विवेक विचार

विवेक विचार

शुक्रवार, २५ मार्च, २०१६

लोकशाहीचा विजय

दिल्ली विधानसभा निवडणुक निकालानंतर बिहार विधानसभा निवडणुक निकालांनी पुन्हा एकदा देशातील लोकशाही ही सदृढ आहे हे दाखवुन दिले. निकाल पाहत असतानाच माझ्या मनात आले की या विषयावर आपण काय तरी विचार मांडले पाहिजेत म्हणुनच हे प्रहार तुमच्यापर्यंत पोहचवतोय. लोकसभा निवडणुकीच्या यशाने हवेत असलेल्या भाजपने दिल्लीतील दारुण पराभवाने काही धडा घेतला नाही असे दिसते. बिहार मधील निवडणुकांमधे नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांच्या टीमने आपली पुर्ण प्रतिष्ठा पणाला लावली होती पण नितीशकुमार आणि त्यांच्या महाआघाडीने ती स्पेशल धुळीस मिळविली. जनतेला गृहीत धरुन जे पक्ष राजकारण करतात. त्यांना जनतेने मतदानाच्या माध्यमातुन असंच प्रत्युत्तर दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं, आणि जनता ते देतेय याचा मला आनंद वाटतो. 2014 च्या निवडणुकीमध्ये
काॅग्रेसने जनतेला गृहीत धरले होते त्याचे प्रत्युत्तर जनतेने त्यांना दिले. जनता ही लोकशाही मधे श्रेष्ठ असते. याचं हे एक उत्तम उदाहरण। मी शीर्षक असं दिलं आहे की लोकशाहीचा विजय तर याचे कारण म्हणजे जनता ही स्वतःचं व्यक्तीस्वातंत्र्य वापरत असते. त्यांना योग्य अयोग्य सर्व समजत असते.
      लोकप्रतिनिधीनी असं कधीच समजु नये की मी निवडुन आलो पदाधिकारी झालो मी काहीही केले तरी चालतंय किंवा छुपे अजेंडे राबविले तरी काय फरक पडतोय पण त्यांनी हे लक्षात घ्यावं की जनता ही झोपलेली नसते ,जनता तुमची कारस्थाने उघड्या डोळ्यांनी पाहत असते, आणि त्याचं प्रत्युत्तर लोकशाहीच्या माध्यमातुन देत असते. दिल्ली बिहारसारख्या उदाहरणांनी ते अधिक अधोरेखीत
होत आहे असं म्हणावं लागेल. 2014 च्या निवडणुकीपुर्वी जी आश्वासने भाजपकडुन दिली गेली होती ती आश्वासने
पाळण्याऐवजी वादग्रस्त विधाने करणे , हिदुंनी चार मुलं जन्माला घालणं, संसदेतील निरंजन जोतीचं वक्तव्य, दलीत कुटुंबाची कुत्र्याशी तुलना, सरसंघचालकांचे आरक्षणासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्य, गोमांस खाल्याच्या खोट्या अफवेतुन अखलाखची हत्या, राज्यघटनेच्या सरनाम्यातुन धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द काढणे, हिंदुत्वाचा छुपा अजेंडा पुढं करणे यासारख्या गोष्टीवरती जास्त लक्ष दिलं गेलं
आणि जनतेनं जो मोदीजींच्या वरती प्रचंड विश्वास दाखवला , भरभरुन मतदान केले ते काय या हिंदुत्वाच्या छुप्या अजेंड्यासाठी नाही तर काॅग्रेसचा 10 वर्षातील नाकर्तेपणा, प्रचंड भ्रष्टाचार , घोटाळे तसेच त्यांच्या विरोधातील सामाजिक कार्यकर्त्यांची आंदोलने यामुळे काॅग्रेस च्या विरोधात जनमाणसामधे निर्माण झालेली प्रचंड चीड ही लोकसभेला भाजपला निवडुण देण्याची महत्वाची कारणे होती. तसेच गुजरातचे विकासाचे माॅडेल पाहुन असेल किंवा एक सक्षम नेतृत्वामुळे मतदान केले. मोदीजींनी दिलेल्या आश्वासनावरती मतदान केले. पण दिलेल्या आश्वासनाकडे गांभीर्याने पाहिलंच नाही त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे धनगर आरक्षण ।
         महाराष्ट्र निवडणुकीवेळी प्रचारसभामध्ये मोठमोठ्या भाषणात भाजपचे नेते सांगत होते की एका महिन्यात आरक्षण देऊ , महाराष्ट्रात
सत्ता येऊन एक वर्ष झाले तरी धनगर समाजाच्या आरक्षणाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष तर केलेच पण भाजप मधल्या काही नेत्यांची विधाने
आरक्षणविरोधी आहेत. भाजपने आरक्षण देण्याऐवजी धनगर समाजाच्या नेत्यांना छोटी- मोठी पदं देणे चालु केले आहे, म्हणजे
मागच्या दहा वर्षामधे काॅग्रेस राष्ट्रवादीने जे केलं तेच आता भाजप करतंय. समाजाचे नेते पदासाठी लाचार झाले असतील पण समाज मात्र कधीच नाही. तुम्ही ज्यांना पदाचे गाजर दाखवलंय ते जरी पदाच्या लालसेने शांत बसले असले तरी जागरुक तरुण छावे शांत कधीच बसणार नाहीत. पदांच्या लालसेने प्रत्येक ग्रामपंचायतीपासुन महानगरपालिका, विधानसभा निवडणुकामधे समाजाचे स्वाभिमानी नेते म्हणुन जोरजोरात ओरडुन भाजपचा प्रचार करत आहेत. एका महिन्यात आरक्षण देऊ असं म्हणणार्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे दौरे आयोजित करत आहेत पण मुख्यमंत्र्यांना जाहीर भाषणात आरक्षणाबद्दल जाब विचारण्याची हिम्मत त्यांनी दाखविली नाही ही लाजीरवाणी गोष्ट आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी वाल्यानी 60 वर्षे फसविले हे 100 % खरं आहे त्यात दुमत असण्याचे नक्कीच कारण नाही पण भाजपही आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत असल्याचं दिसून येतंय. आघाडी सरकारने गेली 60 वर्ष फसवले म्हणुन तर तुम्हाला आम्ही सत्तेवर आणले आहे. तुम्ही सारखेच घोकणपट्टी करत आहात की त्यांनी 60 वर्षात केलं नाही मग आम्ही एका वर्षात कसं काय करायचे? तसेच न्यायालयात मराठा आरक्षणासारखे धनगर आरक्षणाचे होऊ नये त्यासाठी आम्ही अभ्यास करुन आरक्षण देऊ असं जे सध्या सत्ताधारयाकडुन बोललं जातंय ही समाजाची निव्वळ शुद्ध फसवणूक आहे याचे कारण म्हणजे मराठा आरक्षण टिकले नाही कारण मराठा समाजाला नव्याने आरक्षण चालु केले होते पण धनगर समाजाला राज्यघटनेमध्येच अनुसुचित जमाती मधे समाविष्ट केले आहे. परंतु धनगर व धनगड या र आणि ड च्या चुकीमुळे ते गेली
60 वर्ष धनगर समाजाला ते लागू झाले नाही त्यासाठी धनगर व धनगड या जाती वेगळ्या नसून त्या एकच आहेत अशी फक्त शिफारस राज्य
सरकारने केंद्र सरकारला पाठवायची आहे. त्यामुळे आम्ही मराठा समाजासारखे नव्याने आरक्षण मागत नसून जे आम्हाला पुर्वी घटनेमधे
दिलंय तेच लागु करा याची आम्ही मागणी करतोय.
           महाराष्ट्रात भाजप सत्तेवर येऊन जवळजवळ एक वर्ष होत आले तरी अजूनही सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की आम्ही अभ्यास करतोय? मग माझ्या सारख्या तरुणाला हा प्रश्न पडतो की आरक्षण या प्रश्नावर सन्माननीय देवेंद्रजी Phd करत आहेत की काय? शरद पवार साहेबांनी गेली 60 वर्ष अभ्यास केला देवेंद्रजी तुम्ही किती वर्ष समाजाचा अभ्यास करणार आहात? सन्माननीय देवेंद्रजी तुम्हाला तर फक्त केंद्राला शिफारस पत्र पाठवायचे आहे. एक वर्ष होऊन गेले तरी तुम्ही अजून त्यादृष्टीने पावलेही उचलल्याचं दिसून येत नाही. 4 जानेवारी च्या आरक्षणाच्या मेळाव्यामधे आदरणीय देवेंद्रजी तुम्ही म्हणाला होता 15 दिवसाच्या आत निर्णय घेऊ, आज एक वर्ष होत आले तरी तुम्ही अजुन निर्णय घेतला नाही तुम्हाला वाटलं असेल की समाजाला टोलवाटोलवीची उत्तरे दिली तरी चालतील पण आज धनगर समाज अशिक्षीत राहिलेला नाही, समाजातील अनेक सुशिक्षीत तरुण छावे विविध माध्यमातुन जनजागृतीचे काम करत आहेत. या जनजागृतीच्या माध्यमातुन समाज तुम्हाला टोलवायला कमी पडणार नाहीच नाही तर जसं दिल्लीत बिहारमधे लाथ मारुन ठेसललं गेलं तसंच महाराष्ट्रातही ठेसलुन काढतील. त्यामुळे विचार करुन लवकरात लवकर निर्णय घ्यावा हीच नम्रतीची विनंती ।
श्री. पोपट यमगर
बाळेवाडी ता. आटपाडी,
जि. सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: