विवेक विचार

विवेक विचार

शनिवार, २८ मे, २०१६

स्वांतत्र्यवीर सावरकर यांची 133 वी जयंती त्यानिमीत्त................

            आज स्वांतत्र्यवीर सावरकर यांची 133 वी जयंती। त्यानिमीत्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। स्वांतत्रवीर सावरकर म्हटले की आपल्याला आठवतात ते क्रांतीकारक सावरकर. भारताच्या स्वांत्र्यासाठी आपल्या आयुष्याचा त्याग करणारे सावरकर. काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले सावरकर, अंदमान तुरुंगातील छळाला निर्भीड सामोरे गेलेले सावरकर.. साहित्यीक विज्ञानवादी सावरकर... सावरकरांच्या जीवनात अदभुत पराक्रम, अस्सीम त्याग, राष्ट्रनिष्ठा, असामान्य वक्तृत्व, हिंदुत्व, अस्पृश्यता निवारण, विज्ञाननिष्ठा हे सर्व सामावलेले आहे. त्यांच्या आयुष्यात भरपुर दुःखप्रद कारावास, हालाखीचे जगणे, देशासाठी केलेला अस्सीम त्याग आहे. तरीही एका असामान्य व्यक्तीचा जीवनाशी झालेला हा लढा आहे.
           सावरकरांनी वयाच्या १४व्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरातील अष्टभूजा देवीपुढे ‘मी या देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी मारिता मारिता मरेतॊ झुंझेन’ अशी शस्त्र क्रांतीची शपथ घेतली. या घटनेचे मूळआई-वडिलांच्या आदर्शात व त्यांच्याकडुन होणार्‍या संस्कारांमध्ये दडलेले होते असे दिसून येते. सावरकरांचे एकुण जीवनच आपल्या सारख्या तरुणांना भारावुन टाकणारे आहे. आजच्या काळात अनेक संकुचित विचार असणारे लोक स्वांतत्रपुर्वकाळातील महापुरुष, क्रांतीकारक,सामाजिक राजकीय नेते यांची एकमेकांशी तुलना करतात. एकमेकांना त्यांच्या नावाप्रमाणे विभागण्याचा प्रयत्न करतात. नक्कीच ही एक मनातील बोचरी खंत आहे. एकमेकांशी तुलना न करता सर्व महापुरुषांनी देशासाठी, समाजासाठी केलेलं कार्य, त्यांचे विचार आपण समजुन घेतले पाहिजेत असं माझं ठाम मत आहे. या सर्व महापुरुषांच्या विचारामध्ये मतभेद जरुर होते पण त्यांनी ते मतभेद देश हिताच्या आड येऊ दिले नाहीत... त्यांनी राजकीय स्वांतत्र्याचे स्वप्न पाहिले. त्यांना अंदमानमधील तुरुंगात कोणत्याही सुविधा पुरविल्या गेल्या नाहीत, म्हणून 'कमला' हा काव्यसंग्रह एका अणकुचीदार खिळ्याने भिंतीवर लिहुन तो पाठ करणारे सावरकर हे पहिलेच कैदी होते. ते एकदा म्हणाले होते, "माझी अशी इच्छा आहे की, मी
सागरात उडी टाकली होती ही गोष्ट लोक विसरले तरी चालतील, पण मी जे सामाजिक विचार मांडले आहेत त्यांचे समाजाने नेहमी स्मरण ठेवावे." अर्थात त्यांच्या जयंतीदिनी त्यांचे विचार एक समंजसवादी सुशिक्षीत युवक म्हणुन जाणुन घेणं हीच आजच्या काळातील गरज आहे, असं मला ठामपणे वाटतं.

✍✍✍✍✍✍पोपट यमगर… ………

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: