🌷विवेक प्रहार🌷
आरपार प्रामाणिकता अन निरागसता …
महात्मा गांधींवर सगळ्यात जास्त विनोद आपल्या देशात होतात . मजबुरी का नाम महात्मा गांधी हा त्यातला लोकप्रिय विनोद . वास्तविक गांधींचे जीवन पहिले तर या माणसाला कोणतीच मजबुरी नव्हती पण तरीही मजबुरीचे नाव आपल्या देशात गांधी ठेवले जाते . या देशातले आंबेडकरवादी [कट्टर ] गांधींना आपला शत्रू मानतात बामसेफ , मूलनिवासी संघ वगैरे गांधी कसे खलनायक होते याचीच मांडणी करीत आले आहेत . गांधी हा असा माणूस आहे जो एकाच वेळी पुरोगामी अन प्रतिगामी यांचा शत्रू ठरला आहे .
लोक… नेते … वाटेल तेव्हा गांधीला वापरतात अन वाटेल तेव्हा फेकून देतात पण गांधीवर त्याचा तसूभरही परिणाम होत नाही . कधी पाकिस्तान निर्मिती तर कधी ५५ कोटीचे आरोप तर कधी मुस्लिम अनुनयाचे बालंट सहन करीत गांधी या आरोपांचे प्राणवायू मध्ये रुपांतर करून अमरत्वाकडे सरकत आहे . कोणे एकेकाळी अस्थिपंजर म्हाताऱ्याला नथुराम गोडसे नावाच्या तरुणाने मारले पण त्यानंतर सतत गांधीला मारण्यासाठी जोतो टपलेला असतो तरीही गांधी मरत नाही . गांधी मरत का नाही ? या प्रश्नाने आपल्या देशात काही जणांना वेड लागण्याची पाळी आली आहे तर काही लोक ठार वेडे झालेले आहेत . गांधी या सगळ्यांकडे पाहून निष्पाप बालकाचे निरागस हास्य फेकतो .
गांधींवर खूप आरोप झाले पण त्याने कशाचीही तमा न बाळगता आपले सत्याचे प्रयोग अव्याहत सुरु ठेवले . जीवनात जे जे केले ते मोठ्या मानाने काबुल पण करून टाकले . हो हो … व्यसने … सेक्स … सगळे काही . या आरपार प्रामाणिक पणाला अन निरागसतेला सलाम .
महात्मा गांधींवर सगळ्यात जास्त विनोद आपल्या देशात होतात . मजबुरी का नाम महात्मा गांधी हा त्यातला लोकप्रिय विनोद . वास्तविक गांधींचे जीवन पहिले तर या माणसाला कोणतीच मजबुरी नव्हती पण तरीही मजबुरीचे नाव आपल्या देशात गांधी ठेवले जाते . या देशातले आंबेडकरवादी [कट्टर ] गांधींना आपला शत्रू मानतात बामसेफ , मूलनिवासी संघ वगैरे गांधी कसे खलनायक होते याचीच मांडणी करीत आले आहेत . गांधी हा असा माणूस आहे जो एकाच वेळी पुरोगामी अन प्रतिगामी यांचा शत्रू ठरला आहे .
लोक… नेते … वाटेल तेव्हा गांधीला वापरतात अन वाटेल तेव्हा फेकून देतात पण गांधीवर त्याचा तसूभरही परिणाम होत नाही . कधी पाकिस्तान निर्मिती तर कधी ५५ कोटीचे आरोप तर कधी मुस्लिम अनुनयाचे बालंट सहन करीत गांधी या आरोपांचे प्राणवायू मध्ये रुपांतर करून अमरत्वाकडे सरकत आहे . कोणे एकेकाळी अस्थिपंजर म्हाताऱ्याला नथुराम गोडसे नावाच्या तरुणाने मारले पण त्यानंतर सतत गांधीला मारण्यासाठी जोतो टपलेला असतो तरीही गांधी मरत नाही . गांधी मरत का नाही ? या प्रश्नाने आपल्या देशात काही जणांना वेड लागण्याची पाळी आली आहे तर काही लोक ठार वेडे झालेले आहेत . गांधी या सगळ्यांकडे पाहून निष्पाप बालकाचे निरागस हास्य फेकतो .
गांधींवर खूप आरोप झाले पण त्याने कशाचीही तमा न बाळगता आपले सत्याचे प्रयोग अव्याहत सुरु ठेवले . जीवनात जे जे केले ते मोठ्या मानाने काबुल पण करून टाकले . हो हो … व्यसने … सेक्स … सगळे काही . या आरपार प्रामाणिक पणाला अन निरागसतेला सलाम .
श्री. पोपट यमगर
आटपाडी जि. : सांगली
7709935374
आटपाडी जि. : सांगली
7709935374
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा