शुक्रवार, २५ मार्च, २०१६

🌷💥विवेक प्रहार💥🌷

मित्रांनो आज प्रेमाचा दिवस आहे. प्रथमतः प्रेम दिवसाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। खरंतर प्रेम हे आयुष्यभर करायचे असते. फक्त एकाच दिवशी नाही. प्रेम करणं ही खाजगी वैयक्तीक गोष्ट आहे. त्यांना प्रेम करण्याचा संवैधानिक अधिकार आहे, ज्यांना प्रेम करायचे आहे त्यांनी खुशाल प्रेम करावं. त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही
प्रेमाच्या बद्दल बोलत असताना प्रेम या शब्दाची व्याख्या संकुचित अर्थाने मी करणार नाही. अलीकडे प्रेम या शब्दाची व्याख्या ही फार संकुचित अर्थाने वापरली जाते. एका मुलाने एका मुलीवर किंवा एका मुलीने एका मुलावर प्रेम केलं म्हणजे यालाच समाज, आपण प्रेम म्हणु लागला आहे. असंही प्रेम आहे असु शकतं यात नक्कीच दुमत नाही अशाप्रकारची काही चांगली उदाहरणे ही समाजात घडुन गेली आहेत. पण आजकाल प्रेमाच्या नावाखाली गार्डन व इतर ठिकाणी जे अश्लील प्रकार समाजासमोर चालतात त्यामुळे मनात मात्र चीड येते.
यासाठीच सरकारने गार्डनस निर्माण केली आहेत का???
प्रेम करत असताना समाजभान कुटुंबभान राखणं गरजेचे आहे. प्रेम करत असताना आईवडिलांना ही विश्वासात घेतले पाहिजे. 20 वर्ष सांभाळणार्या आई वडिलांच्या समोर तुम्ही चुटकी वाजवुन सांगता की लग्न केलं तर त्याच्यासोबतच किंवा तिच्यासोबतच करीन, तेव्हा जो आई वडिलांचा समाजासमोर अपमान होतो तो कधीच भरुन निघण्यासारखा नाही. अशी अनेक उदाहरणे समाजासमोर घडत आहेत. प्रेमाच्या नावाखाली लग्न करायचे आणि पुन्हा त्या मुलीला धर्मांतर करायचे पुन्हा दुसरया मुलीवर प्रेम करायचे आणि तिलाही धर्मांतर करायचे अशी लव्ह जिहादसारखी प्रकरणे वाचुन मस्तक सुन्न होते. आज भारतामधे लव्ह जिहादची प्रकरणे ही हजारोमधे लाखामधे घडत आहेत. आणि दररोज वाढत आहेत.
मित्रांनो प्रेमाची व्याख्या विस्तृतपणे आपण सर्वानी लक्षात घेतली पाहिजे. एखाद्या व्यक्तीवर, वस्तुवर, देशावर, निसर्गावर, ह्रद्यापासुन मनातुन केलेले प्रेम हे खरे प्रेम असते.
शारीरिक आकर्षण आणि उपभोगासाठी केलेले प्रेम हे खरे प्रेम नसते तर ते ढोंगी प्रेम असते.
आणि एक खरी गोष्ट सांगितली पाहिजे की
भगतसिंग सुखदेव राजगुरु यांना फाशी 14 फेब्रुवारीला नव्हे तर 23 मार्च 1931 या दिवशी देण्यात आली होती...! त्यामुळे त्यांच्या नावाने प्रेमदिवसाला विरोध करणं हेही चुकीचंच आहे. पण
पुढे जाऊन आपण या थोर वीरांच्या कडुन हेही आत्मसात केले पाहिजे की एखादी प्रेयसी प्रियकर सोडुन गेला/ गेली म्हणुन आत्महत्या करायची नाही तर देशासाठी समाजासाठी आनंदाने जगत रहायचं.

क्यु मरते हो यारो बेवफा के लिए।
न देगी दुफटा कफन के लिए।
मरना है तो मरो वतन के लिए।
तिरंगा तो मिलेगा कफन के लिए।।

जाता-जाता एवढचं सांगेन...आपण महापुरुषांचे विचारही समजाऊन घेऊन सामाजिक भान आणि राष्ट्रीय चारित्र्य असलेला युवक म्हणुन पुढील काळात वाटचाल करुया..

श्री. पोपटराव यमगर
मु. बाळेवाडी ता.- आटपाडी
जि.- सांगली
7709935374

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा