विवेक विचार

विवेक विचार

शनिवार, ४ जून, २०१६

भारतीय राज्यघटने आपल्याला अनेक  अधिकार/ हक्क दिले आहेत. भारतीय राज्यघटनेतील तिसर्या भागामध्ये कलम १२ ते ३५ मध्ये हे सर्व अधिकार/ हक्क दिले आहेत. भारतीय राज्यघटनेतील चौथ्या भागामध्ये कलम ५१ अ मध्ये मुलभूत कर्तव्ये दिली आहेत.  आपण नेहमी आपल्या हक्कांचा विचार करतो. (उदा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य) मुलभूत हक्कांचा विचार करत असताना आपण आपल्या देशाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये हे  विसरून जातो. मला वाटतं अधिकार आणि कर्तव्ये हि एकमेकांच्या हातात हात घालून जातात . जेवढे अधिकार महत्वाचे असतात  तेवढीच कर्तव्ये देखील असतात. घटनेच्या कक्षेत राहून जगायचे, विचार मांडायचे, बोलायचे,  म्हणजे फक्त आणि फक्त अधिकारच चालवायचे नाहीत तर 
कर्तव्ये काय आहेत हे समजून घेऊन ती आचरणात आणली पाहिजेत. आपणा सर्वांचे कर्तव्य हे आहे की या देशात विचारांची विविधता आहे हे आधी मान्य करणे. नंतर माझा जसा विचार आहे तसाच समोरच्या व्यक्तीचा असेल किंवा असलाच पाहिजे अशी मनोभुमिका किंवा असा आग्रह  मी ठेऊ नये. समोरच्याचा विचार समजून घेण्याची भूमिका मी ठेवली पाहिजे. समोरच्याला न दुखावता आपला असा वेगळा विचार त्याच्यापर्यंत ठामपणे  पोहोचवता आला पाहिजे. पण तो विचार ऐकताना समोरच्याची भूमिका हि कोणत्याही विषयाच्या बाबतीत  पूर्वग्रह दुषित असू नये. हाच समग्र विचारांचा पाया आहे असे मला नेहमी वाटत राहतं…

धन्यवाद …
✍✍✍✍पोपट यमगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: