ते त्यांच्या कामाबद्दल किती गांभीर्याने पाहतात हे आपल्याला परवाच एका विद्यार्थिनीने बसथांब्यासाठी केलेल्या पत्रावरून दिसून आले. त्या पत्रातील जो प्रश्न होता बसथांब्याचा तो तर सोडविलाच सोबत त्या विद्यार्थिनीला अतिशय प्रांजळ भाषेत पत्र लिहून सांगितले की बस थांबली नाही तर मला फोन करून सांग..... लोकप्रिनिधींची जनते प्रती असलेली ही कर्तव्याची, जबाबदारीची भावनाच जनतेला त्या लोकप्रिनिधींला पंचावन्न वर्ष विधानसभेत पाठवते... लहान असो किंवा वयस्कर असो त्यांनी मांडलेला प्रश्न तडीस लावणे, ते सोडविणे हेच आजपर्यंत आबासाहेबानी कटाक्षाने पाहिले त्यामुळेच आबासाहेब आज सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सल्लग 55 वर्ष करत आहेत. मतदारसंघातील एखादा माणूस आज एखाद्या लोकप्रतनिधींकडे त्याच्या कामासाठी किंवा सामाजिक समस्या घेऊन गेला तर तो लोकप्रतिनिधी उद्या करू, परवा करू, आठवड्यात करू पुढच्या महिन्यात करू अशी उडवाउडवी ची उत्तरे देऊन निव्वळ आश्वासने देण्याचे काम करत असतात... पण आबासाहेब या सर्वाहून वेगळे ठरतात ते अश्या प्रकारच्या उदाहरणावरून.......
प्रथमतः आपले या ब्लॉगवर मनापासून सहर्ष स्वागत आहे.. आपल्याला मिळालेले दररोजचे सुंदर जीवन जगत असताना चांगल्या समाजासाठी माझ्या मनातून उमटलेले हुंकार या ब्लॉग सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचवण्यास मला नक्कीच आनंद वाटतो आहे. इतिहासातील आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा स्वाभिमान आणि वर्तमानातील विविध क्षेत्रातील काही घटनांवर निर्भीड आणि निपक्षपातीपणे व्यक्त केलेले माझे मत तुमच्यापर्यंत या ब्लॉगच्या माध्यमातून पोहचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न...
विवेक विचार

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा