विवेक विचार

विवेक विचार

शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

पाकिस्थानने उरी येथे भारतीय लष्करावर हल्ला केल्यानंतर भारत सरकार आणि भारतीय लष्कर यांच्या कडुन ज्या पद्धतीने पावले उचलली जात आहेत ते नक्कीच अभिनंदनीय अशीच आहेत असंच म्हणावं लागेल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत भारताच्या परराष्ट्रमंत्री सन्माननीय सुषमा स्वराजजी यांनी केलेलं एक दमदार भाषण नक्कीच आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्थानला एकाकी पाडणार असंच आहे. सन्माननीय सुषमा स्वराजजी यांनी दहशतवाद्यांना पाकिस्थान कश्या पद्धतीने पोसतोय आणि त्यासाठी जगातील सर्व मानवतावादी राष्ट्रांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एकजूट होण्याचं आव्हान केलं. त्याच दिवशी भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सिंधु पाणी वाटप करारातील भारताच्या हिश्याला आलेलं सर्व पाणी भारत वापरेल असा निर्णय घेऊन पाकिस्थानला कृतीतुन पहिला टोला दिला. त्यांतर पाकिस्थानातील इस्लामाबादमध्ये होणारया सार्क परिषदेमधे सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेतल्यामुळे भारतीय उपखंडातील बांगलादेश अफगाणिस्थान भुतान नेपाळ यांनीही भारताच्या निर्णयाला पाठिंबा देत इस्लामाबादमध्ये होणारया सार्क परिषदेमधे सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इस्लामाबादमधे होणारी सार्क परिषद रद्द होत आहे अशी बातमी येत आहे. आणि सर्वात महत्वाचा आणि तुमच्या माझ्या स्वाभिमानाचा आणि आनंदाचा क्षण म्हणजे काल भारतीय लष्कराने LOC पार करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून पाकच्या दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले... जरवेळी भारतावर हल्ला झाल्यानंतर निमूटपणे सहन करत निषेध करण्यापलीकडे आम्ही काही करू शकत नव्हतो. परंतु खरंच राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळाली तर भारतीय लष्करहि दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देते हे भारतीय लष्कराने दाखवून दिले आहे. भारतानं पुढे जाऊन अजून एक पाऊल उचलले आहे ते म्हणजे most favoured nation पाकिस्थानला दिलेला दर्जा भारत कडून घेत आहे...
भारत या सर्व घटना पाहता भारतही एक सशक्त देश म्हणुन पावलं उचलतो आहे याचा तुम्हाला मला अभिमान आहे.. आम्ही जात पात, धर्म, भाषा, प्रांत, पक्षीय राजकारण यापलीकडे जाऊन आमच्यात किती जरी वेगवेगळे वाद विवाद असले तरी भारतावर म्हणजेच आमच्या मायभुमीवर ज्यावेळी दुसरा देश हल्ला करतो त्यावेळी आम्ही 'हम सब भारतीय है' म्हणत एकत्र येऊन त्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देऊ शकतो हे भारतानं दाखवून दिलं आहे.. त्याबद्दल भारत सरकार आणि भारतीय लष्कर यांच मनापासुन अभिनंदन... येथून पुढे भारतावर हल्ला करताना पाकिस्थानला किंवा त्यांनी पोसलेल्या दहशतवाद्यांना विचार करावाच लागेल... याच बरोबर या सर्जिकल स्ट्राइक च्या ऑपरेशन नंतर भारतावर हि खूप मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे

कदाचित पाकिस्थान भारतातील प्रमुख शहरावरती हल्ले करू शकतो.. त्यासाठी आपण सर्वानी राष्ट्रीय सुरक्षततेच्या दृष्टीने खबरदारी घेतली पाहिजे धन्यवाद ... 

 पोपट यमगर

07709935374

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: