विवेक विचार

विवेक विचार

सोमवार, ३० मे, २०१६

रणरागिणी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ……

                                                    
             अठराव्या शतकाच्या इतिहासाच्या पानावर स्वबळावर, स्वकर्तृत्वावर राज्य मिळविण्याचे कार्य आपल्या कतृत्वातुन घडवुन जगासमोर 'स्त्री' या शब्दाची व्याख्याच बदलवुन टाकणार्या तसेच मल्हार रावांच्या मार्गदर्शनाच्या जडणघडणीतुन घडलेले क्रांतीकारी स्त्रीरत्न लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती। त्यांच्या जयंतीनिमीत्त प्रथमतः त्यांच्या विनम्र स्मृतीस विनम्र अभिवादन।।
             31मे 1725 साली माणकोजी-सौ.सुशिलाबाईंच्या पोटी जन्मास आलेल हे धगधगत क्रांती रत्न म्हणजेच अहिल्यादेवी होळकर..  ज्या वयात मुली बाहुली-बाहुली चा खेळ खेळणे पसंद करतात, त्या वयात घोड्यावर बसुन रपेट मारणे,तिरंदाजी करणे, तलवार चालविणे या सार्या गोष्टी छोट्याशा अहिल्येस  प्रिय होत्या. अशा युद्धनितीचा प्रभाव बालपणीच अहिल्यादेवींच्या मनावरती पडला होता. त्यातच त्यांच्या मातोश्री सुशिलाबाई ह्या धार्मिक असल्यामुळे अहिल्यादेवींना मानपान, सन्मान देणे,कार्यनिष्ठा, संयमि वृत्ती,सोज्वळता तथा निर्मळता हे अंगवळणीच पडले होते. अशा दुहेरी संस्कारांच्या गर्तेत अहिल्याराणी घडल्या होत्या.  असेच एकदिवस बाजीराव पेशवे आणि मराठ्यांचे  लढवय्ये शुरसरदार मल्हार राव
होळकर  वेशपालटुन फिरतीवर असताना अहिल्यादेवींशी त्यांची  गाठ पडली. पहिल्याच नजरेत त्या कोवळ्या अहिल्येने त्यांना जरब देऊन तुम्ही व्यापार्याच्या सोंग घेऊन आलेले सोंगी असुन मल्हार रावांचे खरे रूप ओळखले. तसेच मल्हाररावांनी अहिल्येस तिरंदाजी करून समोरील झाडावरचा पक्षी मारण्यासाठी सांगितला. .तेव्हा अहिल्यादेवी उदगारल्या,
   "आम्ही कोण्या मुक्या प्राण्यावर व गरिबांवर हल्ला करून आमची शुरता सिद्ध करत नाही आणि पक्षी तर आमचे पाहुनेच मग त्यांचा तर सन्मान करायला आमच्या मातोश्रींनी शिकविले आहे, संहार नाही"
             त्या प्रसंगाने मल्हारराव अचंबित झाले आणि  अशी शुरकन्या जर आपली सुन जाहली तर ...????? या विचाराने मनोमन सुखावले.  सन 1733 साली अहिल्याराणीचा विवाह मराठ्यांचे शुरसरदार मल्हारराव-गौतमाबाई होळकर यांचे एकुलते पुत्र खंडोजीराव होळकर यांच्याशी पार पडला.
             राज्याची महाराणी म्हणुन प्रतिकुल परिस्थितही काम करत असताना अहिल्यादेवींनी आपला संयम व प्रजेच्या काळजीखातीर कुठलेही भावनात्मक पाऊल उचललेले नाही, कारण खुःद अहिल्यादेवी भावनेपेक्षा कर्तृव्याला श्रेष्ठ माणनार्या होत्या. त्यामुळे आजच्या माता भगिनींनी लहान लहान गोष्टीवरून चिडचिडपणा करून थेट भांडण, घटस्फोट,सासु सासरे वृद्धाश्रमा पर्यंत पोहचविण्यार्या मालिका पाहण्यापेक्षा टीव्हीचे रिमोट बाजुला करून कधीतरी बुद्धीची भुक भागविण्यासाठी  अहिल्या-जिजाऊ-सावित्री-झाशीची राणी वाचल्या पाहिजेत. 
