प्रथमतः आपले या ब्लॉगवर मनापासून सहर्ष स्वागत आहे.. आपल्याला मिळालेले दररोजचे सुंदर जीवन जगत असताना चांगल्या समाजासाठी माझ्या मनातून उमटलेले हुंकार या ब्लॉग सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचवण्यास मला नक्कीच आनंद वाटतो आहे. इतिहासातील आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा स्वाभिमान आणि वर्तमानातील विविध क्षेत्रातील काही घटनांवर निर्भीड आणि निपक्षपातीपणे व्यक्त केलेले माझे मत तुमच्यापर्यंत या ब्लॉगच्या माध्यमातून पोहचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न...
विवेक विचार

बुधवार, २५ मे, २०१६
वरील गुरुदेव टागोर यांच्या एका अप्रतिम कवितेचा पु.ल. नी मराठीत भाषांतर केलेला सारांश....................
एकदा सुर्यास्ताच्या वेळेला सुर्याने सर्व दिव्यांची सभा बोलावली, आणि विचारले की, "मी तर अस्ताला चाललो, उद्या उगवून येईपर्यंत जगाला प्रकाश देण्याचे काम कोण करेल??" सगळ्या दिव्यांची छाती दडपली, हा साक्षात सुर्यनारायण त्याची एवढी ताकद आणि हा म्हणतो माझ्या अनुपस्थितीमधे जगाला प्रकाश देण्याचे काम कोण करेल?? सगळे गप्प बसले. एक छोटी टिमटिमती पणती होती. ती घाबरत घाबरत पुढे सरकली. सुर्याला वंदन करुन म्हणाली, "सुर्यनारायणा जगाला प्रकाश देण्याचे मला माहित नाही, माझ्यापरीने जळत राहण्याचं काम मी करीन." यावर सुर्य म्हणाला,"अस्ताला जायला मी मोकळा झालो."
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा