विवेक विचार

विवेक विचार

गुरुवार, १४ एप्रिल, २०१६

विवेक प्रहार @@ खास युवकांसाठी@@


आज जगामधे भारतात सर्वात जास्त युवावर्गाची संख्या आहे. युवकांच्या झुंडीच्या झुंडी चौका चौकात, नाक्या नाक्यावर एकमेकांच्या उणीदुणी काढत असते. शक्यतो हुल्लडबाजी , धिंगाणा, लफडी, मारामारी करण्यात या युवकांना पुरुषार्थ वाटतो. कुठल्या तरी नेत्यांच्या जीवावर त्याच्याच दारू आणि डाॅल्बीवर हिजड्यासारखे नाचण्यात स्वतःला धन्य मानत असतात.शिवाजी महाराज जर त्यांच्या तारुण्यात नाचत बसले असते तर स्वराज्यच निर्माण झाले नसते. स्वातंत्र्यासाठी लढणारे नेते व क्रांतीकारक त्याकाळात नुसते हुल्लडबाजी करत बसले असते तर कदाचित् या देशाला स्वातंत्र्यच मिळाले नसते.
आपल्या नालायकीने आई-बापाला मान खाली घालायला लावण्यात कसला आला आहे पुरुषार्थ? हिजड्यासारखं वागणं आणि बोलणं असणारे हे कसले मर्द? मुलींना आचकट विचकट अश्लील बोलण्यात आणि छेडण्यात कसली आलीय मर्दानगी? ...
मर्द तर ते होते ज्यांनी स्वतःचे जीवन राष्ट्राचे जीवन बनवले. देशासाठी, समाजासाठी, अखंड आयुष्य वेचले. अत्यंत नितीमान जीवन जगत राजा असतांनाही राज्याचा उपभोग न घेता केवळ रयतेसाठी स्वराज्य निर्माण करणारे शिवाजीराजे मर्द होते. आपली भारतीय संस्कृती ही जगभरामधे पोहचविणारे स्वामी विवेकानंदजी मर्द होते, रोज मरणप्राय यातना सोसत औरंग्याच्या अमिषांना लाथाडुन मृत्यूवर विजय प्राप्त करणारे संभाजीराजे मर्द होते. स्वतःचे तारुण्य क्रांतिच्या लढ्यात भिरकावून देणारे, अनेक सुंदर सुंदर तरुणी मागे लागल्या असताना त्यांच्याकडे पाठ फिरवून स्वातंत्र्यासाठी तारुण्य खर्च करत हसत हसत फासावर जाणारे भगतसिंह, सुखदेव, राजगुरु मर्द होते. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून इंग्रजाना टक्कर देणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई मर्द होती. असे असंख्य मर्द या भारताच्या मातीत जन्मास आले. या तमाम मर्दांच्या कर्तृत्वाने पावन झालेली ही भुमी सध्याच्या हुल्लडबाज आणि लफडेबाज युवावर्गामुळे कलंकीत होत आहे
आपण काय आहोत? काय करतो आहोत? यावर माझ्या मित्रांनी गांभीर्याने विचार करावा. आज देशासमोर असंख्य प्रश्न आहेत यातल्या एका एका प्रश्नाला भिडुन त्यांवर आपल्या क्षेत्रात आपल्यापरीने काम केलं तर दिवंगत डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम साहेबांनी 2020 साली भारत महासत्ता होण्याचे पाहिलेले स्वप्न पुर्ण व्हायला वेळ लागणार नाही.
भारत हा देश जगामधे तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. त्या तरुणाईची आज काय अवस्था आहे हे पाहुया. आजच्या तरुणाईमधे दोन टोकाचे भिन्न प्रवाह दिसुन येतात. एका बाजूला राष्ट्रप्रेम, ज्ञानाधिष्टीत संशोधन, वाचक, विज्ञानवादी , धर्म जात पंत यामध्ये भेदभाव न मानणारी , कौशल्य, आपण समाजाचे कायतरी देणं लागतो या विचाराने आपआपल्या परीने कार्य करणारी तरुणाई एका बाजूला आहे तर दुसर्या बाजूला व्यसनाधीन,वासनांध, पाश्चात्यांच्या भोगवादी अश्लील संस्कृतीच आकर्षण, मुलींना आचकट विचकट बोलणं, गुंडगिरी अशी तरुणाई एका बाजूला उभी राहतेय. आणि यामधे दुसर्या बाजूची तरुणाई खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे हे देशाचं आणि समाजाचं मोठं दुर्दैव आहे. म्हणून यावरती मात करण्यासाठी स्वामीजींचं चरित्र समजुन घेऊन ते स्वतः आचरणात आणून ते प्रत्येक युवकापर्यंत पोहचविण्यासाठी आपणासारख्या सुशिक्षीत तरुणांनी प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. स्वामी विवेकानंदजींच्या स्वप्नातील आदर्श युवक या संकल्पनेत आपण बसतो का ? याचा आपण स्वतः मनाला प्रश्न विचारला पाहिजे. आणि जर बसत नसेल तर संकल्पनेत बसण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
युवक हा देशाचा कणा असतो जर देशाचा कणाच बरबाद झाला तर देशाचा भविष्यकाळ खूप बिकट(भयावह) आहे. जगामधे ज्या काही क्रांत्या झाल्या किंवा परिवर्तने घडून आली ती फक्त तरुणांच्या संघटीतपणामुळेच।
आधुनिक काळात बदलत्या जगाचे साक्षीदार होत असताना जातीपाती आणि द्वेषभाव विसर्जित करत, आपापल्या परीनं आपापल्या मार्गानं देशकार्य करुया।
श्री. पोपटराव यमगर
🏡आटपाडी, सांगली
📞7709935373

(मित्रांनो तुमचे याबद्दल
विचार मांडा व हे जास्तीत जास्त मित्रांपर्यँत
पोहचविण्यासाठी शेअर करा व सर्वात महत्वाचे म्हणजे
स्वतःच्या आचरणामध्ये आणा.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: