अहमदनगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात एका नववीत शिकणार्या मुलीवर पाच हरामखोर नराधमांनी सामुहिक बलात्कार करुन अतिशय निघृण पद्धतीने तिच्या शरीराचे हालहाल करत तिची हत्या केली. ही बातमी वाचली, ऐकली, पाहिली आणि मन सुन्नच झाले. विचारांच काहुर माजलेल्या सैरभैर डोक्यामधे मेंदु धुमसत राहिला, आणि त्या धुमसणार्या मेंदुतुन छोट्या भगिनीवर झालेल्या अन्याय अत्याचारावर आपण आपली लेखणी उचलली पाहिजे असं मनाच्या गाभार्यातुन वाटलं म्हणुन लेखणी उचलली आणि त्या लेखणीतुन सणसणीत निघालेले प्रहार तुमच्यासारख्या संवेदनशील सुशिक्षीत आणि सुसंस्कृत वाचकांसमोर मांडत आहे.
संपुर्ण जगाच्या पाठीवर ईश्वराची सुद्धा स्त्रीरुपामधे पुजा करणारे बहुधा आपली एकमेव संस्कृती आहे. एवढेच नाहीतर आपण आपल्या देशाला भारतमाता म्हणतो. आपल्यासाठी ही मायभुमी आहे मातृभुमी आहे. पण सध्याच्या काही घटना (कोपर्डीसारख्या) पाहिल्या की मान शरमेने खाली जाते. तुमच्या माझ्या या संस्कृतीनं महान आसणार्या राज्यात, देशात स्त्रियावर होणारया अत्याचाराचे दिवसेंदिवस वाढणारे प्रमाण नक्कीच माझ्यातरी मनावर घावच घालुन जाते. आणि मग मनातुन काही हुंकार उमटत राहतात ते म्हणजे आमच्या या लिंगपिसाट झालेल्या हरामखोर नराधमांना नेमकं झालंय तरी काय??? जर खरंच यांना मर्दुनकीचा इतकाच घंमड आणि गर्व असेल तर या लिंगपिसाट झालेल्या हरामखोरांची मर्दानकी शांत करण्यासाठी छत्रपतींचाच कलम कायदा अंमलात आणावा लागेल. छत्रपतींच्या स्वराज्यामधे "स्त्री वर हात उचलणार्याचे म्हणजेच छेडछाड बलात्कार करणार्याचे हातपाय कलम केले जातील" असा सक्त आदेश होता. या आदेशासमोर सगळेच समान होते. हा आदेश गावच्या रांझ्या पाटलाने मोडला म्हणुन त्याचे हातपाय कलम केले गेले. आज घडत असलेल्या घटनावर सुद्धा आजच्या सरकारने छत्रपतीचे हे कलम अंमलात आणले पाहिजे असं माझं ठाम मत आहे.
आपल्या असल्या पौरुष्यार्थामध्ये असलेल्या नालायकीने आई-बापाला मान खाली घालायला लावण्यात कसला आला आहे पुरुषार्थ? हिजड्यासारखं वागणं आणि बोलणं असणारे हे कसले मर्द? मुलींना आचकट विचकट अश्लील बोलण्यात आणि छेडण्यात कसली आलीय मर्दानगी? ... मर्द तर ते होते ज्यांनी स्वतःचे जीवन राष्ट्राचे जीवन बनवले. देशासाठी, समाजासाठी, अखंड आयुष्य वेचले. अत्यंत नितीमान जीवन जगत राजा असतांनाही राज्याचा उपभोग न घेता केवळ रयतेसाठी स्वराज्य निर्माण करणारे शिवाजीराजे मर्द होते. आपली ही अनादीकालीन भारतीय संस्कृती ही जगभरामधे पोहचविणारे स्वामी विवेकानंदजी मर्द होते, रोज मरणप्राय यातना सोसत औरंग्याच्या अमिषांना लाथाडुन मृत्यूवर विजय प्राप्त करणारे संभाजीराजे मर्द होते. स्वतःचे तारुण्य क्रांतिच्या लढ्यात भिरकावून देणारे, अनेक सुंदर सुंदर तरुणी मागे लागल्या असताना त्यांच्याकडे पाठ फिरवून स्वातंत्र्यासाठी तारुण्य खर्च करत हसत हसत फासावर जाणारे भगतसिंह, सुखदेव, राजगुरु मर्द होते. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून इंग्रजाना टक्कर देणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई मर्द होती. चहुबाजुंनी कौटुंबिक दुःखे कोसळत असतानाही माळव्यावर सल्लग तीस वर्ष राज्य करणार्या लोकमाता अहिल्यादेवी मर्द
होत्या असे असंख्य मर्द या भारताच्या मातीत जन्मास आले. या तमाम मर्दांच्या कर्तृत्वाने पावन झालेली ही भुमी सध्याच्या हुल्लडबाज आणि लफडेबाज युवावर्गामुळे कलंकीत होत आहे. व्यसनाधीन, वासनांध, पाश्चात्यांच्या भोगवादी अश्लील संस्कृतीच आकर्षण, मुलींना आचकट विचकट बोलणं, गुंडगिरी अशा बिघडणार्या तरुणाईला या देशाची माती आणि इतिहास गालाखाली सणसणीत चपराक देऊनच सांगावाच लागेल. आपल्यासारख्या नवयुवकांनी आपली ही माती आणि माता समग्र बुद्धीने समजाऊन घेतली पाहिजे. आणि जर कोणी नराधम चुकीचे वागत असल्यास तिथेच ती प्रवृत्ती ठेचुन काढली पाहिजे आणि पुन्हा त्याचं स्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहण्याचं धाडसही झालं नाही पाहिजे. समाजातील चांगली माणसंच कोपर्डीसारख्या घटना भविष्यात रोखु शकतील. नाहीतर सरकारने कितीही कठोर कायदे केले तरीही ही अमानुष प्रवृत्ती सहजासहजी थांबेल अशी सुतराम
कोणतीही शक्यता नाही. अशा घटनांच्याबद्दल मुळात समाजातुनच जागृती हवी आहे आणि जर आपणासारख्या सुशिक्षीत आणि सुसंस्कृत युंवकांनी ती समाज जागृतीची
मशाल हाती घेतली तरच उदयाचा वैभवशाली आणि अत्याचारमुक्त चांगला समाज उभा राहु शकेल असं मला वाटतं.
धन्यवाद...
✍✍✍✍✍✍पोपटराव यमगर
आटपाडी, सांगली
०७०९९३५३७४
संपुर्ण जगाच्या पाठीवर ईश्वराची सुद्धा स्त्रीरुपामधे पुजा करणारे बहुधा आपली एकमेव संस्कृती आहे. एवढेच नाहीतर आपण आपल्या देशाला भारतमाता म्हणतो. आपल्यासाठी ही मायभुमी आहे मातृभुमी आहे. पण सध्याच्या काही घटना (कोपर्डीसारख्या) पाहिल्या की मान शरमेने खाली जाते. तुमच्या माझ्या या संस्कृतीनं महान आसणार्या राज्यात, देशात स्त्रियावर होणारया अत्याचाराचे दिवसेंदिवस वाढणारे प्रमाण नक्कीच माझ्यातरी मनावर घावच घालुन जाते. आणि मग मनातुन काही हुंकार उमटत राहतात ते म्हणजे आमच्या या लिंगपिसाट झालेल्या हरामखोर नराधमांना नेमकं झालंय तरी काय??? जर खरंच यांना मर्दुनकीचा इतकाच घंमड आणि गर्व असेल तर या लिंगपिसाट झालेल्या हरामखोरांची मर्दानकी शांत करण्यासाठी छत्रपतींचाच कलम कायदा अंमलात आणावा लागेल. छत्रपतींच्या स्वराज्यामधे "स्त्री वर हात उचलणार्याचे म्हणजेच छेडछाड बलात्कार करणार्याचे हातपाय कलम केले जातील" असा सक्त आदेश होता. या आदेशासमोर सगळेच समान होते. हा आदेश गावच्या रांझ्या पाटलाने मोडला म्हणुन त्याचे हातपाय कलम केले गेले. आज घडत असलेल्या घटनावर सुद्धा आजच्या सरकारने छत्रपतीचे हे कलम अंमलात आणले पाहिजे असं माझं ठाम मत आहे.
आपल्या असल्या पौरुष्यार्थामध्ये असलेल्या नालायकीने आई-बापाला मान खाली घालायला लावण्यात कसला आला आहे पुरुषार्थ? हिजड्यासारखं वागणं आणि बोलणं असणारे हे कसले मर्द? मुलींना आचकट विचकट अश्लील बोलण्यात आणि छेडण्यात कसली आलीय मर्दानगी? ... मर्द तर ते होते ज्यांनी स्वतःचे जीवन राष्ट्राचे जीवन बनवले. देशासाठी, समाजासाठी, अखंड आयुष्य वेचले. अत्यंत नितीमान जीवन जगत राजा असतांनाही राज्याचा उपभोग न घेता केवळ रयतेसाठी स्वराज्य निर्माण करणारे शिवाजीराजे मर्द होते. आपली ही अनादीकालीन भारतीय संस्कृती ही जगभरामधे पोहचविणारे स्वामी विवेकानंदजी मर्द होते, रोज मरणप्राय यातना सोसत औरंग्याच्या अमिषांना लाथाडुन मृत्यूवर विजय प्राप्त करणारे संभाजीराजे मर्द होते. स्वतःचे तारुण्य क्रांतिच्या लढ्यात भिरकावून देणारे, अनेक सुंदर सुंदर तरुणी मागे लागल्या असताना त्यांच्याकडे पाठ फिरवून स्वातंत्र्यासाठी तारुण्य खर्च करत हसत हसत फासावर जाणारे भगतसिंह, सुखदेव, राजगुरु मर्द होते. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून इंग्रजाना टक्कर देणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई मर्द होती. चहुबाजुंनी कौटुंबिक दुःखे कोसळत असतानाही माळव्यावर सल्लग तीस वर्ष राज्य करणार्या लोकमाता अहिल्यादेवी मर्द
होत्या असे असंख्य मर्द या भारताच्या मातीत जन्मास आले. या तमाम मर्दांच्या कर्तृत्वाने पावन झालेली ही भुमी सध्याच्या हुल्लडबाज आणि लफडेबाज युवावर्गामुळे कलंकीत होत आहे. व्यसनाधीन, वासनांध, पाश्चात्यांच्या भोगवादी अश्लील संस्कृतीच आकर्षण, मुलींना आचकट विचकट बोलणं, गुंडगिरी अशा बिघडणार्या तरुणाईला या देशाची माती आणि इतिहास गालाखाली सणसणीत चपराक देऊनच सांगावाच लागेल. आपल्यासारख्या नवयुवकांनी आपली ही माती आणि माता समग्र बुद्धीने समजाऊन घेतली पाहिजे. आणि जर कोणी नराधम चुकीचे वागत असल्यास तिथेच ती प्रवृत्ती ठेचुन काढली पाहिजे आणि पुन्हा त्याचं स्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहण्याचं धाडसही झालं नाही पाहिजे. समाजातील चांगली माणसंच कोपर्डीसारख्या घटना भविष्यात रोखु शकतील. नाहीतर सरकारने कितीही कठोर कायदे केले तरीही ही अमानुष प्रवृत्ती सहजासहजी थांबेल अशी सुतराम
कोणतीही शक्यता नाही. अशा घटनांच्याबद्दल मुळात समाजातुनच जागृती हवी आहे आणि जर आपणासारख्या सुशिक्षीत आणि सुसंस्कृत युंवकांनी ती समाज जागृतीची
मशाल हाती घेतली तरच उदयाचा वैभवशाली आणि अत्याचारमुक्त चांगला समाज उभा राहु शकेल असं मला वाटतं.
धन्यवाद...
✍✍✍✍✍✍पोपटराव यमगर
आटपाडी, सांगली
०७०९९३५३७४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा