मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

गोरगरिबांचा कैवारी, सर्वसामान्य लोकांचा संरक्षक, दानवांचा गुंडाचा सर्वनाश करणारा, कृष्णाकाठचा ढाण्या वाघ म्हणजेच आदरणीय बापु बिरू वाटेगावकर (आप्पा)*



आज अचानक दुपारी एकच्या  सुमारास सोशल मिडिया वरुन  एक  बातमी  येऊन  धडकली. बापु  बिरू  वाटेगावकर  यांचे  निधन ... बातमी आली आणि बातमी  सोशल  मीडियावरिल असल्याने  सर्वप्रथम  चौकशी केली.. बातमी  खरी आहे असे समजताच  थोडा  वेळ स्तब्ध  झालो.. आणि बापू बिरू वाटेगावकर यांच्या  विषयी  असंख्य आठवणी मनात  येऊन  गेल्या..  बापू बिरू वाटेगावकर म्हटले की  आमच्या समोर  चित्र उभा राहतं ते म्हणजे धिप्पाड  शरीर यष्टीचा माणूस,  सांगली कोल्हापूर  च्या तांबड्या मातीतील रांगडा गडी,  पिवळा फेटा , धोतर !  शर्ट आणि  पायात कोल्हापुरी पायताण असा पेहराव असणारा माणूस ....
ज्यावेळी बोरगाव  आणि आजबाजुच्या  गावात  रंगा  शिंदे आणि त्यांच्या गुंडांनी दिवसा  ढवळ्या  थैमान घातलं होतं , आया  बहिणीवर  अन्याय अत्याचार बलात्कार करून अब्रू लुटुन  मारून  टाकलं  जायचं,   गोरगरीबांच्या  घरांवर  दरोडे टाकून त्यांना लुटलं  जायचं,  त्यांच्या विरोधात ब्र जरी  कोणी  काढला  तरी  त्याला ठार  मारलं  जायचं,  त्यावेळी अश्या अन्यायग्रस्थाच्या,  गोरगरीबांच्या,  पीडितांच्या,  दीनदुबळ्यांच्या  पाठीमागे ठामपणे  भाऊ बाप  म्हणून उभा राहिला  तो म्हणजे बापु  बिरू वाटेगावकर अर्थात  आदरणीय  आप्पा ....
आप्पांनी दारूमुळे, हुंड्यामुळे , सासरच्या  त्रासामुळे  उद्वस्त  झालेले अनेक संसार रुळांवर  आणले. खरंतर  आप्पा  गावात  कोणतंही  वैर असू  नये,  भावभावकीत कोणतेही  वाद  नसावेत गावात बंधुत्वाचे  मित्रत्वाचे  संबंध  असावे याच  मतांचे होते. परंतु  वासनेने आणि मस्तीने  बरबटलेल्या  रंगा  शिंदे आणि  त्यांने  पोसलेल्या  गुंडांना गावावर  दहशत  गाजवायची  होती. वासना  भागवायचा होत्या त्यासाठी  गावांतील  मुलींच्यावर  अन्याय  केले  जायचे... आप्पांनी  अनेकवेळा  सांगून  समजाऊन  पाहिले  पण  काय  ऐकले  नाही  म्हणून  शेवटी  त्याचा   कोथळा  बाहेर  काडला...  त्यांच्यानंतर  गावांतील  हे वैर  चालू  झाले  तरीही  आप्पांनी  हे मिटविण्याचे  वारंवार  प्रयत्न  करूनही  तो अयशस्वी  झाला...  सहयाद्रीच्या  खोऱ्यात  बापू बिरू  वाटेगावकर कित्तेक वर्ष  राहत  होते. पोलिसांचे जे ब्रीदवाक्य  आहे ते म्हणजे 'सदरक्षणाय  खलनिग्रहनाय' (सज्जनांच रक्षण दुर्जनांचा  नाश ) मला  वाटत हे तत्व  आप्पा  अखंड  आयुष्य  जगले  असे म्हटले  तरी  काय वावगे ठरणार नाही.
 आप्पा नेहमी म्हणायचे,
 "कल्पव्रुक्षाखाली  बसुन  झोळीला गाठी  मारायच्या  नसतात... तुम्हाला  बापू  कळला  न्हाय, तुम्हांलाच  न्हाय,   कित्येकाना कळला  न्हाय...
विचारा  या झाडांना, पानांना,  फुलांना, पाखरांना... विचारा  त्या  वाऱ्याला... बापू  बिरू  वाटेगावकर कोण  होता ?
मेंढरं  हाकायची घुंगराची काठी सोडूं त्यानं  बंदूक  हातात का घेतली?"
या  प्रश्नांची  उत्तरं  मिळविण्याचा  प्रयत्न  जो  कोणी सुशिक्षीत सुजान युवक  करेल  त्याला  बापू  बिरू  वाटेगावकर ही  व्यक्ती आणि  शक्ती समजल्याशिवाय राहणार नाही.
न्यायालयाने  सुनावलेली  जन्मठेपेची  शिक्षा भोगून आल्यानंतर  त्यांनी
महाराष्ट्रातील  तमाम  युवकांना  व्यसनापासून  दूर  राहण्यास  सांगतिले  आणि  त्याबद्द्ल  वेळोवेळी खेड्यापाड्यांत जाऊन  प्रवचन देणारे  आप्पा  आपल्याला मार्गदर्शक  म्हणून  ठिकठिकाणी  दिसले.
शेवटी  आज  आपल्यातीलच  एका  असामान्य  पर्वाचा  अंत  झाला असला  तरी  आप्पांनी दिलेले  विचार तुमच्या माझ्या सारख्या नवतरुणाच्या मनाला  सदैव प्रेरणा देत राहतील यामधे  माझ्या मनात तरी कोणतीच  शंका नाही. आज आप्पा शरीराने आपल्यामध्ये नाही आहेत  पण  त्यांनी  ज्यासाठी ज्या  प्रव्रुत्तीविरोधात  संघर्ष  केला  त्या  प्रव्रुत्ती  आज  ही समाजात  आहेत ... फक्त  आहेतच  असं  नाही  तर  त्या वाढत  आहेत..ते आपल्याला  दररोजच्या  वर्तमानपत्रातून  दिसतेच  आहे. शेवटी त्या प्रव्रुत्ती  कमी  होण्याच्या  द्रुष्टीने पावलं उचलणं  आणि  त्याविरोधात जनजागृती  करून  नवयुवक  यांच्यामधे  जाग्रुती निर्माण करणं हीच  खऱ्या  अर्थाने  आदरणीय  आप्पांना श्रधांजली ठरेल असे मला वाटतं. शेवटी पुन्हा  एकदा  आप्पांच्या विनम्र स्म्रुतीस भावपूर्ण श्रधांजली....💐💐💐
✒ प्रतिक यमगर
 बाळेवाडी, ता. - आटपाडी,
जि.- सांगली.
७७०९९३५३७४
Pratikyamgar.wordpress.com
Popatgyamgar.blogspot.com

1 टिप्पणी: