सांगलीच्या राजकारणात स्वतःच एक वेगळं वलंय निर्माण केलेले, गेल्या दहा वर्षात खानापुर आटपाडीसह सांगली जिल्ह्यातील प्रस्थापित घराण्याच्या विरोधात आवाज उठवत विस्थापीत झालेल्या बहुजन समाजाची मोट बांधत आपल्या उत्तम अशा वक्तृत्व शैलीने अनेक नामवंत राजकारण्यांना घायाळ करणारे भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्रातील युवा नेते सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांचा आज वाढदिवस.... वाढदिवसाच्या निमीत्ताने प्रथमतः माझ्यावतीने त्यांना कोटी कोटी शुभेच्छा आहेत. सांगलीच्या राजकारणात (लोकसभेला आणि विधानसभेला) आपण किंगमेकर ठरलाच आहात पण येणारया काळात सांगलीच्या राजकारणात आपण किंग व्हावं हीच मनापासुन सदिच्छा आहे...
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी चे उमेदवार म्हणुन खानापुर आटपाडी मतदारसंघात ज्या झंझावत अशा पद्धतीने आपण निवडणुक लढविली ती नक्कीच सर्वसामान्य माणसांना प्रेरणा देणारी अशीच आहे..समोर आर्थिक सामाजिक दृष्ट्या प्रस्थापित असलेल्या तीन उमेदवारांना तुमची उमेदवारी आणि तुम्ही मिळविलेली मते ही नक्कीच सणसणीत चपराकच ठरली. 2007 च्या जि. प. निवडणुकीपासुन ते आजपर्यंत तुमचा जो संघर्षमय, खडतर, काटेरी वाटेवरील अनवाणी प्रवास असा जो राजकीय प्रवास आहे तो नक्कीच कौतुकास्पद असाच म्हणावा लागेल... मी तर याला तिमीरातुन तेजाकडे निघालेला संघर्षमय प्रवास असंच म्हणु इच्छितो... खरंतर गोपीचंद पडळकर हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं, पाहिलं, वाचलं ते म्हणजे 2009 च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी फक्त 15-20 दिवस अगोदर. .... तिथुन ते आजपर्यंत खुप कौतुकास्पद आसाच प्रवास आहे. सांगलीच्या राजकारणाच्या इतिहास ही राजकीय विश्लेषकांना ही गोपीचंद पडळकर या नावाशिवाय पुर्ण करताच येणार नाही. त्यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत झंझावत पद्धतीने प्रचार करुन पहिल्याच निवडणुकीत किंगमेकर ठरलात. त्यांनतर टेंभुसाठी आक्रमक पद्धतीने आंदोलने, ओगलेवाडी टेंभु कार्यालय तोडफोड प्रकरण, मंत्र्याना तालुक्यात येण्यास बंदी, राजेवाडी पोट कालवा प्रकरण, दुष्काळी परिषदा यासह विविध माध्यमातुन जनतेप्रती असलेली आपुलकीची जाणीव जनमाणसात रुजविली. त्यानंतर 2012 मधील जि. प. पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवत तालुक्यात दुसरया क्रंमाकाची मते मिळवत तानाजी शेठ यमगर यांच्या रुपाने एक पंचायत समिती सदस्यही निवडुन आणला..
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ग्रामपंचायत निवडणुकात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती स्वबळावर ताब्यात घेतल्या..एकीकडे राजकारणाचा चढता आलेख चालु असताना दुसरीकडे सामाजिक कार्याबरोबरच शेतकर्यासाठी, कामगारांसाठी, गोरगरीब, दीनदलीत जनतेसाठी आक्रमक पद्धतीने आंदोलने चालुच होती. माझासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील हजारो मुलांना स्वाभिमानानं जगणं म्हणजे काय असतं हे तुमच्या वाणीतुन आणि कर्तृत्वातुन दाखवुन दिलं. राजसत्ता आणि राजपाठ कधी मागुन मिळत नसतो तर तो हिसकावुन घ्यायचा असतो असं सन्माननीय जानकर साहेबांच्यानंतर आपणच बहूजन पोरांना ठामपणे ओरडुन सांगितलं. अनेकजण जिल्ह्यात लोकसभेला निभावलेली किंगमेकर ची भुमिका विसरलेही असतील कदाचित पण सर्वसामान्य माणुस मात्र कधीच विसरणार नाही. कि आपल्या राज्यात दुसरया क्रंमाकाचा असणारा धनगर समाज डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणासाठी भारताच्या स्वांतत्र्यापासुन ते आजपर्यंत गेली 68 वर्ष रस्त्यावर विविध आंदोलनाच्या माध्यमातुन रस्त्यावरती उतरत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठीही आपण अनेकवेळा मोर्चे, आंदोलने केली आहेत. अजुनही आरक्षणाचा प्रश्न मिटलेला नाही तोही प्रश्न आपण तत्परतेने लक्ष घालुन लवकर निकाली काढावा हीच राज्यातील तमाम समाजबांधवाची मनस्वी मागणी आहे.
खरंतर बोलण्यासारखं बरंच आहे. जर कोण चांगले काम करत असेल त्याला पाठिंबा देणं, कौतुक करणं आणि कोण चुकतही असेल तर त्यांची चुकही निपक्षपातीपणे दाखवुन देणं हे एक लेखकाचं काम आहे. आज आपला भारतीय जनता पार्टी हा पक्ष राज्यात, केंद्रात सत्तेवर आहे. आपल्याकडुन तमाम सांगलीकर यांच्यासह खानापुर आटपाडीकर यांच्या खुप सारया अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी माझ्यावतीने तुम्हाला गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्माचं दान, भिष्माचं वचन, रामाची मर्यादा, हनुमंताची ताकद, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं जाणतेपण देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ...आणि
पुनश्च एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा
धन्यवाद
श्री. पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली
०७७०९९३५३७४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा