गेल्या दोन महिन्यापासून अखंड महाराष्ट्रात चालू असलेला धनगर समाजाच्या आरक्षणाचा अखेरचा लढा संपूर्ण राज्यभर गाजत आहे. या अखेरच्या लढ्याची नियोजन बैठक पुण्यात १ ऑगस्ट ला पार पडली.. आणि तिथून चालू झाला या लढ्याचा झंजावात....... या अखेरच्या लढ्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ या महाराष्ट्रातील सर्वच विभागातून समाजाचा प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे. समाजातील प्रत्येकाला हा लढा खुणावतो आहे, या लढ्यात प्रत्येकाला सामील व्हावेसे वाटत आहे.... आणि आजचा युवक सर्व राजकारण, पक्ष, गट, तट बाजूला ठेऊन या लढ्यात सहभागी होत आहे. गेल्या सत्तर वर्षातील भिजत पडलेले आरक्षणाचे घोंगडे या लढ्यामुळे साध्य होइल असा आत्मविश्वास समाजाच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. या अखेरच्या लढ्याचा महामेळावा औरंगाबाद येथील आमखास मैदानावर ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३.०० वाजता संपन्न होणार आहे... या महामेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या मैदानावर सरकारची अग्निपरीक्षा आहे... त्यामुळे विवध राजकीय नेत्यांचे, विविध राजकीय पक्षांचे तसेच राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. या अखेरच्या लढ्याला विविध विभागातून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादावरून या मैदानावर प्रचंड अश्या मोठ्या संख्येने समाज येईल अशी शक्यता विविध वाहिन्यांनी आणि वर्तमानपत्रांनी दर्शविली आहे. या महामेळाव्याच्या विचारपीठावर एकमेव असे व्यक्तिमत्व असेल ते म्हणजे भारतातील ऋषितुल्य आणि जगातील रेकॉर्ड ब्रेक आमदार आदरणीय गणपतराव (आबासाहेब) देशमुख हे एकटेच असणार आहेत. हा महामेळावा यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्रातील युवकांच्या गळ्यातील ताईत आणि या महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्माननीय गोपीचंदजी पडळकर आणि मा. उत्तमरावजी जानकर साहेब हे दिवस रात्र मेहनत करून गावागावामध्ये जाऊन समाजातील तळागाळातील घटकांना जागृत करण्याचे काम करत आहेत. अखंड महाराष्ट्रातील समाज हा त्यांच्या या अखेरच्या लढ्यात उस्फुर्तपणे सहभागी होत आहे... यामुळे अनेक प्रस्थापित नेत्यांच्या मनात धडकी भरली आहे... त्यांना यामुळे राज्यातील सत्तेत भीती वाटत आहे. अनेकांना समाजामुळे भेटलेली आपली पदे जातील याची चिंता सतावत आहे. तर अनेकांना आपले नेतृत्व कमी होऊन ही नवीन नेतृत्व राज्यभरात मोठी होतील याची काळजी वाटत आहे... याच त्यांच्या द्वेषातून अखेरच्या लढ्याच्या दोन्हीही कार्यक्षम नेतृत्वावर चिंता वाटणाऱ्या नेत्यांच्याकडून आणि त्यांच्या बगलबच्याकडून टीकाटिपण्या केल्या जात आहेत... त्यांच्या भाषणाचा अगदी शब्द न शब्द चाळून पहिला जात आहे... या महाराष्ट्रातील धनगर समाजाचा विश्वास या दोन्हीही कार्यक्षम नेतृत्वानी कधीच जिंकला आहे त्यामुळे एखाद्या शब्दछलमध्ये हा धनगर समाज अडकायला काय एवढा दुधखुळा नाही... या समाजाला चांगले माहित आहे कि यापूर्वी सामाजाच्या नावावर कोणी किती आमदारक्या आणि कोणी किती मंत्रिपदे लाटली आहेत... त्यामुळे समाजातील युवक आज जागृत झाला आहे... त्याला समजायला लागले आहे कोणते नेतृत्व खऱ्या अर्थाने समाजासाठी तळमळीने काम करत आहे, कोणते नेतृत्व महाराष्ट्रव्यापी होऊ शकते हे सर्व आजचा युवक जाणून आहे.खरंतर यावर बोलण्यासारखे बरेच आहे पण आताचा वेळ हा कोणावर टीकाटिपण्या करण्याचा नसून समजत नवचैतन्य निर्माण करून समाजाला अखेरच्या लढ्यात सहभागी करावयाचा आहे. त्यामुळे या विषयावर जास्त बोलणे उचित होणार नाही.
१ ऑगस्ट पासून चालू झालेला हा अखेरचा लढा तुमच्या माझ्यासारख्या नवयुवकाच्या हातात अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र भेटल्याशिवाय थांबणार नाही हे निशंक आहे. त्यामुळे आपल्या सारख्या सुशिक्षित युवा बंधू आणि भगिनींना एक नम्र विनंती आहे कि या अखेरच्या लढ्याची असणारी मुद्देसूद अभ्यासात्मक माहिती समाजातील तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचावावी... आणि येणाऱ्या ३१ ऑगस्टच्या आमखास मैदानावरील कार्यक्रमात सर्वांनी आल्या नंतरचे महत्व त्यांना समजावून सांगावे. मित्रानो औरंगाबाद मध्ये ३१ तारखेला ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे... त्यामुळे या ऐतिहासिक कार्यक्रमात आपण सर्वेसर्वानी येऊन या आरक्षणाच्या अखेरच्या लढाईत सहभागी व्हावे ही नम्र विनंती.
श्री. प्रतिक यमगर
श्री. प्रतिक यमगर