           अहिल्यादेवीनी त्यांच्या स्वराज्यात अनेक लोककल्याणकारी कामे केलेली आपणास पहायला मिळतात. या देशातील अनेक मंदीरे, धर्मशाळा, अन्नछत्रे,वृक्ष संवर्धन, विहिरी, पाण्यचे कुंड असे अनेक लोकहितकारी कार्य केली आहेत. त्यांच्या कालखंडात तर झाडतोड ही अदखलपात्र गुन्हा होता. त्यांनी नदीच्या मुख्य प्रवाहापासुन अनेक कृत्रिम प्रवाह निर्माण करून ऊजाड ठिकाणी पाणी पोहेचवुन शेतकर्यांना शेती करण्यासाठी पाणी ऊपलब्ध करून दिले. तसेच शेतकर्यांना वेळेप्रसंगी शेतसारा मध्ये योग्य ती सवलत देऊन शिवरायांच्या शेतकरी प्रती धोरणांचा अवलंबही केला होता. आजही माहेश्वरच्या साड्या प्रसिद्ध आहेत. तेथे  वस्त्र ऊद्ध्योगासाठी अहिल्यादेवीनीच पुढाकार घेऊन वस्त्रोद्ध्योगास चालना दिली होती. अहिल्यादेवीने "ज्याच्या मनगटात बळ, बुद्धी, चातुर्य आहे. तोच स्वबळावर लोकाभिमुख राजा बनु शकतो" या विचाराच्या आधारे तत्कालीन व्यवस्थेला जबरदस्त 'चपराक' लगावली होती. अहिल्यादेवींनी रणांगणातील लढाईत शक्तीच्या जोरावर अनेक शत्रुंना नामोहरण केले होते, त्याचबरोबर  बुद्धीच्या बळावर अनेक लढायात चित्तपटही केले होते. अहिल्यादेवींनी सती प्रथा,बालविवाह, व विधवांसाठी विशेष योजना राबवुन अन्यायकारी व्यवस्थेस लाथाडले होते. अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी त्यांचं सामाजिक कार्य, त्यांचे  सर्वसमावेशक विचार आणि पराक्रमाचा इतिहास आपणासारख्या सुशिक्षीत तरुणांनी निरपेक्षपणे जाणुन घेऊन तो जाज्वल्यप्रेमी इतिहास तळागाळातील समाजाच्या अशिक्षीत, शोषित,  वंचित घटकापर्यत पोहचविणे हीच आजच्या काळातील खरी गरज आहे असं मला वाटतं.
           एका प्रसिद्ध इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या 'कॅथरीन द ग्रेट, पहिल्या एलिझाबेथ, मार्गारेट' म्हटले आहे. भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेस वसलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली.  मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे जवळ जवळ ३० वर्षे  त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.
           लेखाच्या शेवटी विनया खडपेकर यांच्या 'ज्ञात अज्ञात अहिल्यादेवी होळकर' या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती  दिलेली एक कविता आठवते. या कवितेतुन विनया ताईंनी नक्कीच अहिल्यादेवीच्या कार्याचा फार थोड्या शब्दात खुप मोठा गौरव केला आहे असं मला वाटतं.

"ती सत्ताधारी होती,पण ती सिंहासनावर नव्हती.
ती राजकारणी होती, पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती.
ती पेशव्यांशी निष्ठावंत होती. पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती.
जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता, हुकमत हा
सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा-तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले.
तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछ्त्रे, धर्मशाळांचे रुप घेतले.
तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरामंदिरांतून घुमले.
मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती. तिलाही माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या.
अठराव्या शतकातल्या मराठयांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या
चांदणीसारखी लुकलुकली."

धन्यवाद.....
✍✍✍✍ पोपट यमगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: