विवेक विचार

विवेक विचार

शनिवार, २७ मे, २०१७

महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी संपूर्ण शरीरातील ताकदीने निस्वार्थीपणे लढणारा तमाम शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने स्वाभिमानी असणारा स्वाभिमानी नेता खासदार आदरणीय  राजू शेट्टी साहेबांचा गेल्या तीस वर्षातील संघर्षमय प्रवास आपल्या सर्वाना माहीतच आहे. *शिवार ते संसद* हे त्यांचे आत्मचरित्र प्रत्येक  शेतकरी सुपुत्राने वाचावे असेच आहे. मी ही ते चरित्र वाचत असताना बेभान झालो . राजू शेट्टी या माणसावर स्वतःच्या सुख दुःखाची, घरादाराची परवा न करता तन, मन, धनासह इतका जीव ओवाळून  टाकतात हे खरंतर फार कमी नेत्यांच्या वाट्याला येतं.
       *30, 35 वर्षानंतरही त्यांचा लढाऊ बाणा, शेतकऱ्याविषयीची तळमळ कधीच कमी झालेली दिसून येत नाही.* आजच्या परिस्थितीत काही नेते सुरवातीला प्रस्थापिताविरुद्ध टीका करतात आणि पुन्हा त्याच  प्रस्थापितांशी, सत्ताधाऱ्याशी तडजोड करून  पाच दहा  वर्षाच्या तत्वनिष्ठ राजकारणाला तिलांजली वाहतात. पण याला अपवाद म्हणजे आदरणीय राजू शेट्टी साहेब आणि आमदार बचु कडू साहेब...  ही चळवळीतुन पुढे आलेली तुमच्या माझ्या सारख्या सर्वसामान्य बहुजन, वंचित कुटुंबातून पुढे आलेली नेतृत्व आहेत. त्यांची बांधीलकी ही नेहमी शेतकरी आणि वंचित घटक आणि विस्थापित समाज यांच्याशी असते.   राजू शेट्टी साहेब काय आज राजकारण, समाजकारण करत नाहीत. गेली 30- 40 वर्ष राजकारण आणि समाजकारण करत आहेत. पंचायत समिती सदस्यापासून सुरू झालेला प्रवास आज देशाच्या संसदेचा सदस्य होण्यापर्यत मारलेली मजल नक्कीच प्रेरणादायी अशीच आहे.... त्यामुळे भाजपच्या नेत्यानी त्यांना संपवण्याचा प्रयत्नही करू नये तो उलट तुमच्यावरच उलटेल यामध्ये माझ्या मनात तरी शंका नाही.  पाठीमागचे काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार शेतकऱ्यांविषयी  उदासीन   धोरणे राबवत असल्यामुळे राजू शेट्टी साहेब यांनी बहुजनहृद्यसाम्राट गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या मध्यस्तीवरून  शेतकऱ्यांच्या काही मागण्यासह भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी ला पाठिंबा दिला. त्यापैकी प्रमुख मागण्या म्हणजे *स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी केंद्र सरकारने स्वीकारव्यात(शेतमालास दीडपट हमी भाव) आणि शेतकऱ्याचा सात बारा कोरा करावा या होत्या.  मोदीजींनी या मागण्या  सत्ता आल्यानंतर पूर्ण करतो हे आश्वासन दिले होते.  मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली पण शेतकऱ्याची आश्वासने काय पूर्ण केली नाहीत. महाराष्ट्रात भाजपची सत्ता येण्यामध्ये राजू शेट्टींचा मोठा वाटा आहे सत्ताधार्यांना कधीच विसरून चालणार नाही. सत्ताधार्यांनी ही आश्वासने पूर्ण करण्याऐवजी शेतकर्याना शिव्या देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करते आहे ही  शेतकऱ्यांची सर्वात मोठी शोकांतिका आहे.
         * शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी पूर्ण करण्यास सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आदरणीय राजू शेट्टी यांनी पुण्याच्या महात्मा फुले वाड्या पासून ते महाराष्ट्र राज्यपालांचे मुंबईतील  निवास म्हणजेच राजभवन पर्यंत पायी आत्मक्लेश यात्रा काढण्याचा निर्णय घेतला . 22 मार्च पासून सुरू झालेली ही यात्रा आज अंतिम टप्यात आली आहे. राजू शेट्टी आणि त्यांच्यासोबत असलेल्या शेतकऱ्यांचा त्याग ह्या महाराष्ट्रातील निरडावलेल्या सरकारने राजकारण सत्ताकारण बाजूला ठेऊन खुल्या मनाने समजावून घेणे गरजेचे आहे. उसदरासाठी, स्वाभिमानीची आंदोलने कशी असतात हे महाराष्ट्रासह देशाला माहीत आहे. त्यामुळे स्वाभिमानी कार्यकर्ता आणि शेतकरी बांधव तळमळीने, त्यागाने मुंबईकडे चालला आहे म्हणजे तो शांत आणि अहिंसात्मक आहे असे सत्ताधार्यांनी समजू नये. त्यांच्या संतापाचा स्फोट झाल्यावरती मंत्रालयातील अनेक मंत्र्यांनाही घाम फुटेल. राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेला माध्यमे सॉफ्ट कॉर्नर देत  असल्याचे दिसून येते...  ज्या दाखवतात त्या फक्त शेतकर्यांमध्ये फूट निर्माण व्हावी ह्याचपद्धतीने दाखवत आहेत. माध्यमांनी सत्ताधाऱ्यांची भटगिरी करण्यापेक्षा शेतकरी, वंचित सर्वसामान्य जनता यांच्यासारख्या वंचित घटकांच्य बाजूने ठामपणे उभे राहून सत्ताधार्यांना सडेतोड प्रश्न विचारले गेले पाहिजेत. त्यामुळे माध्यमे सुद्धा निपक्षपातीपणे व्यक्त होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे .
           
   आदरणीय राजू शेट्टींची स्वाभिमानी  आत्मक्लेश यात्रा जस जशी मुंबईकडे पुढे वाटचाल करत राहील तस तसे सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले  जाणार आहेत. त्यामुळे ज्यां शेतकऱ्यांना शक्य आहे त्या सर्वांनी राहिलेल्या दोन तीन दिवसांमध्ये आत्मक्लेश पदयात्रेत सहभागी होऊन शेतकऱ्यांची ताकद या निर्दावलेल्या सरकारला दाखवून दिली गेली पाहिजे आणि आपण सर्व स्वाभिमानी शेतकरी  एकजुटीने एकत्र येऊन आपली  ताकद  या मस्तवाल सरकारला दाखवून नक्की द्याल ही आशा  आहे.

धन्यवाद...
✍पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. - सांगली.
7709935374

मंगळवार, २ मे, २०१७

सत्ताधार्यांना शेतकऱ्यांचा आणि त्यांचा मुलामुलींचा आक्रोश ऐकू येत नाही का????

     आजच्या सरकारसमोर आमच्या शेतकरी बांधवाने कितीही आरडून ओरडून सांगितले तरी सरकार ऐकायला काय तयार नाही. राज्यातील सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा उद्योगपतीच्या प्रश्नांची जास्त काळजी आहे. खरंतर आम्ही जी शेतकऱ्याची वस्तुस्थिती मांडण्याचा आणि ती सरकारपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतोय तो प्रामाणिक पणे करतोय...    आम्हाला कोणत्या पक्षाची दलाली करायची नाही आहे. काही आमच्या (राजकीय पक्षाच्या) मित्रांना वाटते की आम्ही त्यांच्या पक्षाविरोधात टीकात्मक लेखन करतोय. खरंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करून  समग्र मांडत असताना या कार्यकर्त्यांचा आमच्या लेखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा संकुचित स्वरूपाचाच आहे. परंतु अश्या आंधळ्या भक्तांना  मला सांगायचे आहे की शेतकऱ्यांची वास्तविक परिस्थितीतील अवस्था मांडणे हे आमचे कर्तव्य आहे. ती काल मांडत होतो आज मांडतोय आणि उद्याही मांडू. मग राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असो त्याने आमच्यावर काहीही फरक पडणार नाही.  तीन वर्षांपूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सरकार  असतानाही आम्ही शेतकार्यासारख्या वंचित घटकांचे प्रश्न मांडलेले आहेत. त्यामुळे आंधळ्या भक्तांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की आपण पहिले  शेतकऱ्यांची मुले आहोत आणि मग नंतर कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते, नेते आहोत. त्यामुळे तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका अवश्य मांडा पण त्यांची वकिली आणि दलाली करण्याचा प्रयत्न करू नका .  त्यामुळे  या राज्यातील आम्ही शेतकऱ्यांची  हजारो पोरं आज शेतकऱ्यांची वकिली आणि  दलाली सोशल मीडियाच्या माध्यमातून करत  आहोत. कोणाला आवडो आगर न आवडो पण आमची बांधीलकी ही शेतकऱ्यांशी आहे. कोणत्याही पक्षाशी आणि नेत्यांशी तर अजिबातच नाही. आमचे कोणत्याही राजकीय पक्षाशी मित्रत्व ही नाही आणि शत्रुत्व ही नाही. आमचा विरोध आहे तो फक्त राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या चुकीच्या धोरणाला....  आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे जाणीवपूर्वक होत असलेल्या दुर्लक्षाला......      त्यामूळे   झोपेची सोंग घेतलेल्या या मस्तवाल सरकारला आम्ही आमच्या परीने जागे करण्याचा प्रयत्न करतोय .........
                    मला माहित नाही किती जणांना आम्ही निरपेक्ष भावनेने लिहिलेले अभ्यासात्मक सणसणीत आणि वस्तुनिष्ठ लेख आवडतात.  परंतु सत्य आणि वस्तू स्थिती मांडलेली अनेकांना  झोबंते. अर्थात म्हणतात ना नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सत्य हे नेहमी कटू वाटते ....  काही निवडणुका मध्ये यश मिळाले म्हणून हवेत असलेल्या सत्ताधार्यांनीं शेतकऱ्यांवरील  वास्तविक परिस्थितीचे भान ठेवावे आणि आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी सारखे निर्णय त्वरित घ्यावेत. जर या महाराष्ट्रातील शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी नक्कीच उद्योग धार्जिनी सरकारला जमिनीवर आणेल यामध्ये माझ्या मनात तरी कोणतीच शंका नाही.   आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या कडून शेतकऱ्याची  कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकऱ्यांची  कर्जमुक्ती करू अशी दूरदृष्टी कोणाची भूमिका घेतली जात आहे. या भूमिकेचं अर्थात स्वागत आहे परंतु ज्याप्रमाणे एखाद्या रोगी व्यक्तीचा संपूर्ण रोग बरा होण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या  शस्त्रक्रिया कराव्या लागतात तेव्हाच संपूर्ण रोग भविष्यकाळात बरा होण्यास मदत होते  त्याचप्रमाणे शेतकऱ्याची कर्जमुक्ती करत असतांना सरसकट कर्जमाफी न करता  काही अटी आणि शर्तीच्या आधारे कर्जमाफी करणे अत्यंत गरजेचे आहे तरच शेतकरी हळू हळू कर्जमुक्त होण्यास मदत होईल. ....  
              राजकीय पक्ष हे नेहमीच स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी जातीच्या आणि धर्माच्या नावावर लोकांना फसवुन  मतांची झोळी भरून घेतात आणि मग पाच वर्ष अश्या पद्धतीने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष  करून भांडवलदारासाठी राज्य चालवायचे काम करतात . यामुळे आम्ही  जागृत असले पाहिजे. आजपर्यंत सत्ता असताना ज्यांनी अनेक घोटाळे, भ्रष्टाचार करून स्वतःची घरे भरून घेतली तेच आज संघर्ष(कोणता???)   यात्रा काढत आहेत. अर्थात यांचा दुट्टपीपणा  महाराष्ट्र चांगलाच जाणून आहे त्यामुळे  या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधकाकडे अजूनही आमचा शेतकरी गांभीर्याने आणि विश्वासार्हतेने पाहत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मध्ये सत्ताधार्यांना यश मिळाले राज्यातील राज्यातील मतदारांनी दगडापेक्षा वीट मऊ मानली एवढाच काय तो  फरक....    

               या सर्व अंदागोंदीमध्ये निवडणुकांच्या अगोदर भाषणातून प्रस्थापितांच्यावर सणसणीत टीका करणारे  विस्थापितांचे कैवारी मात्र तोंड उघडायला तयार नाहीत.(आदरणीय खासदार राजू शेट्टी आणि आमदार बचू कडू यासारख्या काही नेत्यांचा अपवाद वगळता) ही आमच्या शेतकऱ्यांची सर्वात मोठी शोकांतिका आहे.  अर्थात विस्थापितांचे प्रश्न मांडता मांडता तेच कधी प्रस्थापित झाले हेच आमच्या सारख्या विस्थापित कुटुंबातील मुलांच्या लक्षात आले नाही.     त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही.      ..........     आणि एक सर्वात महत्वाचे म्हणचे पाणी फाउंडेशन आणि नाम फाउंडेशन यांच्या माध्यमातून आणि लोकसहभागाने केलेल्या कामांचे श्रेय हे सत्ताधार्यांनी घेण्याचा प्रयत्न अजिबात करू नये..  गावकऱ्यांनी त्यांच्या कष्टाच्या आणि एकतेच्या जोरावर तसेच पाणी फाउंडेशन आणि नाम फाउंडेशन   च्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात चांगले काम केले आहे. ते सत्ताधार्यांनी त्यांनी तीन वर्षांच्या काळात शेतकऱ्यांचा विकास केला ते सांगू नये. ....  
               कालच महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात राज्यभर आपण सर्वांनी साजरा केला.  महाराष्ट्र दिनी या सत्त्ताधारी सरकारने आमच्या शेतकरी बांधवाला दीन करू नये हीच सदिच्छा....  त्यासाठी लवकरच कर्जमाफी जाहीर करावी ही आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने माफक अपेक्षा.......
.✍पोपट यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी
 जि. सांगली
7709935374
popatgyamgar.blogspot.com