आज जागतिक महिला दिन।
जागतिक महिला दिनानिमीत्त सर्वप्रथम सर्व माता भगिंनीना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।। त्या फक्त आजच्या दिवसापुरत्याच नाहीत तर सदासर्वकाळ आहेत. संपुर्ण जगाच्या पाठीवर ईश्वराची सुद्धा स्त्रीरुपामधे पुजा करणारे बहुधा आपली एकमेव संस्कृती आहे. एवढेच नाहीतर आपण आपल्या देशाला भारतमाता म्हणतो. आपल्यासाठी ही मायभुमी आहे मातृभुमी आहे.
एका बाजुला विचारात, बोलण्यात, संस्कृतीमधे हे सगळे पण दुसर्या बाजुला दररोज वर्तमापत्रात टी व्ही वरच्या बातम्या ऐकुन मन सुन्न होते. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही हुंडाबळी, स्त्री भ्रुण हत्या, घरगुती छळाला कंटाळुन विवाहितेची आत्महत्या, जातपंचायतीकडुन अमानुष मारहाण, रस्त्यावरुन चालत असताना होणारी छेडछाड , बलात्कार यासारख्या घटना ऐकल्या वाचल्या पाहिल्या की मान शरमेने खाली जाते आणि मग मनामधे विचारांचं वादळ निर्माण होतं, आणि विचारी मनाला काही प्रश्न पडतात ते म्हणजे हीच आपली संस्कृती आहे का ??? मग कविवर्य कुसुमाग्रजांनी स्वांतत्र्यदेवतेची विनवणी या फटका काव्यप्रकारातुन परखड केलेले प्रहार आठवतात,
" समान मानव माना स्त्रीला
तिची अस्मिता खुडु नका।
दासी म्हणुनी पिटु नका वा
देवी म्हणुनी भजू नका॥"
देवघरात तीची पुजा करायची आणि तिला चार भिंतीच्या आतच चुल आणि मुल यातच बंदिस्त करायचं ह्या अनिष्ट प्रथा आता आपण बंद केल्या पाहिजेत. आपण प्रत्येक स्त्रीला हे समान माणुस म्हणुन मानले पाहिजे. त्यांना त्यांचे अधिकार दिले पाहिजेत. अधिकार त्यांचे हक्क दिले तरच त्या त्यांच्याकडे असलेले गुण ते समाजाला दाखवु शकतील.
आपल्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्त्रीला आपल्या भगिनीचाच दर्जा कायम दिला असल्याचं आपणास दिसुन येतं. स्वामी विवेकानंदजीनी सुद्धा 11 सप्टेबंर 1893 रोजी शिखागो येथील धर्मपरिषदेत भाषणाची सुरवात 'अमेरिकेतील भगिनी आणि बंधुनो ' अशीच केली होती आणि तिथुनच पुढे भारतीय संस्कृतीचा प्रसार केला.
स्वतःच्या कतृत्वावर मोठ्या झालेल्या अनेक स्त्रिया आज आपल्याला प्रत्येक क्षेत्रात दिसुन येत आहेत. आदर्श राजमाता जिजाऊ, लोकमाता उत्तम प्रशासक महाराणी अहिल्यादेवी होळकर, सावित्रीमाई फुले यांच्या पासुन आजच्या इंदिराजी गांधी, प्रतिभाताई पाटील, किरण बेदीजी, पेप्सीको कंपनीच्या सीईओ इंद्रा नुई, स्टेट बंकेच्या मुख्य अरुंधती भट्टाचार्य, मीरा बोरवणकर यासारख्या अनेक स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रात उतमोत्तम काम केले आहे. आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन चांगल्याप्रकारे काम करत आहे हे तीने दाखवुन दिले आहे. आज 10 वी 12 वी किंवा स्पर्धा परीक्षांचे निकाल जाहीर झाले की टाॅप लिस्टमधे मुलीच असल्याचे आपणास पहायला मिळतात. 1948 साली महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी चालु केलेल्या स्त्री शिक्षण चळवळीची ही गोड फळे आहेत असं मानायला काय हरकत नाही. एक पुरुष शिकला की एक व्यक्ती साक्षर होते आणि एक स्त्री शिकली की पुर्ण कुटुंब साक्षर होते आणि ती स्त्री सावित्रीमाईंच्या सारखी असेल तर पुर्ण समाज साक्षर करते.
राजकारणामधे सुधा महिला आरक्षणामुळे महिला मोठ्या प्रमाणात राजकारणात येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थामधे 50 % महिला आरक्षणामुळे अनेक ठिकाणी महिला ग्रा. पं., पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, सरपंच , सभापती, जि. प. अध्यक्ष, महापौर झाल्याचे दिसुन येतात. पण येथे मला राजकारणातील स्त्रियांची एक कमतरता स्पष्टपणे नमुद केली पाहिजे ती म्हणजे स्त्रिया या मोठमोठ्या राजकीय पदावरती पोहचल्या पण त्या खुर्चीवर बसण्यापुरत्याच नाममात्र पदाधिकारी झाल्या आहेत की काय असा प्रश्न पडतो कारण ग्रामीण भागात अनेक ठिकाणी त्या ज्या पदावरती आहेत त्या पदाचा कारभार हा त्या पाहत नसुन त्यांचा पती किंवा नातेवाईक पाहत असल्याचे आपल्याला आढळुन येते.त्या सरपंच किंवा सभापती या नावापुरत्याच असतात. तर या व्यवस्थेमधेही आपण परिवर्तन केले पाहिजे. ही जी राजकीय पदं मिळतात त्यापदामधील अधिकारामधुन महिलांचे विविध प्रश्न, उपेक्षीत वंचीत दलीत समाजाचे काही प्रश्न, शेतकर्यांचे प्रश्न, समस्या अडचणी सोडवण्यात येतात. काही प्रमाणात चांगल्या योजना राबवुन सामाजिक विकास करता येतो. स्वतः सर्व आढावा बैठकांना उपस्थित राहुन वेळोवेळी अधिकार्यांच्या कडुन कामाची माहिती घेतली पाहिजे. शहरातील अनेक ठिकाणी महिलांनी कृतीतुन सिद्धही केले आहे, तळागाळातील ग्रामीण भागातील महिलांनी स्वतः पुढे येऊन ही कमतरता भरुन काढली पाहिजे.
लेखाच्या शेवटी माझ्या वाचनात आलेली आणि मला आवडलेली एक अप्रतिम स्त्रीविषयीची कविता मला आपणाशी शेअर करायला आवडेल,
" ती जीव लावते, जीव टाकते, जीव गुंतवते,
तुम्ही जीव घेता, ती सुद्धा जीव घेते पण तिनीच मरावं का?? अशा पद्धतीने जीव घेते.
तुमचंच जगताना, ती स्वताःला विसरते,
तुम्ही तिलाच विसरता।
ती सर्व सांभाळते, तुम्ही तिचं मनसुद्धा सांभाळत नाही.
तुमच्या यशात ती आनंद घेते, तुम्ही आनंदाच्या भरात तिचा उल्लेख सुद्धा विसरता।।
तिचं अस्तित्वच सुंदर आहे,
पण तुम्हाला तिच्या शरीरापलीकडे काही दिसत नाही.
ती जीवन सुंदर करते तिच्या वाट्याला कायम विटंबनाच येते .
तिचं रक्षण काय करणार? ,,
अरे तिचं रक्षण काय करणार?
तीच तुमची तटबंदी आहे तिलाच बंदिस्त करुन तुम्ही आत्मपात करुन घेताय.
घरात ती लक्ष्मी बनुन येते, तुम्ही तिचं पोत्यारं करता.
ती धनधन्याचं माफ घरात येताना ओलांडते, तुम्ही तिच्या आईबापाकडुन तिचं मातेरं करता.
ती माणूस आहे, आई आहे, बहीण आहे, मैत्रीण, बायको, प्रेयसी इत्यादी इत्यादी आहे
तमच्या लेकी ती फक्त मानी आहे.
ती लक्ष्मी, ती सरस्वती, ती दुर्गा, गौरी आहे,
निपात केलेल्या दुष्टांच्या कप्यांची माळ गळ्यात घालुन रक्तांनी वितळणारं राक्षसाचं मुंडकं हातात धरुन लाल भडक जीभ बाहेर काढत ती अष्टपुजा आहे, ती चंडीका आहे,
तुम्ही शिवशंकर व्हावं। तुम्ही शिवशंकर व्हावं। "
धन्यवाद।
श्री. पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता.:- आटपाडी, जि.:- सांगली
7709935374
जागतिक महिला दिनानिमीत्त सर्वप्रथम सर्व माता भगिंनीना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।। त्या फक्त आजच्या दिवसापुरत्याच नाहीत तर सदासर्वकाळ आहेत. संपुर्ण जगाच्या पाठीवर ईश्वराची सुद्धा स्त्रीरुपामधे पुजा करणारे बहुधा आपली एकमेव संस्कृती आहे. एवढेच नाहीतर आपण आपल्या देशाला भारतमाता म्हणतो. आपल्यासाठी ही मायभुमी आहे मातृभुमी आहे.
एका बाजुला विचारात, बोलण्यात, संस्कृतीमधे हे सगळे पण दुसर्या बाजुला दररोज वर्तमापत्रात टी व्ही वरच्या बातम्या ऐकुन मन सुन्न होते. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही हुंडाबळी, स्त्री भ्रुण हत्या, घरगुती छळाला कंटाळुन विवाहितेची आत्महत्या, जातपंचायतीकडुन अमानुष मारहाण, रस्त्यावरुन चालत असताना होणारी छेडछाड , बलात्कार यासारख्या घटना ऐकल्या वाचल्या पाहिल्या की मान शरमेने खाली जाते आणि मग मनामधे विचारांचं वादळ निर्माण होतं, आणि विचारी मनाला काही प्रश्न पडतात ते म्हणजे हीच आपली संस्कृती आहे का ??? मग कविवर्य कुसुमाग्रजांनी स्वांतत्र्यदेवतेची विनवणी या फटका काव्यप्रकारातुन परखड केलेले प्रहार आठवतात,
" समान मानव माना स्त्रीला
तिची अस्मिता खुडु नका।
दासी म्हणुनी पिटु नका वा
देवी म्हणुनी भजू नका॥"
देवघरात तीची पुजा करायची आणि तिला चार भिंतीच्या आतच चुल आणि मुल यातच बंदिस्त करायचं ह्या अनिष्ट प्रथा आता आपण बंद केल्या पाहिजेत. आपण प्रत्येक स्त्रीला हे समान माणुस म्हणुन मानले पाहिजे. त्यांना त्यांचे अधिकार दिले पाहिजेत. अधिकार त्यांचे हक्क दिले तरच त्या त्यांच्याकडे असलेले गुण ते समाजाला दाखवु शकतील.
आपल्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्त्रीला आपल्या भगिनीचाच दर्जा कायम दिला असल्याचं आपणास दिसुन येतं. स्वामी विवेकानंदजीनी सुद्धा 11 सप्टेबंर 1893 रोजी शिखागो येथील धर्मपरिषदेत भाषणाची सुरवात 'अमेरिकेतील भगिनी आणि बंधुनो ' अशीच केली होती आणि तिथुनच पुढे भारतीय संस्कृतीचा प्रसार केला.
स्वतःच्या कतृत्वावर मोठ्या झालेल्या अनेक स्त्रिया आज आपल्याला प्रत्येक क्षेत्रात दिसुन येत आहेत. आदर्श राजमाता जिजाऊ, लोकमाता उत्तम प्रशासक महाराणी अहिल्यादेवी होळकर, सावित्रीमाई फुले यांच्या पासुन आजच्या इंदिराजी गांधी, प्रतिभाताई पाटील, किरण बेदीजी, पेप्सीको कंपनीच्या सीईओ इंद्रा नुई, स्टेट बंकेच्या मुख्य अरुंधती भट्टाचार्य, मीरा बोरवणकर यासारख्या अनेक स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रात उतमोत्तम काम केले आहे. आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन चांगल्याप्रकारे काम करत आहे हे तीने दाखवुन दिले आहे. आज 10 वी 12 वी किंवा स्पर्धा परीक्षांचे निकाल जाहीर झाले की टाॅप लिस्टमधे मुलीच असल्याचे आपणास पहायला मिळतात. 1948 साली महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी चालु केलेल्या स्त्री शिक्षण चळवळीची ही गोड फळे आहेत असं मानायला काय हरकत नाही. एक पुरुष शिकला की एक व्यक्ती साक्षर होते आणि एक स्त्री शिकली की पुर्ण कुटुंब साक्षर होते आणि ती स्त्री सावित्रीमाईंच्या सारखी असेल तर पुर्ण समाज साक्षर करते.
राजकारणामधे सुधा महिला आरक्षणामुळे महिला मोठ्या प्रमाणात राजकारणात येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थामधे 50 % महिला आरक्षणामुळे अनेक ठिकाणी महिला ग्रा. पं., पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, सरपंच , सभापती, जि. प. अध्यक्ष, महापौर झाल्याचे दिसुन येतात. पण येथे मला राजकारणातील स्त्रियांची एक कमतरता स्पष्टपणे नमुद केली पाहिजे ती म्हणजे स्त्रिया या मोठमोठ्या राजकीय पदावरती पोहचल्या पण त्या खुर्चीवर बसण्यापुरत्याच नाममात्र पदाधिकारी झाल्या आहेत की काय असा प्रश्न पडतो कारण ग्रामीण भागात अनेक ठिकाणी त्या ज्या पदावरती आहेत त्या पदाचा कारभार हा त्या पाहत नसुन त्यांचा पती किंवा नातेवाईक पाहत असल्याचे आपल्याला आढळुन येते.त्या सरपंच किंवा सभापती या नावापुरत्याच असतात. तर या व्यवस्थेमधेही आपण परिवर्तन केले पाहिजे. ही जी राजकीय पदं मिळतात त्यापदामधील अधिकारामधुन महिलांचे विविध प्रश्न, उपेक्षीत वंचीत दलीत समाजाचे काही प्रश्न, शेतकर्यांचे प्रश्न, समस्या अडचणी सोडवण्यात येतात. काही प्रमाणात चांगल्या योजना राबवुन सामाजिक विकास करता येतो. स्वतः सर्व आढावा बैठकांना उपस्थित राहुन वेळोवेळी अधिकार्यांच्या कडुन कामाची माहिती घेतली पाहिजे. शहरातील अनेक ठिकाणी महिलांनी कृतीतुन सिद्धही केले आहे, तळागाळातील ग्रामीण भागातील महिलांनी स्वतः पुढे येऊन ही कमतरता भरुन काढली पाहिजे.
लेखाच्या शेवटी माझ्या वाचनात आलेली आणि मला आवडलेली एक अप्रतिम स्त्रीविषयीची कविता मला आपणाशी शेअर करायला आवडेल,
" ती जीव लावते, जीव टाकते, जीव गुंतवते,
तुम्ही जीव घेता, ती सुद्धा जीव घेते पण तिनीच मरावं का?? अशा पद्धतीने जीव घेते.
तुमचंच जगताना, ती स्वताःला विसरते,
तुम्ही तिलाच विसरता।
ती सर्व सांभाळते, तुम्ही तिचं मनसुद्धा सांभाळत नाही.
तुमच्या यशात ती आनंद घेते, तुम्ही आनंदाच्या भरात तिचा उल्लेख सुद्धा विसरता।।
तिचं अस्तित्वच सुंदर आहे,
पण तुम्हाला तिच्या शरीरापलीकडे काही दिसत नाही.
ती जीवन सुंदर करते तिच्या वाट्याला कायम विटंबनाच येते .
तिचं रक्षण काय करणार? ,,
अरे तिचं रक्षण काय करणार?
तीच तुमची तटबंदी आहे तिलाच बंदिस्त करुन तुम्ही आत्मपात करुन घेताय.
घरात ती लक्ष्मी बनुन येते, तुम्ही तिचं पोत्यारं करता.
ती धनधन्याचं माफ घरात येताना ओलांडते, तुम्ही तिच्या आईबापाकडुन तिचं मातेरं करता.
ती माणूस आहे, आई आहे, बहीण आहे, मैत्रीण, बायको, प्रेयसी इत्यादी इत्यादी आहे
तमच्या लेकी ती फक्त मानी आहे.
ती लक्ष्मी, ती सरस्वती, ती दुर्गा, गौरी आहे,
निपात केलेल्या दुष्टांच्या कप्यांची माळ गळ्यात घालुन रक्तांनी वितळणारं राक्षसाचं मुंडकं हातात धरुन लाल भडक जीभ बाहेर काढत ती अष्टपुजा आहे, ती चंडीका आहे,
तुम्ही शिवशंकर व्हावं। तुम्ही शिवशंकर व्हावं। "
धन्यवाद।
श्री. पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता.:- आटपाडी, जि.:- सांगली
7709935374
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा