विवेक विचार

विवेक विचार

गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८

महाराष्ट्रात आरक्षणाचा अखेरचा लढा गाजतोय..... बरसतोय..... आता सर्वांचे लक्ष फक्त आणि फक्त औरंगाबादच्या आमखास मैदानाकडे.........



गेल्या दोन महिन्यापासून अखंड महाराष्ट्रात चालू असलेला धनगर समाजाच्या आरक्षणाचा अखेरचा लढा संपूर्ण राज्यभर गाजत आहे. या अखेरच्या लढ्याची नियोजन बैठक पुण्यात १ ऑगस्ट ला पार पडली.. आणि तिथून चालू झाला या लढ्याचा झंजावात....... या अखेरच्या लढ्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ या महाराष्ट्रातील सर्वच विभागातून समाजाचा प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे. समाजातील प्रत्येकाला हा लढा खुणावतो आहे, या लढ्यात प्रत्येकाला सामील व्हावेसे वाटत आहे.... आणि आजचा युवक सर्व राजकारण, पक्ष, गट, तट बाजूला ठेऊन या लढ्यात सहभागी होत आहे. गेल्या सत्तर वर्षातील भिजत पडलेले आरक्षणाचे घोंगडे या लढ्यामुळे साध्य होइल असा आत्मविश्वास समाजाच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. या अखेरच्या लढ्याचा महामेळावा औरंगाबाद येथील आमखास मैदानावर ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३.०० वाजता संपन्न होणार आहे... या महामेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या मैदानावर सरकारची अग्निपरीक्षा आहे... त्यामुळे विवध राजकीय नेत्यांचे, विविध राजकीय पक्षांचे तसेच राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. या अखेरच्या लढ्याला विविध विभागातून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादावरून या मैदानावर प्रचंड अश्या मोठ्या संख्येने समाज येईल अशी शक्यता विविध वाहिन्यांनी आणि वर्तमानपत्रांनी दर्शविली आहे. या महामेळाव्याच्या विचारपीठावर एकमेव असे व्यक्तिमत्व असेल ते म्हणजे भारतातील ऋषितुल्य आणि जगातील रेकॉर्ड ब्रेक आमदार आदरणीय गणपतराव (आबासाहेब) देशमुख हे एकटेच असणार आहेत. हा महामेळावा यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्रातील युवकांच्या गळ्यातील ताईत आणि या महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्माननीय गोपीचंदजी पडळकर आणि मा. उत्तमरावजी जानकर साहेब हे दिवस रात्र मेहनत करून गावागावामध्ये जाऊन समाजातील तळागाळातील घटकांना जागृत करण्याचे काम करत आहेत. अखंड महाराष्ट्रातील समाज हा त्यांच्या या अखेरच्या लढ्यात उस्फुर्तपणे सहभागी होत आहे... यामुळे अनेक प्रस्थापित नेत्यांच्या मनात धडकी भरली आहे... त्यांना यामुळे राज्यातील सत्तेत भीती वाटत आहे. अनेकांना समाजामुळे भेटलेली आपली पदे जातील याची चिंता सतावत आहे. तर अनेकांना आपले नेतृत्व कमी होऊन ही नवीन नेतृत्व राज्यभरात मोठी होतील याची काळजी वाटत आहे... याच त्यांच्या द्वेषातून अखेरच्या लढ्याच्या दोन्हीही कार्यक्षम नेतृत्वावर चिंता वाटणाऱ्या नेत्यांच्याकडून आणि त्यांच्या बगलबच्याकडून टीकाटिपण्या केल्या जात आहेत... त्यांच्या भाषणाचा अगदी शब्द न शब्द चाळून पहिला जात आहे... या महाराष्ट्रातील धनगर समाजाचा विश्वास या दोन्हीही कार्यक्षम नेतृत्वानी कधीच जिंकला आहे त्यामुळे एखाद्या शब्दछलमध्ये हा धनगर समाज अडकायला काय एवढा दुधखुळा नाही... या समाजाला चांगले माहित आहे कि यापूर्वी सामाजाच्या नावावर कोणी किती आमदारक्या आणि कोणी किती मंत्रिपदे लाटली आहेत... त्यामुळे समाजातील युवक आज जागृत झाला आहे... त्याला समजायला लागले आहे कोणते नेतृत्व खऱ्या अर्थाने समाजासाठी तळमळीने काम करत आहे, कोणते नेतृत्व महाराष्ट्रव्यापी होऊ शकते हे सर्व आजचा युवक जाणून आहे.खरंतर यावर बोलण्यासारखे बरेच आहे पण आताचा वेळ हा कोणावर टीकाटिपण्या करण्याचा नसून समजत नवचैतन्य निर्माण करून समाजाला अखेरच्या लढ्यात सहभागी करावयाचा आहे. त्यामुळे या विषयावर जास्त बोलणे उचित होणार नाही.
१ ऑगस्ट पासून चालू झालेला हा अखेरचा लढा तुमच्या माझ्यासारख्या नवयुवकाच्या हातात अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र भेटल्याशिवाय थांबणार नाही हे निशंक आहे. त्यामुळे आपल्या सारख्या सुशिक्षित युवा बंधू आणि भगिनींना एक नम्र विनंती आहे कि या अखेरच्या लढ्याची असणारी मुद्देसूद अभ्यासात्मक माहिती समाजातील तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचावावी... आणि येणाऱ्या ३१ ऑगस्टच्या आमखास मैदानावरील कार्यक्रमात सर्वांनी आल्या नंतरचे महत्व त्यांना समजावून सांगावे. मित्रानो औरंगाबाद मध्ये ३१ तारखेला ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे... त्यामुळे या ऐतिहासिक कार्यक्रमात आपण सर्वेसर्वानी येऊन या आरक्षणाच्या अखेरच्या लढाईत सहभागी व्हावे ही नम्र विनंती.

श्री. प्रतिक यमगर

गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८

देशातील आदर्श नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण ज्यांनी जगण्यातून दाखवून दिले ते आदरणीय असे व्यक्तिमत्व आ. गणपतराव देशमुख (आबासाहेब)






राजकारण म्हणजे भ्रष्टाचार, 'पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसाकमावण्याचा उद्योगअनेक नेत्यांची पोकळ आश्वासने अशी सर्वसामान्य लोकांच्या मनातील राजकारण्याविषयीची भावना झाली आहे परंतु मला ठामपणे सांगायला आवडेल ते म्हणजे या सर्वाना अपवाद व कोणत्याही वाद विवादात न पडता सर्वांशी मिळून मिसळून सर्वांशी आदराचे असे संबंध निर्माण करणारे देशातील आदर्श नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण ज्यांनी जगण्यातून दाखवून दिले असे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय आमदार गणपतराव (आबासाहेब) देशमुख साहेब यांचा आज वाढदिवस... त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम त्यांना सदा सर्वकाळ कोटी कोटी शुभेच्छा... आपणास उदंड आयुष्य लाभावे हीच आपल्या वाढदिनी मनस्वी सदिच्छा...

सध्याचा काळच असा आहे कीराजकारणात सगळीकडे दलदल माजली आहे,  जनतेचा नेत्यांवर  काडीचा भरोसा वाटत नाही. पांढऱ्या खादीतल्या कोणालाही हात लावा. भ्रष्टाचाराचं काळं हाताला लागल्याशिवाय राहत नाही. पण आपल्या राज्यात असा एक नेता आहेज्याच्यावर राखलेल्या तळ्याचं पाणी चाखल्याचे आरोप करायला कुणी धजावत नाही. या बिनडागी नेत्याचं नाव मा. गणपतराव देशमुख  म्हणजेच आदरणीय सन्माननीय आबासाहेब. त्यांच्या वयाला 91 वर्षे पूर्ण होत आहेत. हा 91 वर्षांचा तरुण माणूस गेली 11 निवडणुका सतत आमदार म्हणून निवडून येतोय. राज्याच्या विधानसभेत कष्टकरी, शेतकरी, कामगार, वंचित घटकांचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी राजकारणातले कित्येक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. ते बोलायला उभे राहिले की विधानसभा स्तब्ध होते. मुख्यमंत्र्यांपासून ते पहिल्यांदाच सभागृहात आलेल्या तरुण आमदारापर्यंत प्रत्येकजण त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतो. ते आहेतसोलापुरातल्या सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख. आबासाहेबांच्या राजकीय वाटचालीत गेल्या 55 वर्षांचा महाराष्ट्राचा सामाजिक आणि राजकीय इतिहास सापडतो.

             आमदारपद स्वतःच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी नाही तर जनता जनार्दनासाठी आहे हे त्यांनी जाणलं. आपलं तनमनधनसेवावेळशीलहृदय असं सगळं जनता जनार्दनाला अर्पण केलं. जनतेनंही त्यांना आपलं मानलं.  एवढं काम केलं पण आबासाहेब त्याविषयी फारसं बोलत नाहीत. आबासाहेबांचे काम हे फक्त सांगोल्यापुरतंच नाही. दुष्काळपाणीशेतीवीजमहागाईरोजगार हमी योजनाकापूस एकाधिकार योजनाशेतीमालाचे भाव अशा प्रश्नांवर त्यांनी राज्याला दिशा देणारं काम  केलं आहे. विधानसभेचे नियमविधानसभेने केलेले कायदे, संसदीय कामकाज पद्धतीवर आबासाहेबांचे प्रभुत्व आहे. नवे आमदार त्यांच्याकडून म्हणूनच सतत सल्ला घेत असतात. आबानी सकाळी वाजता कामाला सुरुवात केली की रात्री उशिरापर्यंत त्यांचे ते काम सुरू असतं. डोंगराएवढं काम करूनही `मी हे काम केलं.’ असं म्हणत नाहीत. सतत आम्ही केलं असं म्हणतात.  आजच्या काळात एखाद्या गावात काम करण्याच्या अगोदरच त्या कामाचे नारळ फोडले जातात. त्याची फलकबाजी गावभर केली जाते.. त्यामुळेच आबासाहेब या आजच्या आमदारापेक्षा वेगळे वाटतात ते यावरुनच... आणि यामुळेच जनता त्यांना सतत ५५ वर्षे साथ देते आहे.
राज्यातील इतर राजकीय आणि सहकार सम्राटांचा बडेजावत्यांचं वैभव, त्यांची खोटी आश्वासने एका बाजूला आणि आबासाहेबांचे साध राहणीमान, कोणताही बडेजाव नाही, सर्वसामान्य माणसामध्ये मिसळून त्यांची तळमळीने विचारपूस करणारे असे सन्माननीय आबासाहेब एका बाजूला आहेत म्हणूनच महाराष्ट्रातील तुमच्या माझ्या सारख्याच्या मनात आबासाहेबांची स्वच्छ प्रतिमा मनात घर केल्याशिवाय राहत नाही. त्यांच्यावर तळं राखलं पण पाणी चाखल्याचे आरोप कुणी करायला धजणार नाही. सध्या सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळलाय. अशा काळात आबासाहेबासारखासारखा बिनडागाचा नेता आपलं काम नेकीनं पुढे नेतोय. आज त्यांच्या वाढदिवसानिमित त्यांच्या असामान्य कर्तुत्वास मनापासून सलाम... खरंतर त्यांच्याविषयी किती जरी लिहिले, बोलले तरी मला मनातून ते कमीच वाटत आहे. शेवटी पुनश्च एकदा त्यांच्या वाढदिवसानिमित कोटी कोटी मनस्वी अश्या शुभेच्छा... आमच्या सारख्या आपल्या हितचिंतकाचे आयुष्य पाच दहा वर्ष कमी मिळावे आणि ते आपल्या सारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वास उदंड असं दीर्घायुष्य लाभावे हीच मनस्वी सदिच्छा आहे.



श्री. प्रतिक यमगर

आटपाडी, सांगली

७७०९९३५३७४



मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

अखेरचा लढा योग्य दिशेने पुढे वाटचाल करतोय ... गरज आहे ती आपल्या सहकार्याची....


दै. जनशक्ती या वर्तमानपत्रात वसंत घुले नामक पत्रकाराने दिलेली एक बातमी कालपासून सोशल मिडीयावर फिरताना दिसते आहे. या बातमीमध्ये राज्याभरातील युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, युवा हृद्यसम्राट मा. गोपीचंद पडळकर आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी हिरीरीने लढणारे सन्माननीय उत्तमराव जानकर यांच्या बाबत समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. १ ऑगस्ट ला पुण्यातील दुधाने लोन्सवर झालेल्या समाजाच्या अखेरच्या लढ्याला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर राज्य सरकार, मंत्री महोदय, आणि मोठ मोठ्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांना माहित आहे हा लढा लोकशाही मार्गाने आणि माहितीच्या आधारावर चालला आहे. या लढ्यातून सरकार अडचणीत सापडणार आहे. कारण या राज्यात धनगड नावाची जातच अस्तित्वात नसताना त्या जातीचे भूत धनगर समाजाच्या मानगुटीवर बसवले आहे.. त्यामुळे गेली 70 वर्षे धनगर समाज राज्यघटनेत मिळालेल्या आरक्षणच्या न्यायहक्कापासून वंचित राहिला आहे.
वरील बातमीमध्ये जानकर साहेब आणि पडळकर साहेब यांनी पवार साहेबांची भेट घेतली असल्याचे म्हटले आहे.. खरे तर राज्यातील तमाम समाज अश्या खोट्या बातमीवर विश्वास कधीच ठेवणार नाही... जर या बातमीमध्ये काही तथ्य असेल तर वर्तमान पत्राने अखंड समाजाला पुरावे द्यावेत अन्यथा समाजाच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागेल.
मित्रानो आदरणीय पडळकर साहेब आणि जानकर साहेब यांनी जो अखेरचा लढा चालू केला त्याला गट, तट, पक्ष आपल्यातील हेवेदावे विसरून आपण सर्वांनी साथ दिली आहे, देत आहोत यापुढे ती साथ वाढत राहणार आहे हे अनेक राजकीय नेत्यांच्या लक्षात आल्यामुळे अश्या बिनबुडाच्या बातम्या पसरवायचे काम काही विघ्नसंतोषी मंडळी करत आहेत.... पण मला पूर्ण विश्वास आहे कि अश्या बातम्यांना समाज कधीच भिक घालणार नाही.. तितका समाजाचा विश्वास आहे.
नवीन नेतृत्व जर समाजात तळमळीने उभे राहत असेल, समाजाच्या सर्वांगीण प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत असेल, अखेरचा लढा या आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणाच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्याचे आणि सडेतोड जाब विचारण्याचे काम करत असेल तर करुद्या ना यामध्ये इतर नेत्यांना वाईट वाटण्याचे कारण काय ?? हाच खरा सवाल राज्यातील तमाम समाजाला पडला आहे. आणि गोपीचंद पडळकर यांचा राजकीय संघर्ष हा काटेरी वाटेवरून अनवाणी पायांनी झालेला आहे अनेकांनी त्यांना यापूर्वी ही दाबण्याचा खूपवेळा प्रयत्न केला आहे पण हे नेतृत्व कधी दबले नाही न कधी झुकले नाही... राज्यातील समाजाचे नेतृत्व करेल इतकी धमक या माणसामध्ये आहे.. कदाचित त्यांच्या वक्तृत्व आणि कर्तुत्व यामुळे अनेकांना त्यांचे नेतृत्व आपल्यापेक्षा मोठे होईल ही भीती वाटते आहे त्यामुळे त्यांच्यावर अशा पद्धतीने चुकीच्या बातम्या आणि आरोप केले जात आहेत पण त्यांना माझे सांगणे आहे कि तुमच्या या कुटील कारस्थानांमुळे हे नेतृत्व पुढे जायचे कधीच थांबणार नाही. अर्थात कोंबड आरवतय म्हणून ते झाकलं तर ते आरवायचे कधीच थांबत नाही... म्हणून अशा प्रकारे समाजाची दिशाभूल करण्यापेक्षा समस्त धनगर समाजाने चालू केलेल्या अखेरच्या लढ्यात सर्व बंधू आणि भगिनींनी सर्व राजकीय मतभेद विसरून सहभागी व्हा.... हा अखेरचा लढा नक्कीच आपल्या हातात ST चे प्रमाणपत्र घेऊनच थांबला जाणार आहे. आणि शेवटची हात जोडून सर्वाना कळकळीची एक नम्र विनंती आहे कि आत्महत्या करून आपले इतके सुंदर असे मिळालेले ही जीवन आपण संपवून घरच्यांना असे आपल्यापासून असे परके करू नका ... त्यांना तुमची खूप गरज आहे त्यामुळे या अखेरच्या लढ्यात सहभागी व्हा नक्कीच यामुळे आपण आरक्षणच्या दिशेने नक्की जाऊ हा विश्वास मला आहे.
श्री. प्रतिक यमगर
आटपाडी, सांगली.
7709935374