विवेक विचार

विवेक विचार

शनिवार, ११ मार्च, २०१७

अखेर मोदीजींच्या सब का साथ सब का विकास या धोरणालाच उत्तर प्रदेशची भक्कम साथ..


2019 मध्ये होणाऱ्या देशाच्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तरप्रदेशसह पाच राज्याच्या निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. त्यानुसार उत्तरप्रदेश सारख्या देशाच्या राजकारणावर आणि समाजकारणावर प्रभाव पाडू शकणाऱ्या या राज्यात भारतीय जनता पार्टी स्पष्ट बहुमतासह विजयी होत आहे. फक्त विजयीच झाली नसून 300 जागापेक्षा जास्त जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवत कमळ जोरात फुलले आहे. उत्तराखंडमध्येही कमळ चांगलेच फुलले आहे.  पंजाब मध्ये मात्र अकाली दलासोबतची युती त्यांना सत्ता वाचवण्यासाठी तारू शकली नाही. तिथे काँग्रेसने विजय मिळविला आहे. खरंतर या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्यांची प्रतिष्ठा खूप पणाला लावली होती. उत्तरप्रदेश मध्ये तर त्यांनी अगदी  शेवटच्या दिवसापर्यंत जो प्रचार केला होता त्याचा फायदा भाजपाला होताना दिसतो आहे. उत्तर प्रदेश च्या निकालानंतर राज्यसभेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळविण्यासाठी जी आकडेवारी लागत होती तीही या राज्यातून मिळणार आहे. त्यामुळे अनेक  विधेयके हि लोकसभेत पास होऊन राज्यसभेत अडखळत होती त्या विधेयकाचा मार्ग आता मोखळा झाला आहे. येणारी राष्ट्रपती पदाची निवडणूक साठीही स्पष्ट बहुमत भाजपकडे उपलब्ध झाले आहे.
केंद्रामध्ये सरकार येऊन भाजपला  तीन वर्ष होत आहेत त्या तीन वर्षातील सकारात्मक विकासकामांच्या जोरावर  भाजप  निवडूक लढवीत होता .  काळ्या पैशाच्या विरोधात नोटबंदी सारखा एक ठामपणे निर्णय घेऊन पारदर्शकतेचा मुद्द्यावर हि भाजपने भर दिला आहे. नोटबंदी नंतर होणारा त्रास जनतेने झेलूनही त्याचे दूरगामी फायदे अर्थव्यवस्थेला आणि पर्यायाने सर्वसामान्य लोकांना होणार आहेत ह्या दृढ विश्वासाला  मतदारांनी साथ दिली आहे.
सर्वसामान्य लोकांच्या मनात एखाद्या नेत्याविषयीची  विश्वासार्हता असते ती खूप महत्त्वाची असते त्याआधारेच  मतदार त्या पक्षाला मतदान करत असतो. मला वाटते ती विश्वासार्हता मोदींजीनी मिळवली आहे आणि मतदारांच्या मनामध्ये  अजूनही ती टिकवुन ठेवली आहे,   ही भाजपच्या होणाऱ्या विजयावरून स्पष्ट जाणवते. मोदीजींची लोकप्रियता   स्थानिक पातळीवर  कायम आहे इतकेच काय तो वाढतहि आहे.  आज अनेक राज्यात गाव, शहर ते केंद्र यामध्ये भाजप सत्तेवर येत आहे. हे आपण महाराष्ट्रासह इतर राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निकालावरून स्पष्ट पणे दिसून येते.भाजपने स्थानिक पातळीवरील प्रचार आणि परिवर्तन रॅली आणि मोठ्या प्रचारसभामधील  करावयाची भाषणे  याची आखलेली रणनीती खूप महत्वाची ठरली.  मोदीजींनी अनेक रोड शो करत, जनतेत मिसळत मतदारांना सामोरे गेले.
उत्तरप्रदेश मध्ये सत्ताधारी मुख्यमंत्री  अखिलेश यादव यांची हार होण्याची सर्वात महत्वाची कारणे म्हटले तर गेल्या दोन महिन्यातील ताणला गेलेला कौटूबिक कलह,  आणि तिथल्या दिल्या जाणाऱ्या नोकऱ्यांमध्ये केला गेलेला भेदभाव, ऐनवेळी काँग्रेस सोबत केलेली आघाडी हे मुद्दे खूप महत्त्वाचे ठरले आहेत.
भाजपच्या विजयाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणता येईल ते म्हणजे भाजप पूर्ण आत्मविश्वासाने निवडूक लढवत होती तो अभाव मात्र इतर काँग्रेस, सपा आणि बसपा कडे होता.  लोकसभेत आलेली मोदी लाट पुन्हा या पुढच्या लोकसभेसाठीच्या घेतल्या गेलेल्या सेमी फायनल मध्ये येणार का ??? अशी चिंता त्यांच्यात ठळकपणे दिसत होती. विरोधकासाठी एक अनुभव आला असेल तो म्हणजे  पराभव हा रणात नाही तर पहिल्यांदा मनात होत असतो याचेच उत्तम उदाहरण म्हणजे या निवडणूका.....
येथून पुढील दोन वर्षाच्या कार्यकाळात मोदीजींच्या नेतृत्वाला आव्हान देईल असे सध्या तरी कोणतेच नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर दिसून येत नाही. तरीही भाजपाला खूप कार्यक्षमतेने  आणि पारदर्शकपणे कारभार करून जनतेचा विश्वास कायम ठेवावा लागणार आहे. शेवटी या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि विकापर्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा... आणि जनतेने जो लोकशाही मार्गाने मतपेटीतुन सत्ताधाऱ्यावरती  विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थ ठरावा हीच एक छोटीशी सदिच्छा..

धन्यवाद..

✍✍पोपट यमगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: