विवेक विचार

विवेक विचार

शनिवार, २९ एप्रिल, २०१७

सत्तेतून बाहेर हाकलण्याची ताकद शेतकर्यांमध्ये

छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारला भाषणातच फक्त शेतकऱयांच्या विषयी प्रेम आणि पुळका दिसत आहे. याचे कारण म्हणजे लाखो टन तूर शेतकऱ्यांच्या जवळ शिल्लक राहिली असताना केंद्र सरकारने खरेदी केंद्रांना तूर खरेदी करण्यास मुदतवाढ नाकारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पडत्या भावांमध्ये तूर डाळ व्यापाऱ्यांना विकावी लागणार आहे... अच्छे दिनाची स्वप्ने दाखवणाऱ्या सरकारने मात्र शेतकऱयांच्या वरती संक्रात आणायची असे ठरवले आहे की काय?? असा प्रश्न निर्माण होतो.
राज्यासह देशात तुरीचे विक्रमी उत्पादन झालेले असतानाही आणि लाखो टन तूर शेतकऱ्याच्या घरात पडून असताना (22 एप्रिलच्यानंतरही ) केंद्र सरकार एकीकडे बाहेरील देशातून तूर आयात करत आहे, आयात शुल्काचे जे सांगितले जात आहे ते निव्वळ शुद्ध फसवणूक आहे कारण आपण आयात शुल्क माफ असलेल्या देशाकडूनच (म्यानमार) तूर खरेदी करत आहोत. आणि त्याच वेळेस दुसरीकडे निर्यात बंदी ही लागु आहे. इतके विक्रमी उत्पादन झालेले असतानाही केंद्र सरकार निर्यात बंदी का उठवत नाही आहे?? कर्जमाफीवरून काँग्रेस राष्ट्रवादी विरोधक राजकारण करत आहेत असे सत्ताधार्यांना वाटतं या मताशी दुमत नाही परंतु विरोधकाप्रमाणे सत्ताधारी भाजप ही राजकारणच करत आहे याचे कारण एका राज्यात कर्जमाफी करायची आणि दुसऱ्या राज्यात कर्जमाफी न करता कर्जमुक्ती आणि शाश्वत शेतीचे सोज्वळ आणि गोंडस डांगोरे पिटायचे हा सत्ताधाऱ्यांचा दुतोंडीपणा न समजायला शेतकरी काय दुधखुळे आहेत का...????
शेतकऱ्यांना या सरकारने देशोधडीला लावायचे ठरवले आहे की काय?? एकीकडे मन की बात मधून देशातील शेतकऱ्यांना जास्त कडधान्य लावायला सांगायचे, प्रोत्साहन द्यायचे आणि मग आमच्या शेतकरी बांधवांनी दुष्काळ, गारपीट नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करत जास्त तुरीचे उत्पादन केले तर त्यांची तूर शेतामध्ये तशीच पडून ती खरेदी सुद्धा खरेदी केंद्रामार्फत जात नाही व्यापारी निम्याने भाव पाडून शेतकऱ्याला लुटायचे काम करत आहेत. पण हे निरडावलेले सरकार पद्धतशीर पणे शेतकऱ्यांना गोलमाल उत्तरे देत आहे . शेतकऱ्यांचे कैवारी आज मात्र सत्तेसाठी हापापाले दिसत आहेत. आमचे कैवारी विस्तापित शेतकरी बांधवाच्या बाजूने लढता लढता हे धनधांडग्या प्रस्थपिताच्या बाजूने कधी पासून उभे राहू लागले हे आम्हा शेतकऱ्यांना समजेनासे झाले आहे.(खरंतर ही शेतकऱ्यांची दुर्दैवी खंत आहे) अवश्य शेतकऱ्यांच्या जीवावर मिळालेली सत्ता शेतकऱ्यांच्यावर आर्थिक अन्याय करून उपभोगा परंतु या निरडावलेल्या सरकारला सत्तेतून बाहेर हाकलण्याची ताकद शेतकर्यांमध्ये नक्कीच आहे. शेतकऱ्यांचे पडसाद नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सणसणीतपणे ऎकू येतील त्यावेळीच या झोपलेल्या सरकारला खडबडुन जाग येईल..

✍पोपट यमगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: