विवेक विचार

विवेक विचार

गुरुवार, ९ जून, २०१६

                                      महाराष्ट्रात येणाऱ्या चार ते पाच दिवसात मान्सून पाऊस  येउन धडकेल असा  भारतीय हवामान शास्त्र विभाग(IMD) आणि स्कायमेट या प्रसिद्ध हवामान संस्थाचा अंदाज आहे. गेल्या दोन वर्षापेक्षा यावर्षी जास्त पाऊस पडण्याचा अंदाज या दोन्हीही नामवंत संस्थांनी व्यक्त केला आहे. हि नक्कीच सर्व शेतकऱ्यांच्या साठी तसेच शेतीमालावर आधारित असलेल्या सर्व उद्योगासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या दोन वर्षापासून प्रशांत महासागरात एल निनो च्या प्रवाहामुळे महाराष्ट्रासह देश मोठ्या दुष्काळाला सामोरे जातो आहे. अर्थात  एल निनो च्या प्रवाह कमी झाल्यामुळे नक्कीच यावर्षी चांगला पाऊस पडण्याची आशा निर्माण झाली आहे. जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करून हि आमच्या सरकारी व्यवस्थापन यंत्रणेने आपत्तीपूर्व नियोजन केल्याचे पहावयास मिळत नाही. म्हणजेच एखादी घटना घडल्यानंतर आपली व्यवस्था धावाधाव सुरु करते असा आजपर्यंतच्या अनेक उदाहरणामधून आपणास दिसून येते. येणाऱ्या काळात अश्या घटना घडूच नयेत आणि समजा घडलीच तर  त्या आपत्ती साठी आपली आपत्तीपूर्व यंत्रणा सक्षम आणि तत्पर असली पाहिजे. दुष्काळासारख्या समस्येवर  हि दरवर्षी तात्पुरत्या स्वरुपाची उपाययोजना आपले सरकार करत आहे. दीर्घकालीन दृष्टीकोन मनात ठेऊन दुष्काळासारख्या समस्येवर सरकार उपाययोजना करत असल्याचे मला तरी दिसून येत नाही. (अर्थात पुढील निवडणुकां कोणत्या प्रश्नावर लढवायच्या???? हाही प्रश्न राज्यकर्त्यांना महत्वाचा वाटतो.)
                                        महारष्ट्रातील मराठवाड्यासह, पश्चिम महारष्ट्रातील माणदेशात (सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातील  काही तालुके) पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागली आहे. पिण्यासाठीच पाणी नसेल तर मग शेती, उद्योगधंदे यासाठी तर पाणी मिळणेच मुश्किल अशी वास्तविक  परिस्थिती अनेक गावामध्ये होती.    भारतीय हवामान शास्त्र विभाग (IMD)  आणि स्कायमेट या प्रसिद्ध हवामान संस्थाचा अंदाजामुळे सकारात्मक दृष्टीकोनातून आपल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
      ‘ठायीठायी थेंब सांडले आमच्या घामाचे, कधी न कोणी मोल मोजले आमच्या घामाचे, सुपीक सारे शेतशिवारी आम्हीच करणारे, कष्टाने कोठार धान्याचे आम्हीच भरणारे.' या आशेने जगाच्या पोठाची भूक भागविणारा म्हणजेच जगाचा पोशिंदा असणारा शेतकरीराजा आभाळातून कधी पावसाच्या सरी बरसतात याची वाट पाहतो आहे. आभाळाकडे डोळे लावून तो वरूण राजाला विनवणी करतो आहे कि,
                                     "पावसांच्या धारांनो या, करपलेल्या पिकाला नवजीवन द्या. या थुई थुई थुई थुई धारा, हा शिवार फुलवा सारा "


धन्यवाद……
✍✍✍✍ पोपट यमगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: