विवेक विचार

विवेक विचार

रविवार, ३० एप्रिल, २०१७

राकट देशा, कणखर देशा, छत्रपतीच्या देशा 💐💐💐💐💐

                     आज महाराष्ट्र दिन...भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सयुंक्त महाराष्ट्र चळवळीतील  अनेक हुतात्म्यांनी प्राणाचीही बाजी लावली आणि  महाराष्ट्र या राज्याची स्थापना  1 मे 1960 रोजी  केली गेली.  आम्ही  महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती शोधायला जातो त्यावेळी प्राचीन काळात इसवी सन 500 मध्ये महावंश नावाच्या बौद्ध ग्रंथात 'महारठठ' या शब्दापासून झालेली आढळून येते. तसेच पुढे मध्ययुगीन काळात 'मरहट्ट' या शब्दावरून ही महाराष्ट्राला ओळखले जायचे. त्याच महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे एक दूरदृष्टीकोन असलेलं नेतृत्व लाभले आणि ह्या महाराष्ट्राची माती न माती पवित्र केली.  परकीय आक्रमणापासून  या महाराष्ट्राची पवित्र संस्कृती जपण्यासाठी  कित्येक मावळ्यांनी आपल्या प्राणाची कोणतीही पर्वा न करता छत्रपतीनीं उभारलेल्या हिंदवी स्वराज्य रक्षणार्थ आपल्याला या मातीत गाडले आहे.. त्यामुळे आज या महाराष्ट्राची  या देशात आणि जगामध्ये एक वेगळी अशी ओळख प्राप्त झाली आहे.भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व ही या महाराष्ट्राने केले आहे. महाराष्टाला खूप मोठा सांस्कृतिक इतिहास लाभलेला आहे. याच इतिहासाच्या आधारावर आजचा महाराष्ट्र नक्कीच पुढची पाऊले टाकतो आहे यामध्ये माझ्या मनात तरी कोणतीच शंका नाही. अर्थात महाराष्ट्रासमोर आजची समस्या ही  शेतकऱ्यांना सुस्थितीत आणणे हीच आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य पद्धतीने हमीभाव मिळवून देणे हेच उद्दिष्ट सरकारचे असले पाहिजे. त्यासाठी सरकारने  सकारात्मक दृष्टीकोणातून यावरती निर्णय घेतले गेले पाहिजेत. या महाराष्ट्राला घडवण्यासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनीं आपल्या प्राणाची बाजी लावली त्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन..💐💐               ✍पोपट यमगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: