विवेक विचार

विवेक विचार

शुक्रवार, २५ मार्च, २०१६

🌷विवेक प्रहार🌷
आज लातुरच्या मोहिनी चे पत्र वाचुन काळजात धस्स्स झाल. आज 21व्या शतकातही हुंड्यासारख्या सनातनी रुढीवरुन छत्रपतीं शिवाजी महाराज , शाहु, फुले , आंबेडकर यांच्या सुधारणावादी विचारांच्या महाराष्ट्रात हत्या आत्महत्या होत आहेत ही मनाला थक्क करणारी गोष्ट आहे. आज एकटी मोहीनीच अशी मुलगी नाहीये मित्रांनो ।।। मोहिनीसारख्या अशा हजारो मुलींचे जीवन उध्वस्थ होत आहे. आज सांगायलाही लाज वाटते की अशिक्षीत व्यक्तींच्या पेक्षा शिक्षीत आणि श्रीमंत व्यक्तीच जास्त हुंडा घेत आहेत कारण काय तर म्हणे हुंडा जास्त घेतल्याने आमच्या कुटुंबाची समाजात जास्त प्रतिष्ठा, मान सन्मान वाढतो.
जर जास्त हुंडा घेतल्याने तुमची प्रतिष्ठा वाढत असेल तर गोरगरीब सर्वसामान्य मुलींच्या (मोहिनीसारखींच्या) प्रतिष्ठेचे त्यांच्या मान सन्मानाचे काय???
त्यांचे जीवन तुम्ही परत मिळवुन देऊ शकता का???
मग तुम्ही शिक्षणातुन कोणते विचार घेतले??? अशा प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या मनातुन मिळविणे खुप गरजेचे आहे.
मी यापुर्वीही बीडच्या सातभाई कुंटुबातील वडिलांने आत्महत्या केली तेव्हा सांगितले होते की जर तुमचा होणारा जावई हा हुंड्याच्या स्वरुपात भीक मागत असेल तर अशा भिकारी जावयाला कदापी तुमची मुलगी देऊ नका।(फक्त गोरगरीब आणि सर्वसामान्य पालकासाठी) आज समाजात मुलींचे प्रमाण खुप कमी आहे मुलगी अविवाहीत राहील याची कोणतीही काळजी करु नका।।
माझ्या सर्व तरुण सुशिक्षीत सुसंस्कृत अविवाहीत मित्रांना आणि मैत्रीणीना नम्रतीची विनंती आहे की आपण सर्वानी अशी शप्पथ घेतली पाहिजे की मी हुंडा घेणार नाही आणि कोणाला देणारही नाही, तरच येणार्या काळात बदल घडुन येईल.
आज मी परमेश्वराला साक्षी मानून वचन देतो की,
मी माझे लग्न जमवताना हुंडा मागणार नाही .
उलट त्या मुलीच्या आई वडिलांना वचन देणार की
तुमच्या काळजाच्या तुकड्याला मी प्राणपनाने जपेल.
मित्रानो फ़क्त हळहळ करू नका...
परिवर्तन करा ...सुरवात अत्ता लगेच स्वतःपासुन करुया
मी तर केलीच आहे.
जे मेले तरी आपली वचन पाळतात त्यांनी आज
वचन दया ग्रुप वर
दयाल ना वचन...?
(माझ्या साठी नव्हे..तुमचे मन सांगत आसेल तर दया...)
श्री. पोपटराव यमगर
रा.-: बाळेवाडी ता.-: आटपाडी जि.-: सांगली
7709935374

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: