विवेक विचार

विवेक विचार

सोमवार, ३० मे, २०१६

रणरागिणी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ……

                                                    
             अठराव्या शतकाच्या इतिहासाच्या पानावर स्वबळावर, स्वकर्तृत्वावर राज्य मिळविण्याचे कार्य आपल्या कतृत्वातुन घडवुन जगासमोर 'स्त्री' या शब्दाची व्याख्याच बदलवुन टाकणार्या तसेच मल्हार रावांच्या मार्गदर्शनाच्या जडणघडणीतुन घडलेले क्रांतीकारी स्त्रीरत्न लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती। त्यांच्या जयंतीनिमीत्त प्रथमतः त्यांच्या विनम्र स्मृतीस विनम्र अभिवादन।।
             31मे 1725 साली माणकोजी-सौ.सुशिलाबाईंच्या पोटी जन्मास आलेल हे धगधगत क्रांती रत्न म्हणजेच अहिल्यादेवी होळकर..  ज्या वयात मुली बाहुली-बाहुली चा खेळ खेळणे पसंद करतात, त्या वयात घोड्यावर बसुन रपेट मारणे,तिरंदाजी करणे, तलवार चालविणे या सार्या गोष्टी छोट्याशा अहिल्येस  प्रिय होत्या. अशा युद्धनितीचा प्रभाव बालपणीच अहिल्यादेवींच्या मनावरती पडला होता. त्यातच त्यांच्या मातोश्री सुशिलाबाई ह्या धार्मिक असल्यामुळे अहिल्यादेवींना मानपान, सन्मान देणे,कार्यनिष्ठा, संयमि वृत्ती,सोज्वळता तथा निर्मळता हे अंगवळणीच पडले होते. अशा दुहेरी संस्कारांच्या गर्तेत अहिल्याराणी घडल्या होत्या.  असेच एकदिवस बाजीराव पेशवे आणि मराठ्यांचे  लढवय्ये शुरसरदार मल्हार राव
होळकर  वेशपालटुन फिरतीवर असताना अहिल्यादेवींशी त्यांची  गाठ पडली. पहिल्याच नजरेत त्या कोवळ्या अहिल्येने त्यांना जरब देऊन तुम्ही व्यापार्याच्या सोंग घेऊन आलेले सोंगी असुन मल्हार रावांचे खरे रूप ओळखले. तसेच मल्हाररावांनी अहिल्येस तिरंदाजी करून समोरील झाडावरचा पक्षी मारण्यासाठी सांगितला. .तेव्हा अहिल्यादेवी उदगारल्या,
   "आम्ही कोण्या मुक्या प्राण्यावर व गरिबांवर हल्ला करून आमची शुरता सिद्ध करत नाही आणि पक्षी तर आमचे पाहुनेच मग त्यांचा तर सन्मान करायला आमच्या मातोश्रींनी शिकविले आहे, संहार नाही"
             त्या प्रसंगाने मल्हारराव अचंबित झाले आणि  अशी शुरकन्या जर आपली सुन जाहली तर ...????? या विचाराने मनोमन सुखावले.  सन 1733 साली अहिल्याराणीचा विवाह मराठ्यांचे शुरसरदार मल्हारराव-गौतमाबाई होळकर यांचे एकुलते पुत्र खंडोजीराव होळकर यांच्याशी पार पडला.
             राज्याची महाराणी म्हणुन प्रतिकुल परिस्थितही काम करत असताना अहिल्यादेवींनी आपला संयम व प्रजेच्या काळजीखातीर कुठलेही भावनात्मक पाऊल उचललेले नाही, कारण खुःद अहिल्यादेवी भावनेपेक्षा कर्तृव्याला श्रेष्ठ माणनार्या होत्या. त्यामुळे आजच्या माता भगिनींनी लहान लहान गोष्टीवरून चिडचिडपणा करून थेट भांडण, घटस्फोट,सासु सासरे वृद्धाश्रमा पर्यंत पोहचविण्यार्या मालिका पाहण्यापेक्षा टीव्हीचे रिमोट बाजुला करून कधीतरी बुद्धीची भुक भागविण्यासाठी  अहिल्या-जिजाऊ-सावित्री-झाशीची राणी वाचल्या पाहिजेत. 
           अहिल्यादेवीनी त्यांच्या स्वराज्यात अनेक लोककल्याणकारी कामे केलेली आपणास पहायला मिळतात. या देशातील अनेक मंदीरे, धर्मशाळा, अन्नछत्रे,वृक्ष संवर्धन, विहिरी, पाण्यचे कुंड असे अनेक लोकहितकारी कार्य केली आहेत. त्यांच्या कालखंडात तर झाडतोड ही अदखलपात्र गुन्हा होता. त्यांनी नदीच्या मुख्य प्रवाहापासुन अनेक कृत्रिम प्रवाह निर्माण करून ऊजाड ठिकाणी पाणी पोहेचवुन शेतकर्यांना शेती करण्यासाठी पाणी ऊपलब्ध करून दिले. तसेच शेतकर्यांना वेळेप्रसंगी शेतसारा मध्ये योग्य ती सवलत देऊन शिवरायांच्या शेतकरी प्रती धोरणांचा अवलंबही केला होता. आजही माहेश्वरच्या साड्या प्रसिद्ध आहेत. तेथे  वस्त्र ऊद्ध्योगासाठी अहिल्यादेवीनीच पुढाकार घेऊन वस्त्रोद्ध्योगास चालना दिली होती. अहिल्यादेवीने "ज्याच्या मनगटात बळ, बुद्धी, चातुर्य आहे. तोच स्वबळावर लोकाभिमुख राजा बनु शकतो" या विचाराच्या आधारे तत्कालीन व्यवस्थेला जबरदस्त 'चपराक' लगावली होती. अहिल्यादेवींनी रणांगणातील लढाईत शक्तीच्या जोरावर अनेक शत्रुंना नामोहरण केले होते, त्याचबरोबर  बुद्धीच्या बळावर अनेक लढायात चित्तपटही केले होते. अहिल्यादेवींनी सती प्रथा,बालविवाह, व विधवांसाठी विशेष योजना राबवुन अन्यायकारी व्यवस्थेस लाथाडले होते. अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी त्यांचं सामाजिक कार्य, त्यांचे  सर्वसमावेशक विचार आणि पराक्रमाचा इतिहास आपणासारख्या सुशिक्षीत तरुणांनी निरपेक्षपणे जाणुन घेऊन तो जाज्वल्यप्रेमी इतिहास तळागाळातील समाजाच्या अशिक्षीत, शोषित,  वंचित घटकापर्यत पोहचविणे हीच आजच्या काळातील खरी गरज आहे असं मला वाटतं.
           एका प्रसिद्ध इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या 'कॅथरीन द ग्रेट, पहिल्या एलिझाबेथ, मार्गारेट' म्हटले आहे. भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेस वसलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली.  मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे जवळ जवळ ३० वर्षे  त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.
           लेखाच्या शेवटी विनया खडपेकर यांच्या 'ज्ञात अज्ञात अहिल्यादेवी होळकर' या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती  दिलेली एक कविता आठवते. या कवितेतुन विनया ताईंनी नक्कीच अहिल्यादेवीच्या कार्याचा फार थोड्या शब्दात खुप मोठा गौरव केला आहे असं मला वाटतं.

"ती सत्ताधारी होती,पण ती सिंहासनावर नव्हती.
ती राजकारणी होती, पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती.
ती पेशव्यांशी निष्ठावंत होती. पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती.
जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता, हुकमत हा
सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा-तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले.
तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछ्त्रे, धर्मशाळांचे रुप घेतले.
तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरामंदिरांतून घुमले.
मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती. तिलाही माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या.
अठराव्या शतकातल्या मराठयांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या
चांदणीसारखी लुकलुकली."

धन्यवाद.....
✍✍✍✍ पोपट यमगर

शनिवार, २८ मे, २०१६

स्वांतत्र्यवीर सावरकर यांची 133 वी जयंती त्यानिमीत्त................

            आज स्वांतत्र्यवीर सावरकर यांची 133 वी जयंती। त्यानिमीत्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। स्वांतत्रवीर सावरकर म्हटले की आपल्याला आठवतात ते क्रांतीकारक सावरकर. भारताच्या स्वांत्र्यासाठी आपल्या आयुष्याचा त्याग करणारे सावरकर. काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले सावरकर, अंदमान तुरुंगातील छळाला निर्भीड सामोरे गेलेले सावरकर.. साहित्यीक विज्ञानवादी सावरकर... सावरकरांच्या जीवनात अदभुत पराक्रम, अस्सीम त्याग, राष्ट्रनिष्ठा, असामान्य वक्तृत्व, हिंदुत्व, अस्पृश्यता निवारण, विज्ञाननिष्ठा हे सर्व सामावलेले आहे. त्यांच्या आयुष्यात भरपुर दुःखप्रद कारावास, हालाखीचे जगणे, देशासाठी केलेला अस्सीम त्याग आहे. तरीही एका असामान्य व्यक्तीचा जीवनाशी झालेला हा लढा आहे.
           सावरकरांनी वयाच्या १४व्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरातील अष्टभूजा देवीपुढे ‘मी या देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी मारिता मारिता मरेतॊ झुंझेन’ अशी शस्त्र क्रांतीची शपथ घेतली. या घटनेचे मूळआई-वडिलांच्या आदर्शात व त्यांच्याकडुन होणार्‍या संस्कारांमध्ये दडलेले होते असे दिसून येते. सावरकरांचे एकुण जीवनच आपल्या सारख्या तरुणांना भारावुन टाकणारे आहे. आजच्या काळात अनेक संकुचित विचार असणारे लोक स्वांतत्रपुर्वकाळातील महापुरुष, क्रांतीकारक,सामाजिक राजकीय नेते यांची एकमेकांशी तुलना करतात. एकमेकांना त्यांच्या नावाप्रमाणे विभागण्याचा प्रयत्न करतात. नक्कीच ही एक मनातील बोचरी खंत आहे. एकमेकांशी तुलना न करता सर्व महापुरुषांनी देशासाठी, समाजासाठी केलेलं कार्य, त्यांचे विचार आपण समजुन घेतले पाहिजेत असं माझं ठाम मत आहे. या सर्व महापुरुषांच्या विचारामध्ये मतभेद जरुर होते पण त्यांनी ते मतभेद देश हिताच्या आड येऊ दिले नाहीत... त्यांनी राजकीय स्वांतत्र्याचे स्वप्न पाहिले. त्यांना अंदमानमधील तुरुंगात कोणत्याही सुविधा पुरविल्या गेल्या नाहीत, म्हणून 'कमला' हा काव्यसंग्रह एका अणकुचीदार खिळ्याने भिंतीवर लिहुन तो पाठ करणारे सावरकर हे पहिलेच कैदी होते. ते एकदा म्हणाले होते, "माझी अशी इच्छा आहे की, मी
सागरात उडी टाकली होती ही गोष्ट लोक विसरले तरी चालतील, पण मी जे सामाजिक विचार मांडले आहेत त्यांचे समाजाने नेहमी स्मरण ठेवावे." अर्थात त्यांच्या जयंतीदिनी त्यांचे विचार एक समंजसवादी सुशिक्षीत युवक म्हणुन जाणुन घेणं हीच आजच्या काळातील गरज आहे, असं मला ठामपणे वाटतं.

✍✍✍✍✍✍पोपट यमगर… ………

शुक्रवार, २७ मे, २०१६

वाढदिवसाच्या निमित्ताने

        आज माझ्या वाढदिवसानिमित्त अगदी सकाळपासून दिवसभर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापार, क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, मित्र, मैत्रिणी, या सर्वांनी  शुभेच्छा दिल्या त्याबद्दल  त्या सर्वांना शतशः धन्यवाद देतो…आपल्या शुभेच्छानी नक्कीच भाराऊन गेलो आहे.  वाढदिवसाच्या निमित्ताने  मागील आयुष्याचं अभिष्टचिंतन करत पुढील आयुष्याकडे सकारात्मक ध्येयासक्त नजरेने पाहतोय… आज खूप जणांनी शुभेच्छा देत असताना  चांगले लेख वाचायला मिळोत या सह खूप अशा सदिच्छा हि व्यक्त केल्या. अर्थात या सर्व सदिच्छा पुढील वर्षभरात पूर्ण करणं हे माझे कर्तव्य आहे, आणि त्या पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन…
       वाढदिवसानिमित मी हि काही चांगले संकल्प केले आहेत.   शैक्षणिक  पदव्युत्तर पदवी प्राप्त करणे हे माझे धेय्य आहे. लेखना बरोबरच भाषण कोशल्य हि आत्मसात करण्याची इच्छा आहे. यासह खूप सारे संकल्प मनात आहेत. ते संकल्प येणाऱ्या काळात मी माझ्या आचरणात आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. पुनश्च एकदा सर्व प्रेमळ मित्रांचे आभारी आहे…असंच आपले मित्रवत प्रेम कायम राहावं हि माझी आजच्या वाढदिनी आपणा सर्वाकडून एक सदिच्छा आहे.
धन्यवाद…।

✍✍✍पोपट यमगर…

गुरुवार, २६ मे, २०१६

                           केंद्रामधील   NDA (भाजपच्या) सरकारला आज दोन वर्षे पूर्ण  होत आहेत.  सकाळी वर्तमानपत्र उघडल्या उघडल्या केंद्र सरकारच्या मागील दोन वर्षामध्ये केलेल्या कामाच्या जाहिराती(अर्थात मोदिजींच्या खूप मोठ्या छबीसह… माझा देश  बदलतो आहे.... पुढे  जातो आहे  ) पहिल्या पानावरतीच आलेल्या पाहिल्या. त्या  पाहत असतानाच थोडेसे पाठीमागील दोन वर्षाच्या काळात डोकाऊन पाहिले…२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी  भाजपला मोठ्या अपेक्षेने दिल्लीच्या सत्तेच्या सिंहासनावर बसवले होते. मागील  10 वर्षातील काॅग्रेसचा नाकर्तेपणा, प्रचंड भ्रष्टाचार , घोटाळे तसेच त्यांच्या विरोधातील सामाजिक कार्यकर्त्यांची आंदोलने यामुळे काॅग्रेस च्या विरोधात जनमाणसामधे निर्माण झालेली प्रचंड चीड ही लोकसभेला भाजपला निवडुन देण्याची महत्वाची कारणे होती. तसेच गुजरातचे विकासाचे माॅडेल पाहुन असेल किवा नरेंद्र मोदीजी यांच्या  सक्षम नेतृत्वाकडे पाहून जनतेने भाजपला मतदान केले होते. समाजातील सर्व घटकांच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या आहेत असे सध्या तरी म्हणता येणार नाही. अर्थात सर्वच अपेक्षा दोन वर्षाच्या काळात कोणतच सरकार पूर्ण करू शकणार नाही हे हेही त्रिवार सत्य आहे. सकारात्मक  दुर्ष्टीकोनातून पहिले तर त्या अपेक्षा काही प्रमाणात तरी सरकारने पूर्ण केल्याही आहेत असं म्हणायला काही हरकत नसावी असे मला वाटते. 
                         पंतप्रधान नरेंद्र मोदिजी यांच्या नेत्तृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक महत्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत. या योजनामध्ये उद्योग आणि औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूकवाढीसाठी 'मेक इन इंडिया', 'स्टार्ट अप इंडिया, स्टन्ड अप इंडिया' 'डिजीटल इंडिया' , तरुणांमध्ये कौशल्य निर्मितीसाठी 'स्कील इंडिया', शहरांच्या नवनिर्माणासाठी 'स्मार्ट  सिटी, स्वच्छतेसाठी 'स्वच्छ भारत', शेतकर्यासाठी 'प्रधानमंत्री जन धन योजना' मुलीसाठी 'बेटी बचावो बेटी पढाओ' आणि  'सुकन्या समृद्धी योजना' गरिबांसाठी 'अटल पेन्शन योजना','प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना'  यासह सर्व क्षेत्रातील अनेक योजनांचा समावेश होतो. या योजना फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात त्याचा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहचला पाहिजे. आपल्याकडे अनेक योजना खूप चांगल्या असतात पण त्या योग्य अंमलबजावणी अभावी तशाच पडून राहतात किवा त्याची माहिती सर्वसामान्य गोरगरीब लाभार्थ्यापर्यंत पोहचत नाही. सरकार ज्या योजना आखतम त्यातील बर्याच योजना ज्यांच्या साठी आखत असते  त्यांनाच त्या योजनाची माहिती मिळत नाही हि वस्तू स्थिती आहे. अर्थात अलीकडील काळामध्ये माध्यमातील वाढत्या जाहिरातीमधून हि माहिती गावातील घराघरामध्ये पोहचते हि एक सकारात्मक बाब आहे.
                        देशाचा आर्थिक विकासाचा दर GDP  ७.५% आहे. म्हणजेच जगातील अर्थव्यवस्थेचा विचार करता भारताची  अर्थव्यवस्था  वेगाने बदलत पुढे  जात आहे.  गेल्या दोन वर्षातील मोदिजींच्या परराष्ट्रीय धोरणामुळे नक्कीच भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा चांगली होत असल्याचे आपल्याला दिसून येईल…
                         भारतातील सर्व काही समस्या संपल्या असेही म्हणता येणार नाही. समस्या अडचणी ह्या आहेतच. देशासमोर दुष्काळ, दहशतवाद, भ्रष्टाचार, अत्याचार, बेरोजगारी, वाढती लोकसंख्या, दारिद्र्य, जातीयवाद यासारख्या समस्या आ वासून उभ्या आहेत.  यावरती सकारात्मक तोडगा काढण्याचे काम केंद्रात बसलेले सरकार करत आहे. 

✍✍✍✍✍✍पोपट यमगर

बुधवार, २५ मे, २०१६

वरील गुरुदेव टागोर यांच्या एका अप्रतिम कवितेचा पु.ल. नी मराठीत भाषांतर केलेला सारांश....................

      एकदा सुर्यास्ताच्या वेळेला सुर्याने सर्व दिव्यांची सभा बोलावली, आणि विचारले की, "मी तर अस्ताला चाललो, उद्या उगवून येईपर्यंत जगाला प्रकाश देण्याचे काम कोण करेल??" सगळ्या दिव्यांची छाती दडपली, हा साक्षात सुर्यनारायण त्याची एवढी ताकद आणि हा म्हणतो माझ्या अनुपस्थितीमधे जगाला प्रकाश देण्याचे काम कोण करेल?? सगळे गप्प बसले. एक छोटी टिमटिमती पणती होती. ती घाबरत घाबरत पुढे सरकली. सुर्याला वंदन करुन म्हणाली, "सुर्यनारायणा जगाला प्रकाश देण्याचे मला माहित नाही, माझ्यापरीने जळत राहण्याचं काम मी करीन." यावर सुर्य म्हणाला,"अस्ताला जायला मी मोकळा झालो."
        वरील गुरुदेव टागोर यांच्या एका अप्रतिम कवितेचा पु.ल. नी मराठीत भाषांतर केलेला सारांश… या कवितेच्या सारांशमधुन जितके आपण चिंतन करू तितकं कमी आहे, उलट यामधून मिळणारा अर्थ उत्रोत्तर वाढतच जाईल यामध्ये माझ्या मनामध्ये तरी कोणतीच शंका नाही. आपण दररोज एकतो, पाहतो, वाचतो कि सध्याच्या वर्तमान युगामध्ये सगळीकडे अंधाधुंदी चालू आहे. माझे जवळचे अनेक मित्र मी लिहित असलेल्या छोट्या छोट्या लेखावर प्रतिक्रिया देताना म्हणतात कि तुझ्या या लेखनामुळे समाजावर काय फरक पडणार आहे. यामुळे माझ्या मनामध्येही नकारात्मक विचार येतात पण वरील सरांशमधील पणतीने दिलेल्या उत्तरातून खूप काही शिकण्यासारखे आहे असे मला वाटते. आम्ही म्हणतो हे सर्व बदलेल केव्हा???? तेव्हा सगळे बदलेल केव्हा हे मला माहित नाही, माझ्या परीने त्या छोट्यास्या पणतीप्रमाणे जळत राहण्याचे कार्य मी करेन असं जेव्हा आपण म्हणायला लागू तेव्हा नक्कीच परिवर्तन झाल्याचे आपल्याला पाहायला मिळेल…
धन्यवाद……

(✍✍✍✍✍✍ मनाच्या गाभार्यातून .................. )

मंगळवार, १७ मे, २०१६

✍✍✍✍सर्वोच्च न्यायालयाच्या MBBS, BDS पुढील वर्षाच्या नीट परीक्षेच्या सक्तीवरून चाललेल्या वादासंदर्भात माझं ही मत ✍✍✍✍✍✍

            सर्वोच्च न्यायालयाच्या MBBS, BDS पुढील वर्षाच्या प्रवेषासाठी  नीट परीक्षेच्या सक्तीवरून महाराष्ट्रातील शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या  नीट परीक्षेच्या सक्तीविरोधात जवळ जवळ सगळेच राज्यकर्ते  विद्यार्थ्याच्या हितासाठी (???????) मैदानात उतरले आहेत. लोकसत्ताच्या १५ मे च्या वर्तमान पत्रामध्ये लोकसत्ताच्या जेष्ठ पत्रकार रेश्मा शिवडेकर यांची 'नीट मुळे शिक्षण सम्राटांचे अर्थकारण कोलमडले'  हि बातमी वाचल्यानंतर आपल्या राज्यकर्त्यांना विद्यार्थ्यांचे नेमके कोणते  हित जोपासायचे आहे हे  लक्षात येईल. MBBS, BDS पुढील वर्षाच्या प्रवेषासाठी काही आर्थिक संपन्न असलेल्या विद्यार्थ्यांनी काही शिक्षण सम्राटांच्याकडे आर्थिक लॉबिंग कसे लावले आहे हे हि या बातमीत चांगल्या पद्धतीने स्पष्ट केले आहे.   आज  शिक्षणासारख्या ज्ञान देणाऱ्या पवित्र क्षेत्रात  लाखो रुपये घेऊन जशा बाजारात वस्तू विकल्या जातात तशा  विद्यापीठात, महाविद्यालयामध्ये पदव्या विकल्या जात आहेत. त्यामुळे प्रामाणिक असणारे गरीब विद्यार्थी हुशार असुनही त्यांना योग्य संधी किंवा योग्य स्थान मिळत नाही. MBBS, BDS हे वैद्यकीय कोर्स झाल्यानंतर होणारा डॉक्टर हा तज्ञच असला पाहिजे तसेच हुशार असूनही येथील शिक्षणव्यवस्थेतील शिक्षणसम्राटांच्या वर्चस्वामुळे गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेऊ शकत नाहीत. आम्ही तज्ञ आणि गुणवंत डॉक्टर घडविण्याऐवजी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी घातलेले पैसे पुन्हा उकळणारे डॉक्टरच तयार करत आहोत कि काय?? असा प्रश्न माझ्या विचारी मनाला पडल्याशिवाय राहत नाही.
          केंद्रीय पातळीवर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नीट हि परीक्षा घेतली जात होती.  पण गेली काही दिवस  सध्या ती परीक्षा बंद होती पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा त्या चालू होणार आहेत. नीटसाठी ११ वी आणि बारावी NCERT   अभ्यासक्रमावर आधारित हि परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रातील CET हि परीक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या १२ वी च्या अभ्यासक्रमावर आधारित घेतली जाते.  सध्या नीट या परीक्षेसाठी अभ्यास साहित्य उपलब्ध नाही हि वास्तविक परिस्थिती आहे. ते अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्याएवजी आपले महाराष्ट्र सरकार  नीट परीक्षा सक्ती रद्द करण्यासाठी केंद्राच्या मदतीने अध्यादेश आणण्याच्या तयारीत आहे. कदाचित तो अध्यादेश येण्याची दाट शक्यता मला वाटते आहे.  तो अध्यादेश येउन नीट परीक्षा बंद होतात कि नाही ??? विद्यार्थ्यांचे ( शिक्षण सम्राटांचे) हीत जोपासले जाते कि नाही???? हे पाहणे आपणासाठी ओत्सुक्याचे ठरेल.

✍✍✍✍पोपट यमगर
आटपाडी, सांगली
popatgyamgar.blogspot.com

गुरुवार, १२ मे, २०१६

जागतिक परिचारिका दिनानिमित्त

आज जागतिक परिचारिका दिन आहे. रूग्णांवर मायेची फुंकर घालून त्यांची अहोरात्र सेवा करणाऱ्या परिचारिकांचं जीवन कष्टमय, दु:खप्रद आहे. पण अशातही स्वत:च्या आयुष्यातला काळोख विसरून रूग्णाच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. दरवर्षी 6 ते 12 मे हा आठवडा संपूर्ण जगभरात आतंरराष्ट्रीय नर्सेस आठवडा म्हणून साजरा केला जातो. रूग्णाची सेवा कोण करतं ? असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्या मनात डॉक्टरआधी नाव येतं ते म्हणजे परिचारिकेचं. रूग्णाच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम या परिचारिकां करीत असतात. त्यांना तमा नसते वेळेची, त्यांना पर्वा नसते स्वताच्या सुखदुःखाची. वैयक्तिक हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करत अहोरात्र त्या रूग्णसेवेत गुंतलेल्या असतात. या रूग्णसेवेला खऱ्या अर्थानं सुरूवात केली ती फ्लॉरेन्स नाईटिंगेल या परिचारिकेनं. 12 मे 1820 ला फ्लॉरेन्स यांचा जन्म झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी फ्लॉरेन्स यांनी जखमी सैनिकांची सेवा केली. आणि संपूर्ण जगाला त्यांनी रूग्णसेवेचा पायंडा घालून दिला. दिवा घेतलेली स्त्री' असंही फ्लॉरेन्स यांच्याबाबतीत म्हटंलं जातं. भारतामध्ये  ४२ वर्ष मृत्यूशी झुंझ देत गेल्या १८ मे ला निधन पावलेली परिचारिका अरुणा शानबाग हिची  जागतिक परिचारिका दिनानिमित्त नक्कीच आठवण आल्याशिवाय राहत नाही. दवाखान्यात परिचारिकाना अनेक वेळा असुरक्षिततेला सामोरे जावे लागते.   ग्रामीण भागात या परिचारिका लसीकरण, प्रसुती, कुटुंबकल्याण यासारखी कामं पार पाडताना दिसुन येतात. एखाद्या व्रतस्थाप्रमाणे परिचारिका आपली भूमिका बजावत आहेत. स्वत:चं दु:ख विसरून रूग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालणाऱ्या या परिचारिका भगिनींना मनापासुन सलाम।।

✍✍✍✍ पोपट यमगर

मंगळवार, १० मे, २०१६

✍ विवेक प्रहार ✍

आज कर्मवीर भाऊराव पाटील(आण्णा) यांचा स्मृतीदिन।।त्यानिमीत्त प्रथमतः त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन।।
           माझं जवळ जवळ अर्ध शिक्षण आण्णांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेत झालं यांचा मला आनंद वाटतो.  कारण शिक्षण घेत असताना रयत शिक्षण संस्था कधीच परकीय संस्था वाटली नाही. संस्थेत शिक्षण घेत असताना आपुलकी प्रेमच मिळाले संस्थेत शिक्षण घेत असताना आण्णां सारख्या महापुरुषांच्या  आदर्श चारित्र्याचे धडे मिळत गेले आणि त्यातुनच माझं हे व्यक्तीगत चारित्र्य घडत गेले. आजच्या काळात शैक्षणिक क्षेत्राचं अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी बाजारीकरण करुन टाकलं आहे. पैसे घेऊन जशा बाजारात वस्तु मिळतात तशा अनेक खाजगी विद्यापीठ संस्थामधुन पदव्या मिळत आहेत. आज छोट्या मुलांच्या केजी ला प्रवेश घ्यायला 50000 फी मागितली जाते. या आर्थिक कारणासाठी अनेक गोरगरीब पालकांना आपल्या मुलास दर्जेदार शिक्षणापासुन वंचित ठेवावं लागतं ही मनाला बोचणारी खंत आहे. पण मी ठामपणे सांगु शकतो की माझं संस्थेतील शिक्षण हे खुप कमी खर्चात झालं आहे .
आणांनी रयत शिक्षण संस्था चालु करण्यामागचं खरं उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील गोरगरीब बहुजन समाजातील मुला मुलींना शिक्षण घेता यावं हे होतं. स्वतः आण्णा फक्त सहावी शिकले आहेत पण त्यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेतुन लाखो कोट्यावधी मुलांनी पदव्युत्तर पदव्या घेतल्या आहेत.
        आण्णानी  4 ऑक्टोंबर 1919 रोजी कार्ले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांनी 1919 ला रयत शिक्षण संस्थेच्या नावाने लावलेला वेल आज गगणाला गवसणी घालताना आपल्याला दिसुन येतोय.  संस्थेच्या नावाप्रमाणेच ही रयतेची म्हणजेच गोरगरीब, दलीत, सर्वसामान्य, वंचीत, शेतकरी, कामगार यांची संस्था आहे असं आण्णानी अनेक वेळा बोलुनही दाखवले आहे.  अनेक विद्यार्थ्यांना घरच्या आर्थिक परिस्थीतीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा शिकण्याची इच्छा असणारया गरजु विद्यार्थ्यासाठी आण्णानी कमवा आणि शिका ही योजना संस्थेत चालु केली. संस्थेतील अनेक शाखामधे  बाहेरगावच्या वंचित विद्यार्थ्यासाठी वसतिगृहे चालु केली.  स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीदवाक्य असं सांगतांना आण्णांनी संस्थेचं चिन्हसुद्धा वटवृक्ष ठेवलं आहे याचं कारण म्हणजे वटवृक्षाप्रमाणे संस्थेच्या शाखाचा विस्तार होत जावो हीच त्यांची मनोमनी इच्छा होती.
      महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाणसाहेब यांनी कर्मवीर आण्णांच्या विषयी  पुढील गौरवोदगार काढले आहेत, "कर्मवीर ही व्यक्ती नव्हती ती एक संस्था होती, बहुजन समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले व महाराष्ट्रात नवयुग निर्माण केले. त्यांची रयत शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्रात नवजीवन ओतणारी गंगा आहे." सार्वजनिक शिक्षणाबाबत आज सरकारी पातळीवर निर्णय झालेले आहेत. पण एक काळ असा होता की त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अशा काळात मागासवर्गीय बहुजन   गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर केले. कष्टकरी विद्यार्थ्यांना रात्रशाळांचा पर्याय उपलब्ध केला. खेड्यातील मुलांना दैनंदिन सुविधा मिळाल्या तर त्यांना शिक्षण घेता येईल या विचारातून त्यांनी मोफत वसतीगृहे चालवली. ‘रयत शिक्षण संस्थे’च्या रूपाने त्यांनी उभे केलेले कार्य सर्वांना परिचित आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबी शिक्षण, श्रमप्रतिष्ठा आणि स्वातंत्र्याची मूल्ये रुजवली. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांचा आदर्श न विसरण्याची शपथ आपण घेतली पाहिजे. पुन्हा एकदा आण्णाच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन।।
धन्यवाद।

  श्री. पोपटराव यमगर
  बाळेवाडी ता. आटपाडी,
  जि. सांगली
 7709935374

✍✍विवेक प्रहार✍✍

✍✍विवेक प्रहार✍✍

आजचा लोकसत्ताचा अग्रलेख विचार करण्यास प्रवृत्त करणारा अग्रलेख आहे. महाराष्ट्रात सध्या 18 वर्षाखालील मुलींचे लग्न लावून देण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी मुलगी 14, 15 वर्षाची झाली की तिचे  पालक लग्न लावुन देतात. लग्न लावुन दिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया ही फार बोलकी असते ती म्हणजे झालो एकदाशी या कटकटीतुन मोकळा???? म्हणजे मुलगी म्हणजे कटकट,, मुलगी म्हणजे डोक्यावरील कर्जाचं ओझं ही समाजाची धारणा झाली आहे.  परवाच मातृदीन साजरा झाला. अल्पवयीन वयात लग्न झाल्यामुळे लवकरच मातृत्व येते त्यामुळे ज्या वयात स्वतःचे बालपण खेळण्या बागडण्यात घालवायचे असते त्याच वयात स्वतःच्या मुलांची जबाबदारी खांद्यावर येऊन पडते. हे चित्तथरारक दृश्य असल्याचं आपणास दिसुन येईल. लवकर लग्न झाल्यामुळे  स्त्रीला डीलीव्हरी होताना होणारा त्रास आणि त्यामुळे अनेक भगिनींचे होणारे मृत्यु याचंही प्रमाण जास्त होत असल्याचं आपल्याला दिसुन येत आहे. लवकर लग्न करण्यामागची कारणंही लोकसत्तानं चांगल्या पद्धतीने स्पष्ट केली आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे मुलीबद्दलची असुरक्षिततेची भावना।। आज आम्हो कितीही महासत्तेच्या गप्पा मारत असलो तरी तुमच्या माझ्या भगिनीच्या मनात सुरक्षिततेची भावना उतरवण्यास आपण कुठेतरी नक्कीच कमी पडतोय असं मला ठामपणे वाटतं. ती सुरक्षिततेची भावना आपण आपल्या भगिनींच्या मनात जेव्हा उतरवु तो नक्कीच सुदीन असेल असं मी समजतो.

धन्यवाद
(जागृत विचारातुन✍✍✍)
श्री. पोपटराव यमगर