लाखो मावळ्यांच्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची आज 419 वी जयंती...
जयंती निमीत्त त्यांच्या स्मृतीस
विनम्र अभिवादन..
"जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते झाले शिवराय नी शंभू छावा…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसता मिळाला स्वराज्य ठेवा…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते लढले मावळे…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते दिसले विजयाचे सोहळे…!"
महाराष्ट्रासह भारत देश ज्यावेळी सततच्या परकीय आक्रमणाच्या वर्चस्वाखाली भरडला गेला होता, ज्यावेळी इथल्या माणसांच्या शरीरात ताकद होती पण स्वाभिमान शून्य होऊन दररोजची गुलामासारखी जीवन जगत होता, त्यावेळेला इथल्या गोरगरीब वंचित, सर्वसामान्य शेतकरी, मावळे यांना राजमाता जिजाऊनीं स्वराज्याचा विचार दिला. आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्य स्थापन केले.
आज वर्तमानात अनेक वेळा बोलले जाते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जर जन्मास यावयाचे असतील तर माँसाहेब जिजाऊ सारख्या आदर्श माता निर्माण होणे गरजेचे आहे. त्या आदर्श माता घडवण्यासाठी व दररोज आपल्या माता भागीनींवरील होणाऱ्या अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी आपण सुशिक्षित आणि संपन्न समाज
होऊया हीच राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या जयंती दिनी मनोमनी सदिच्छा..
धन्यवाद....
✍✍पोपट यमगर
बाळेवाडी ता. आटपाडी
जि. सांगली
7709935374
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा