विवेक विचार

विवेक विचार

रविवार, २३ एप्रिल, २०१७

समृद्धी महामार्गाने समृद्धी नेमकी कोणाची?


मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी पाहिलेच तीन महामार्ग असताना राज्य सरकारने नवीन समृद्धी महामार्गाचा घाट का घातला आहे??? आणि या महामार्गाने समृद्धी नेमकी कोणाची होणार आहे??? यामध्ये शेतकऱ्यांना लुटून उद्योगपतींची समृद्धी होणार आहे हे उघड आहे. हजारो शेतकऱ्यांचा विरोध असताना त्या शेतकऱ्यांना चिरडून जर हा महामार्ग सरकर करणार असेल तर ही सरकारची हुकूमशाही आहे.... सरकारची ही हुकूमशाही मोडायला आमच्या शेतकऱ्यांना अजिबात वेळ लागणार नाही... आम्हाला फक्त भाषणात शेती आणि शेतकरी हा विषय नको आहे... आम्ही आयुष्यभर भाषणातच शेतकऱ्याविषयीचा कोरडा कळवळा ऐकत आलो आहे... एकीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हटले की  राज्य सरकारची तिजोरीत खणखणाट वाजतो पण त्याच शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडून घेऊन त्यांच्या शेतीवर नांगर फिरवून 46000 कोटी  (आजचा प्रस्तावित खर्च) खर्च करताना तिजोरीत खणखणाट वाजत नाही... त्यावेळी तिजोरी खचाखच भरलेली असते. कारण यामुळे कित्येक उद्योगपतींची घरे भरली जातील. शेतकरी काय अशिक्षित .... त्याला भाषणात गोड गोड थापा मारून भुलविता येते. छत्रपतींचा आशीर्वाद हा फक्त निवडणुकामध्येच घेतला जातो पण राज्य कारभार चालवताना मात्र राजेंची धोरणे राजेंचे विचार सोयीस्कर रित्या गुंडाळून ठेवले जातात. छत्रपतींचा आदेश होता," शेतकऱ्याच्या शेतातील भाजीच्या देठाला जर हात लावला तर त्याचे हात कलम केले जातील".  पण फडणवीस सरकार याच्याउलट कृती करत शेतकऱ्यांच्या जमिनी प्रशासनाच्या माध्यमातून दडपशाही करून घेत आहे.   याची आठवण छत्रपतींचा आशीर्वाद घेताना या फडणवीस सरकारला होत नाही का??  यामुळे येथून पुढे राज्य सरकारने निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या नावाने गळे काढणे बंद करावे. तुम्ही योग्य वेळी कर्जमाफी करणार असाल तर या राज्यातील शेतकरी ही तुम्हाला योग्यवेळी घरचा रस्ता लवकरच दाखवतील.

✍पोपट यमगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: