दै. जनशक्ती या वर्तमानपत्रात वसंत घुले नामक पत्रकाराने दिलेली एक बातमी कालपासून सोशल मिडीयावर फिरताना दिसते आहे. या बातमीमध्ये राज्याभरातील युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, युवा हृद्यसम्राट मा. गोपीचंद पडळकर आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी हिरीरीने लढणारे सन्माननीय उत्तमराव जानकर यांच्या बाबत समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. १ ऑगस्ट ला पुण्यातील दुधाने लोन्सवर झालेल्या समाजाच्या अखेरच्या लढ्याला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर राज्य सरकार, मंत्री महोदय, आणि मोठ मोठ्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांना माहित आहे हा लढा लोकशाही मार्गाने आणि माहितीच्या आधारावर चालला आहे. या लढ्यातून सरकार अडचणीत सापडणार आहे. कारण या राज्यात धनगड नावाची जातच अस्तित्वात नसताना त्या जातीचे भूत धनगर समाजाच्या मानगुटीवर बसवले आहे.. त्यामुळे गेली 70 वर्षे धनगर समाज राज्यघटनेत मिळालेल्या आरक्षणच्या न्यायहक्कापासून वंचित राहिला आहे.
वरील बातमीमध्ये जानकर साहेब आणि पडळकर साहेब यांनी पवार साहेबांची भेट घेतली असल्याचे म्हटले आहे.. खरे तर राज्यातील तमाम समाज अश्या खोट्या बातमीवर विश्वास कधीच ठेवणार नाही... जर या बातमीमध्ये काही तथ्य असेल तर वर्तमान पत्राने अखंड समाजाला पुरावे द्यावेत अन्यथा समाजाच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागेल.
मित्रानो आदरणीय पडळकर साहेब आणि जानकर साहेब यांनी जो अखेरचा लढा चालू केला त्याला गट, तट, पक्ष आपल्यातील हेवेदावे विसरून आपण सर्वांनी साथ दिली आहे, देत आहोत यापुढे ती साथ वाढत राहणार आहे हे अनेक राजकीय नेत्यांच्या लक्षात आल्यामुळे अश्या बिनबुडाच्या बातम्या पसरवायचे काम काही विघ्नसंतोषी मंडळी करत आहेत.... पण मला पूर्ण विश्वास आहे कि अश्या बातम्यांना समाज कधीच भिक घालणार नाही.. तितका समाजाचा विश्वास आहे.
नवीन नेतृत्व जर समाजात तळमळीने उभे राहत असेल, समाजाच्या सर्वांगीण प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत असेल, अखेरचा लढा या आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणाच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्याचे आणि सडेतोड जाब विचारण्याचे काम करत असेल तर करुद्या ना यामध्ये इतर नेत्यांना वाईट वाटण्याचे कारण काय ?? हाच खरा सवाल राज्यातील तमाम समाजाला पडला आहे. आणि गोपीचंद पडळकर यांचा राजकीय संघर्ष हा काटेरी वाटेवरून अनवाणी पायांनी झालेला आहे अनेकांनी त्यांना यापूर्वी ही दाबण्याचा खूपवेळा प्रयत्न केला आहे पण हे नेतृत्व कधी दबले नाही न कधी झुकले नाही... राज्यातील समाजाचे नेतृत्व करेल इतकी धमक या माणसामध्ये आहे.. कदाचित त्यांच्या वक्तृत्व आणि कर्तुत्व यामुळे अनेकांना त्यांचे नेतृत्व आपल्यापेक्षा मोठे होईल ही भीती वाटते आहे त्यामुळे त्यांच्यावर अशा पद्धतीने चुकीच्या बातम्या आणि आरोप केले जात आहेत पण त्यांना माझे सांगणे आहे कि तुमच्या या कुटील कारस्थानांमुळे हे नेतृत्व पुढे जायचे कधीच थांबणार नाही. अर्थात कोंबड आरवतय म्हणून ते झाकलं तर ते आरवायचे कधीच थांबत नाही... म्हणून अशा प्रकारे समाजाची दिशाभूल करण्यापेक्षा समस्त धनगर समाजाने चालू केलेल्या अखेरच्या लढ्यात सर्व बंधू आणि भगिनींनी सर्व राजकीय मतभेद विसरून सहभागी व्हा.... हा अखेरचा लढा नक्कीच आपल्या हातात ST चे प्रमाणपत्र घेऊनच थांबला जाणार आहे. आणि शेवटची हात जोडून सर्वाना कळकळीची एक नम्र विनंती आहे कि आत्महत्या करून आपले इतके सुंदर असे मिळालेले ही जीवन आपण संपवून घरच्यांना असे आपल्यापासून असे परके करू नका ... त्यांना तुमची खूप गरज आहे त्यामुळे या अखेरच्या लढ्यात सहभागी व्हा नक्कीच यामुळे आपण आरक्षणच्या दिशेने नक्की जाऊ हा विश्वास मला आहे.
वरील बातमीमध्ये जानकर साहेब आणि पडळकर साहेब यांनी पवार साहेबांची भेट घेतली असल्याचे म्हटले आहे.. खरे तर राज्यातील तमाम समाज अश्या खोट्या बातमीवर विश्वास कधीच ठेवणार नाही... जर या बातमीमध्ये काही तथ्य असेल तर वर्तमान पत्राने अखंड समाजाला पुरावे द्यावेत अन्यथा समाजाच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागेल.
मित्रानो आदरणीय पडळकर साहेब आणि जानकर साहेब यांनी जो अखेरचा लढा चालू केला त्याला गट, तट, पक्ष आपल्यातील हेवेदावे विसरून आपण सर्वांनी साथ दिली आहे, देत आहोत यापुढे ती साथ वाढत राहणार आहे हे अनेक राजकीय नेत्यांच्या लक्षात आल्यामुळे अश्या बिनबुडाच्या बातम्या पसरवायचे काम काही विघ्नसंतोषी मंडळी करत आहेत.... पण मला पूर्ण विश्वास आहे कि अश्या बातम्यांना समाज कधीच भिक घालणार नाही.. तितका समाजाचा विश्वास आहे.
नवीन नेतृत्व जर समाजात तळमळीने उभे राहत असेल, समाजाच्या सर्वांगीण प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत असेल, अखेरचा लढा या आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणाच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्याचे आणि सडेतोड जाब विचारण्याचे काम करत असेल तर करुद्या ना यामध्ये इतर नेत्यांना वाईट वाटण्याचे कारण काय ?? हाच खरा सवाल राज्यातील तमाम समाजाला पडला आहे. आणि गोपीचंद पडळकर यांचा राजकीय संघर्ष हा काटेरी वाटेवरून अनवाणी पायांनी झालेला आहे अनेकांनी त्यांना यापूर्वी ही दाबण्याचा खूपवेळा प्रयत्न केला आहे पण हे नेतृत्व कधी दबले नाही न कधी झुकले नाही... राज्यातील समाजाचे नेतृत्व करेल इतकी धमक या माणसामध्ये आहे.. कदाचित त्यांच्या वक्तृत्व आणि कर्तुत्व यामुळे अनेकांना त्यांचे नेतृत्व आपल्यापेक्षा मोठे होईल ही भीती वाटते आहे त्यामुळे त्यांच्यावर अशा पद्धतीने चुकीच्या बातम्या आणि आरोप केले जात आहेत पण त्यांना माझे सांगणे आहे कि तुमच्या या कुटील कारस्थानांमुळे हे नेतृत्व पुढे जायचे कधीच थांबणार नाही. अर्थात कोंबड आरवतय म्हणून ते झाकलं तर ते आरवायचे कधीच थांबत नाही... म्हणून अशा प्रकारे समाजाची दिशाभूल करण्यापेक्षा समस्त धनगर समाजाने चालू केलेल्या अखेरच्या लढ्यात सर्व बंधू आणि भगिनींनी सर्व राजकीय मतभेद विसरून सहभागी व्हा.... हा अखेरचा लढा नक्कीच आपल्या हातात ST चे प्रमाणपत्र घेऊनच थांबला जाणार आहे. आणि शेवटची हात जोडून सर्वाना कळकळीची एक नम्र विनंती आहे कि आत्महत्या करून आपले इतके सुंदर असे मिळालेले ही जीवन आपण संपवून घरच्यांना असे आपल्यापासून असे परके करू नका ... त्यांना तुमची खूप गरज आहे त्यामुळे या अखेरच्या लढ्यात सहभागी व्हा नक्कीच यामुळे आपण आरक्षणच्या दिशेने नक्की जाऊ हा विश्वास मला आहे.
श्री. प्रतिक यमगर
आटपाडी, सांगली.
7709935374
आटपाडी, सांगली.
7709935374
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा