नेताजी सुभाषचंद्र बोस हे नाव जरी ऐकले तरी एक विलक्षण असा इतिहास समोर उभा राहतो तो म्हणजे अडतीस कोटी देशबांधवांची गुलामीतून मुक्तता;याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या,लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी! जीवनभरचा धगधगता संघर्ष, जिवलग स्वकीयांशी आणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकीयांशीही. त्याला व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक लढाऊ राष्ट्र मानून, जपानसारख्या हिशेबी देशानेही अभूतपूर्व मदत केली.'चलो दिल्ली'ची त्याची गर्जना साकारण्यासाठी इंफाळ-कोहिमा-ब्रह्मदेशाच्या अरण्यात जुंपला एकघना रणसंग्राम! नियतीच्या आडव्यातिडव्या भेसूरनाचानेही ज्याची कवचकुंडले कधीही निस्तेज झाली नाहीत असा- महानायक! अश्या या महानायकाची आज जयंती ... त्यानिमित त्यांच्या विनम्र स्मृतीस विनम्र अभिवादन...
प्रथमतः आपले या ब्लॉगवर मनापासून सहर्ष स्वागत आहे.. आपल्याला मिळालेले दररोजचे सुंदर जीवन जगत असताना चांगल्या समाजासाठी माझ्या मनातून उमटलेले हुंकार या ब्लॉग सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचवण्यास मला नक्कीच आनंद वाटतो आहे. इतिहासातील आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा स्वाभिमान आणि वर्तमानातील विविध क्षेत्रातील काही घटनांवर निर्भीड आणि निपक्षपातीपणे व्यक्त केलेले माझे मत तुमच्यापर्यंत या ब्लॉगच्या माध्यमातून पोहचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न...
विवेक विचार

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
1 टिप्पणी:
Nice
टिप्पणी पोस्ट करा