विवेक विचार

विवेक विचार

गुरुवार, २ मार्च, २०१७

लोकसत्ताच्या ब्लॉगबेंचर्स मध्ये या आठवड्यातील 'घराणेशाहीची गरज ' या विषयावर मी व्यक्त केलेलं माझं मत...

शेतकरी सुखी तर जग सुखी" हि संकल्पना सोशल मीडियाच्या संदेशामधून आपण दररोज वाचतो. भारतातील शेतकऱ्याला मुळात बाजारपेठेचे अज्ञान आहे या अज्ञानाचा फायदा घेऊन आजपर्यंत बाजारातील मधल्या दलालांनी अनेकवेळा शेतकऱ्याचे आर्थिक शोषण केले आहे. शेतकऱ्याचे सर्वात मोठे दुर्दैव असे आहे कि ज्यावेळी शेतकऱ्याचा शेतमाल शेतात असतो त्यावेळी त्याचे बाजार भाव जास्त असतात. आणि शेतमाल बाजारपेठेत विकण्यासाठी आणला असता त्या शेतमालाचे बाजारभाव व्यापाऱ्यांच्याकडून मुद्द्दामहून पडले जात जातात. भारतातील विविध पक्षांच्या कडून शेतकरी आणि शेती हा विषय नेहमीच सवेंदनशीलतेने मांडला जातो. अर्थात भारतातील सर्वात मोठा वर्गापैकी शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात शेतकऱ्यास अनेक समस्या अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकरी शेतीमध्ये राब राब राबतो आणि शेतकऱ्यास त्यांच्या घामाचा मोबदला हि मिळत नाही हि सर्वात मोठं दुदैव म्हणावं लागेल. शेतकऱ्याला बाजारपेठेच्या अपुऱ्या ज्ञानामुळे शेतकरी भरडला जात आहे. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो, हे वाक्य लहानापासून आपण विविध अभ्यासक्रमातून अभ्यासले असेल, वर्तमानपत्रातून वाचले असेल, विविध नामवंत वक्त्यांच्या भाषणातून आजपर्यंत अनेकवेळा ऐकले असेल. आज शेतकऱ्यास बँकेतून कर्ज घ्यायला गेला तरी तिथले अधिकारी हि शेतकऱ्यास वेठीस धरतात. शेतकऱ्यास बँकिंग प्रणालीची माहिती हि अपुरी असते. अशी सर्वकाही परिस्थिती असताना पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या शेती व्यवसायात शेतकऱ्याची पुढची शेतीतून बाहेर पडत आहे या स्वामिनाथन यांच्या मतांशी मी 100% सहमत आहे. लहानपणापासून मोठे होत असताना शेती मध्ये राब राब राबणारा आमचा शेतकरी बाप पाहिल्यावर आमच्या कोणत्या शेतकरी बापाच्या पोराला त्यांच्या बापासारखेच काबाड कष्ट करण्यासाठी शेती करावी वाटेल?? एवढे सारे काबाड कष्ट करूनही शेतकऱ्याला साधा त्याच्या घामाचा मोबदला हि भेटत नाहीच नाही वरून त्याने घातलेला उत्पादन खर्चही भेटत नाही ही सत्य वस्तुस्थिती आहे. आमच्या भारतातील शेतकरी बापाविषयी बोलले जाते ते म्हणजे भारतीय शेतकरी कर्जातच जन्मतो, कर्जातच जगतो, कर्जातच मरतो... अशी समोर परिस्थिती असताना कोणत्याही शेतकऱ्याच्या पोराला आपली पिढ्यांनपिढ्याची शेतीतील घराणेशाही पुढे न्यावी वाटणार नाही. सर्वच राजकारणी शेतकाऱ्याबद्दल निवडणुकां काळामध्ये खोटी आणि दांभिक सहानुभूती दाखवत असले तरी प्रत्यक्षात त्याच्या पदरात काहीच पडत नाही . शेतकऱ्याला बाजारपेठ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान फार कमी प्रमाणात दिसून येते. आज वकिलाच्या पोराला वकील, इंजिनियर च्या पोराला इंजिनियर शिक्षकाच्या पोराला शिक्षक व्हावेसे वाटते पण शेतकऱ्याच्या पोराला कधीच शेतकरी व्हावेसे वाटत नाही ही दुर्दैवी शोकांतिका आहे. याचे कारण स्वातंत्र्यानंतरही शेतकऱ्याच्या दारिद्र्याच्या अवस्थेत फार फरक पडला आहे असे म्हणता येणार नाही. आज अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जमीन विकून दुसरा व्यवसाय करण्याचा पर्याय निवडला आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी यासाठी प्रत्येक अधिवेशनात त्यावर खडाजंगी होत असल्याचे आपणा सर्वाना दिसून येते. पण कर्जमाफी सारखे वरवरच्या मलमपट्टीचे उपाय योजण्यापेक्षा त्या शेतकऱ्यावर कर्ज मागायची वेळच येऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राजकारणातील घराणेशाही वाढत असताना शेतीतील घराणेशाही कमी होत आहे हा विरोधाभास आपल्या सर्वांच्या डोळ्यात चक्क अंजन घालून जातो. अर्थात जर भविष्यात अश्या पद्धतीने शेतीतील घराणेशाही कमी झाली तर संपूर्ण जगाला अन्न कोण पुरविणार ??? या प्रश्नांची उत्तरे मिळणे कठीण आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: