विवेक विचार

विवेक विचार

सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

*तळागाळातील जनमाणसाला मान सन्मान आणि स्वाभिमान मिळवून देणारा स्वाभिमानी आवाज म्हणजे मा. गोपीचंद पडळकर साहेब*


महाराष्ट्राच्या  राजकारणात स्वतःच एक वेगळं वलंय निर्माण केलेले, गेल्या दहा वर्षात सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील  प्रस्थापित घराण्याच्या विरोधात आवाज उठवत विस्थापीत झालेल्या बहुजन समाजाची मोट बांधत आपल्या उत्तम अशा वक्तृत्व शैलीने वर्षानुवर्षे  जनतेवर स्थान मांडून असलेल्या प्रस्थापित  राजकारण्यांना घायाळ करणारे महाराष्ट्रातील एक  स्वाभिमानी नेता म्हणून अल्प कालावधीत मिळवलेली ओळख तसेच बहुजन, गोरगरीब, शेतकरी, कामगार, वंचित समाजाचा स्वाभिमानी आवाज, युवाहृदयसम्राट सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांचा आज वाढदिवस.... वाढदिवसाच्या निमीत्ताने प्रथमतः  त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...
सांगलीच्या राजकारणात (लोकसभेला आणि विधानसभेला आणि इतर निवडणुकांना) आपण किंगमेकर ठरलाच आहात पण येणारया काळात २०१९ ला सांगलीसह महाराष्ट्राच्या  राजकारणातील सतेत  आपण किंगमेकर  व्हावं हीच मनापासुन सदिच्छा आहे...
      २००७ पासून सुरु झालेली प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरोधातील पडळकर यांची राजकीय वाटचाल ही प्रचंड संघर्षमय अशीच ठरली आहे.  गेल्या १२  वर्षातील राजकीय , सामाजिक वाटचाल ही खडतर, काटेरी वाटेवरील अनवाणी पायाने केलेला प्रवास अशीच म्हणावी लागेल... मी तर याला तिमीरातुन तेजाकडे निघालेला संघर्षमय प्रवास असंच म्हणु इच्छितो...
खरंतर गोपीचंद पडळकर हे नाव या जिल्ह्यान आणि राज्यांन  पहिल्यांदा ऐकलं, पाहिलं, वाचलं ते म्हणजे 2009 च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी फक्त 15-20 दिवस अगोदर...  त्यावेळी राजकारण, समाजकारनात नवख्या असेलल्या पडळकर यांनी खानापूर आटपाडी मतदार संघाचा निकाल बदलून ते किंगमेकर ठरले.  त्यामुळे अनेक प्रस्थापित त्यांना राजकारणात पुढे जाऊ नये म्हणून कुरघोड्या करू लागले... त्यामध्ये त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करून त्यांना मानसिक त्रास देणे, त्यांना अडवण्याची भाषा करणे यासारख्या कुरघोड्या प्रस्थापितांनी करूनही त्यांचा स्वाभिमानी आवाज  ना कोणासमोर दबला ना कोणासमोर झुकला ... त्यामुळे जिल्ह्यातील युवकांना असेच नेतृत्व आपल्या जिल्ह्याला पाहिजे असे वाटू लागले...  तिथुन चालू झालेली संघर्षात्मक वाटचाल  अजूनही अविरतपणे चालू आहे...
वर्षानुवर्षे पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या माणदेश सारख्या दुष्काळी भागात टेंभुसाठी आक्रमक पद्धतीने आंदोलने तसेच ओगलेवाडी टेंभु कार्यालय तोडफोड प्रकरण, मंत्र्याना तालुक्यात येण्यास बंदी, राजेवाडी पोट कालवा आंदोलन, दुष्काळी परिषदा, धनगर आरक्षण साठी विविध मेळावे, मोर्चे  यासह विविध माध्यमातुन जनतेप्रती असलेली आपुलकीची जाणीव जनमाणसात रुजविली.
त्यानंतर 2012 मधील जि. प. पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवत तालुक्यात दुसरया क्रंमाकाची मते मिळवत तानाजीशेठ यमगर यांच्या रुपाने एक पंचायत समिती सदस्यही निवडुन आणला.. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत  उमेदवार म्हणुन खानापुर आटपाडी मतदारसंघात ज्या झंझावत अशा पद्धतीने आपण निवडणुक लढविली ती नक्कीच सर्वसामान्य माणसांना प्रेरणा देणारी अशीच आहे..समोर आर्थिक सामाजिक दृष्ट्या प्रस्थापित असलेल्या तीन उमेदवारांना तुमची उमेदवारी आणि तुम्ही मिळविलेली मते ही नक्कीच सणसणीत चपराकच ठरली.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ग्रामपंचायत निवडणुकात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती स्वबळावर ताब्यात घेतल्या.. २०१७ च्या सांगली जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता येण्यामध्ये तुमची भूमिका महत्त्वाची होती. अनेकजण जिल्ह्यात लोकसभेला निभावलेली किंगमेकर ची भुमिका विसरलेही असतील कदाचित पण सर्वसामान्य माणुस मात्र कधीच विसरणार नाही.  एकीकडे राजकारणाचा चढता आलेख चालु असताना दुसरीकडे सामाजिक कार्याबरोबरच शेतकर्यासाठी, कामगारांसाठी, गोरगरीब, दीनदलीत जनतेसाठी आक्रमक पद्धतीने आंदोलने चालुच होती. माझासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील हजारो मुलांना स्वाभिमानानं जगणं म्हणजे काय असतं हे तुमच्या वाणीतुन आणि कर्तृत्वातुन दाखवुन दिलं. राजसत्ता आणि राजपाठ कधी मागुन मिळत नसतो तर तो हिसकावुन घ्यायचा असतो  असं पडळकर साहेबांनी बहूजन पोरांना ठामपणे ओरडुन सांगितलं...  त्यांना हिम्मत देऊन स्वाभिमानाने जगायला शिकवलं.
महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर  असणाऱ्या धनगर समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत अनुसूची क्र. ३६ वर  दिलेल अनुसुचित जमातीच आरक्षण र आणि ढ च्या चुकीमुळे  झाले नाही. यासाठी भारताच्या स्वांतत्र्यापासुन ते आजपर्यंत गेली ७१ वर्ष रस्त्यावर उतरून विविध मार्गांनी समाजाने आंदोलने केली पण अजूनही तो प्रश्न मार्गी लागला नाही... सत्तेत येण्यासाठी सर्वच पक्षांनी आरक्षणाचे आश्वासन दिले पण ते आश्वासन कोणत्याच पक्षानी अजूनपर्यंत तरी पाळले नाही. आज