नेताजी सुभाषचंद्र बोस हे नाव जरी ऐकले तरी एक विलक्षण असा इतिहास समोर उभा राहतो तो म्हणजे अडतीस कोटी देशबांधवांची गुलामीतून मुक्तता;याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या,लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी! जीवनभरचा धगधगता संघर्ष, जिवलग स्वकीयांशी आणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकीयांशीही. त्याला व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक लढाऊ राष्ट्र मानून, जपानसारख्या हिशेबी देशानेही अभूतपूर्व मदत केली.'चलो दिल्ली'ची त्याची गर्जना साकारण्यासाठी इंफाळ-कोहिमा-ब्रह्मदेशाच्या अरण्यात जुंपला एकघना रणसंग्राम! नियतीच्या आडव्यातिडव्या भेसूरनाचानेही ज्याची कवचकुंडले कधीही निस्तेज झाली नाहीत असा- महानायक! अश्या या महानायकाची आज जयंती ... त्यानिमित त्यांच्या विनम्र स्मृतीस विनम्र अभिवादन...
Nice
उत्तर द्याहटवा