलब्ध केला. खेड्यातील मुलांना दैनंदिन सुविधा मिळाल्या तर त्यांना शिक्षण घेता येईल या विचारातून त्यांनी मोफत वसतीगृहे चालवली. ‘रयत शिक्षण संस्थे’च्या रूपाने त्यांनी उभे केलेले कार्य सर्वांना परिचित आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबी शिक्षण, श्रमप्रतिष्ठा आणि स्वातंत्र्याची मूल्ये रुजवली. त्यांच्या जयंतीदिनी त्यांचा आदर्श न विसरण्याची शपथ आपण घेतली पाहिजे. पुन्हा एकदा आण्णाच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन।
धन्यवाद।
✍✍✍✍पोपट यमगर
माझं जवळ जवळ अर्ध शिक्षण आण्णांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेत झालं यांचा मला आनंद वाटतो. कारण शिक्षण घेत असताना रयत शिक्षण संस्था कधीच परकीय संस्था वाटली नाही. संस्थेत शिक्षण घेत असताना आपुलकी प्रेमच मिळाले संस्थेत शिक्षण घेत असताना आण्णां सारख्या महापुरुषांच्या आदर्श चारित्र्याचे धडे मिळत गेले आणि त्यातुनच माझं हे व्यक्तीगत चारित्र्य घडत गेले. आजच्या काळात शैक्षणिक क्षेत्राचं अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी बाजारीकरण करुन टाकलं आहे. पैसे घेऊन जशा बाजारात वस्तु मिळतात तशा अनेक खाजगी विद्यापीठ संस्थामधुन पदव्या मिळत आहेत. आज छोट्या मुलांच्या केजी ला प्रवेश घ्यायला 50000 फी मागितली जाते. या आर्थिक कारणासाठी अनेक गोरगरीब पालकांना आपल्या मुलास दर्जेदार शिक्षणापासुन वंचित ठेवावं लागतं ही मनाला बोचणारी खंत आहे. पण मी ठामपणे सांगु शकतो की माझं संस्थेतील शिक्षण हे खुप कमी खर्चात झालं आहे .
आणांनी रयत शिक्षण संस्था चालु करण्यामागचं खरं उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील गोरगरीब बहुजन समाजातील मुला मुलींना शिक्षण घेता यावं हे होतं. स्वतः आण्णा फक्त सहावी शिकले आहेत पण त्यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेतुन लाखो कोट्यावधी मुलांनी पदव्युत्तर पदव्या घेतल्या आहेत.
आण्णानी 4 ऑक्टोंबर 1919 रोजी कार्ले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांनी 1919 ला रयत शिक्षण संस्थेच्या नावाने लावलेला वेल आज गगणाला गवसणी घालताना आपल्याला दिसुन येतोय. संस्थेच्या नावाप्रमाणेच ही रयतेची म्हणजेच गोरगरीब, दलीत, सर्वसामान्य, वंचीत, शेतकरी, कामगार यांची संस्था आहे असं आण्णानी अनेक वेळा बोलुनही दाखवले आहे. अनेक विद्यार्थ्यांना घरच्या आर्थिक परिस्थीतीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा शिकण्याची इच्छा असणारया गरजु विद्यार्थ्यासाठी आण्णानी कमवा आणि शिका ही योजना संस्थेत चालु केली. संस्थेतील अनेक शाखामधे बाहेरगावच्या वंचित विद्यार्थ्यासाठी वसतिगृहे चालु केली. स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीदवाक्य असं सांगतांना आण्णांनी संस्थेचं चिन्हसुद्धा वटवृक्ष ठेवलं आहे याचं कारण म्हणजे वटवृक्षाप्रमाणे संस्थेच्या शाखाचा विस्तार होत जावो हीच त्यांची मनोमनी इच्छा होती.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाणसाहेब यांनी कर्मवीर आण्णांच्या विषयी पुढील गौरवोदगार काढले आहेत, "कर्मवीर ही व्यक्ती नव्हती ती एक संस्था होती, बहुजन समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले व महाराष्ट्रात नवयुग निर्माण केले. त्यांची रयत शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्रात नवजीवन ओतणारी गंगा आहे." सार्वजनिक शिक्षणाबाबत आज सरकारी पातळीवर निर्णय झालेले आहेत. पण एक काळ असा होता की त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अशा काळात मागासवर्गीय बहुजन गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर केले. कष्टकरी विद्यार्थ्यांना रात्रशाळांचा पर्याय उपलब्ध केला. खेड्यातील मुलांना दैनंदिन सुविधा मिळाल्या तर त्यांना शिक्षण घेता येईल या विचारातून त्यांनी मोफत वसतीगृहे चालवली. ‘रयत शिक्षण संस्थे’च्या रूपाने त्यांनी उभे केलेले कार्य सर्वांना परिचित आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबी शिक्षण, श्रमप्रतिष्ठा आणि स्वातंत्र्याची मूल्ये रुजवली. त्यांच्या जयंतीदिनी त्यांचा आदर्श न विसरण्याची शपथ आपण घेतली पाहिजे. पुन्हा एकदा आण्णाच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन।
धन्यवाद।
✍✍✍✍पोपट यमगर